एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
हमीभाव न दिल्यास व्यापाऱ्यांना शिक्षेचा निर्णय बारगळला
हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांकडून माल खरेदी केल्यास वापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय सरकारने घेतला होता.
![हमीभाव न दिल्यास व्यापाऱ्यांना शिक्षेचा निर्णय बारगळला Government u turn over penalty to traders on MSP हमीभाव न दिल्यास व्यापाऱ्यांना शिक्षेचा निर्णय बारगळला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/15081522/farmers-loan-waiver.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
उस्मानाबाद : हमीभाव न दिल्यास व्यापाऱ्यांना शिक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर मागे घेतला आहे. व्यापाऱ्यांना शिक्षा देण्याऐवजी त्यांना आधी सुविधा पुरवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. खरीप 2018 पासून हा निर्णय लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
राज्यातल्या 31 बाजार समित्यांमध्ये ग्रेडिंग चाळण्या बसवण्यात येणार आहेत. यासाठी 20 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, पाच कोटी राज्य सरकार तर उर्वरित रक्कम बाजार समित्यांनी द्यायचे आहेत.
हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांकडून माल खरेदी केल्यास वापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय सरकारने घेतला होता. यानुसार, व्यापाऱ्याला 50 हजार रुपयांचा दंड आणि एक वर्षांचा तुरुंगवासांच्या शिक्षेची तरदूत होती.
या निर्णयाचं शेतकऱ्यांनी स्वागत केलं तर, व्यापारी आणि अडते यांच्यात निर्णयावरुन मोठी नाराजी होती. या पार्श्वभूमीवर आता सरकारने व्यापाऱ्यांना सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सांगली
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)