![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
GramPanchayat Election Results 2021 : पालघरमध्ये तीन ग्रामपंचायतीवर तीन पक्ष विजयी
वसई तालुक्यातील पाली ग्रामपंचायत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे. 7 सदस्य पैकी 6 सदस्य हे बहुजन विकास आघाडीकडे तर 1 सदस्य हा शिवसेनेचा निवडून आला आहे.
![GramPanchayat Election Results 2021 : पालघरमध्ये तीन ग्रामपंचायतीवर तीन पक्ष विजयी GramPanchayat Election Results 2021: Three parties win over three Gram Panchayats in Palghar GramPanchayat Election Results 2021 : पालघरमध्ये तीन ग्रामपंचायतीवर तीन पक्ष विजयी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/18204349/WhatsApp-Image-2021-01-18-at-3.06.52-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पालघर : पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. सकाळी 10.30 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 1 तासात सर्व मतमोजणी सुरळीतपणे पूर्ण झाली. जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायत तीन पक्षांकडे गेल्या आहेत. पालघर तालुक्यातील सांगावे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. शिवसेनाप्रणित ग्रामविकास पॅनलने याठिकाणी 7 पैकी 4 जागांवर विजय मिळवला. तर 3 जागा स्थानिक युवा पॅनलने जिंकल्या आहेत.
तर वसई तालुक्यातील सत्पाला ग्रामपंचायतीमध्ये मनसेने इन्ट्री मारली आहे. मनसे पुरस्कृत ग्रामविकास पॅनलचे 11 पैकी 9 सदस्य विजयी झाले आहेत. तर 2 सदस्यांवर बहुजन विकास आघाडीला समाधान मानावे लागले आहे. ग्रामविकास पॅनलमध्ये मनसे, आदिवासी एकता परिषद आणि निर्भय जनमंच सहभागी होते.
तसेच वसई तालुक्यातील पाली ग्रामपंचायत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे. 7 सदस्य पैकी 6 सदस्य हे बहुजन विकास आघाडीकडे तर 1 सदस्य हा शिवसेनेचा निवडून आला आहे. पाली ग्रामपंचायतीमध्ये ओल्गा विलास दुरुगुडे ह्या केवळ 1 मताने निवडून आल्या आहेत. दूरगुडे यांना 51 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या स्विटी स्टीफन बार यांना 50 मते पडली आहेत.
संबंधित बातम्या
- Gram Panchayat Election Results 2021 | हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवारांचं वर्चस्व, सातही जागांवर विजय
- Gram Panchayat Election Results | अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटीलच 'दादा', माळशिरसमध्येही 44 पैकी 35 ग्रामपंचायतींवर वर्चस्व
- Maharashtra Gram Panchayat Election Results | चंद्रकांत पाटलांना गावही राखता आलं नाही, शिवसेनेचा सहा जागांवर विजय
- औरंगाबादमधील पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात; 25 वर्षांनंतर गावात सत्तांतर
- परळीत धनंजय मुंडेंचा वरचष्मा, 12 पैकी 10 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा!
- औरंगाबादमधील पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात; 25 वर्षांनंतर गावात सत्तांतर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)