एक्स्प्लोर

Maharashtra MLC Election : घोडेबाजार होणार नाही, राजकीय भूकंप झालाच, तर तो आम्हीच करणार; भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्यांची डरकाळी!

Maharashtra MLC Election : महायुतीचे सर्व आमदार एकत्र असून शंभर टक्के आमचेच सर्व उमेदवार निवडून येणार असा दावा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.

Maharashtra MLC Election : विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होणार नाही, महायुतीचे सर्व आमदार एकत्र असून शंभर टक्के आमचेच सर्व उमेदवार निवडून येणार असा दावा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. यावेळी राजकीय भूकंप झालाच तर तो आम्हीच करू विरोधकांकडून तो होऊ शकत नाही, असं देखील दानवे यांनी म्हटलं आहे. 

विरोधकांना आरक्षणाबाबत आस्था नाही

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या विरोधकांना आरक्षणाबाबत आस्था नाही अशी टीका दानवे यांनी केली. फडणवीस यांच्यावर जरांगेंकडून होणाऱ्या टीकेवर बोलताना प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य असल्याचं दानवे म्हणाले. 

महायुती आणि मवाकडे एकूण किती आमदार?

महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीकडे सध्या एकूण 200 आमदार आहेत, तर महाविकास आघाडीकडे 65 आमदार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीला स्वबळावर उमेदवार निवडायचा असेल तर आणखी 4 मतांची गरज आहे, तर ठाकरे गटाला उमेदवार निवडायचा असेल तर 8 मतांची गरज आहे. भाजपा आपले चार उमेदवार स्वबळावर निवडून आणू शकतो. जर पाचवा उमेदवार निवडून यायचा असेल तर त्यांच्याकडे स्वतःची 8 मते असणे आवश्यक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पक्षाला आपापली मते गोळा करावी लागणार आहेत.

काँग्रेसच्या मतांची विभागणी होण्याची शक्यता किती?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसने अद्याप हॉटेल बुक केलेले नाही. सर्व आमदारांना एकत्रित मतदान कसे करायचे हे सांगितले आहे. काँग्रेसकडे एकूण 37 मते असून 23 मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर 14 मते शिल्लक आहेत. जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांना ही मते मिळू शकतात. पण, प्रत्येक पक्षाला कमी पडणारी मते गोळा करायची आहेत.

11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणूक लढवणार

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. ज्यासाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. मतांचे विभाजन टाळण्यासाठी शिवसेना शिंदे गट, भाजप, उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या वातावरणाचा फायदा कोणाला होणार?

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा वरचष्मा आहे. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत महायुती भक्कम दिसत आहे. त्यामुळे 11 पैकी 9 जागांवर विजय मिळत असल्याचे दिसत असले तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदललेल्या वातावरणात शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार पक्ष बदलतील हे नाकारता येणार नाही. तसे झाल्यास त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्ष अत्याचार, धर्मांतराचा दबावही आणला, आरोपीवर गुन्हा दाखल
बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्ष अत्याचार, धर्मांतराचा दबावही आणला, आरोपीवर गुन्हा दाखल
धक्कादायक! 10 दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या नवदाम्पत्यावर काळाचा घाला, अपघातात दोघांचाही अंत
धक्कादायक! 10 दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या नवदाम्पत्यावर काळाचा घाला, अपघातात दोघांचाही अंत
मोठी बातमी! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर, एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर, एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Embed widget