एक्स्प्लोर

ग्राऊंड रिपोर्ट : ‘समृद्धी’ला विरोध करणाऱ्या शिवडे गावाची नेमकी व्यथा काय?

शिवडे (नाशिक) : समृद्धी महामार्गाला विरोध केल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शिवडे गाव सध्या राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. समृद्धी महामार्गच नव्हे, तर वेगवेगळ्या योजनांमध्ये जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त गावांचं प्रतिनिधित्व सध्या शिवडे गाव करतं आहे. नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील शिवडे गावाची लोकवस्ती 6 हजार 500 एवढी आहे. समृद्धी महामार्ग झाला तर आम्ही नक्षलवादी बून असं म्हणत हिंसक पद्धतीने या कामाला विरोध केल्याने हे गाव सध्या राज्यात चर्चेचा विषय झालं आहे. समृद्धीला शिवडे ग्रामस्थांचा तीव्र विरोध मुंबई नागपूर एक्सप्रेस वे करून राज्याला समृद्ध करण्याचं माध्यम म्हणून जे काम भाजप सरकारने हाती घेतलं, त्याला हे गाव इतकं पोटतिडकीने विरोध का करतय हे जाणून घेण्यासाठी आम्ही शिवडेत पोहचलो. अधिकारी मोजणी करायला आले की तुटून पडायचं या एकाच इराद्याने इथे जागोजागी तरुणांचे, महिलांचे, माणसांचे घोळके जमलेले दिसतात. ग्राऊंड रिपोर्ट : ‘समृद्धी’ला विरोध करणाऱ्या शिवडे गावाची नेमकी व्यथा काय? भयाण शांतता शिवडेतल्या लोकसंख्येपैकी 60 टक्के लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे. शेतीवर मोलमजुरी, जोडधंदे करुन जगणारा हा समाज. त्यांना शोधत आम्ही आदिवासी मजूर वाडीत गेलो तर तिथेही भयाण शांतता होती. समृद्धी महामार्गासाठी जमीन गेली तर आम्हीही संपू, अशी आर्त भावना इथे लोकांशी बोलताना जाणवली. “जमिनी गेल्या तर भिकेला लागू” शिवडे गाव तसं प्रगतशील शेतीसाठी प्रसिद्ध आहे. सरकारच्या लेखी 1 हजार 300 हेक्टर शेतजमीन आहे. त्यापैकी 800 हेक्टर जमीन बागायती तर 500 हेक्टर जिरायती. द्राक्ष, ऊस, टोमॅटो, काकडी, भाजीपाला, नगदी पीक प्रामुख्याने इथे घेतली जातात. शिवडेतला द्राक्ष, टोमॅटो निर्यातीत खास. इथले अनेक शेतकरी निर्यातदार म्हणून ओळखले जातात. अनेकांचा भाजीपाला, नगदी पीक रोज पुण्यात, मुंबई वाशीत विक्रीला जातो. त्यामुळे संपन्नता. मात्र समृद्धीसाठी जमिनी गेल्या तर भिकेला लागू अशी या शेतकऱ्यांची कैफियत आहे. Shivade “...तर नक्षली बनू” समृद्धी महमार्गामुळे केवळ बागायती शेतीच नाही यावर अवलंबून असलेले मजूर, जोडधंदे करणारे लोकही विस्थापित होणार आहे. इतकंच नाही तर 2 किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेला पाझर तलाव आणि 70 पाणीदार विहिरीही नष्ट होणार आहे आणि म्हणून आत्महत्या करू, नक्षली बनू पण जमिनी देणार नाही असं हे शेतकरी पोटतिडकीने सांगतात. समृद्धीमागोमाग येणाऱ्या अनंत अडचणींचं काय? विषय फक्त अधिग्रहित होणाऱ्या जमिनीचा नाही. त्यामागोमाग येणाऱ्या इतर अनंत अडचणीचाही आहे. एकदा हा मार्ग बांधला गेला तर अनेक मीटरपर्यंत नव्या विहिरी खोदता येणार नाही. अपघात, पर्यावरणहानी आणि यासारखे इतर विकासासोबत येणारे दुष्परिणाम अनेक आहेतच. कर्जबाजारी झाल्याने शेतकरी आत्महत्या करतात हे आपण कायम ऐकतो. पण समृद्धी महामार्गासारखे विकासकाम केल्यानेही प्रगतशील शेतकऱ्यांच मरण होउ शकत हे समजून घ्यायच असेल तर सरकारने शिवडेत यावं. हैवही गेलं आणि दैवही अशी इथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget