एक्स्प्लोर

लातूरमध्ये नैसर्गिक संकटानंतर महा ई-सेवा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक, शेकडो शेतकऱ्यांना आर्थिक फटका

पिक विमा भरलेल्या रकमेत बिबराळ आणि बाकली येथील सुमारे 400 हून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांकडून पिक विमा भरताना जी रक्कम घेतली त्यापेक्षा कमी रक्कम विमा कंपनीत जमा केली आहे.

लातूर : सुरुवातीला साथ देणाऱ्या पावसाने हाता तोंडाशी आलेले शेतमाल मातीमोल केला. नुकसान भरपाई पिक विमा स्वरुपात का होईना मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा आहे. मात्र लातूर जिल्ह्यातील 400 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना धोका देण्याचं काम महा ई सेवा केंद्र चालकानी केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. राज्यात अनेक गावातील महा ई सेवा केंद्र हे शेतकऱ्यांचा मदतीसाठीच निर्माण केले गेले आहेत. मात्र त्याच केंद्रांतून शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर दाद कुठे मागावी असा प्रश्न निर्माण होत आहे. 

लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बिबराळ येथील महा ई-सेवा केंद्र चालकांनी अनेक शेतकऱ्यांना फसवले आहे. पिक विमा भरलेल्या रकमेत बिबराळ आणि बाकली येथील सुमारे 400 हून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांकडून पिक विमा भरताना जी रक्कम घेतली त्यापेक्षा कमी रक्कम विमा कंपनीत जमा केली आहे. ही बाब समोर आल्यावर शेतकरी संतप्त झाले आहेत. त्या केंद्र चालकावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शंभराहून अधिक शेतकऱ्यांनी शिरूर अनंतपाळचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे. 

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बिबराळ आणि बाकली येथील शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी बिबराळ येथे सोय आहे. येथील नितीन भानुदास ऐरोळे यांचे महा ई सेवा केंद्र आहे. याच महा ई सेवा केंद्रातून 400 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पिक विम्याची रक्कम भरणा केली आहे. भरलेल्या रकमेची पावती पण घेतली आहे. मात्र दोन महिन्याच्या कालावधीनंतर भरलेली रक्कम आणि ऑनलाईन ॲपद्वारे दाखवत असलेली रक्कम यात बरीच तफावत दिसून आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. महा ई सेवा केंद्र चालकांनी पूर्ण विम्याची रक्कम न भरता आपली फसवणूक केल्याचे लक्षात आले आहे. भविष्यात पीक विमा मंजूर झाला तर होणाऱ्या लाभापासून चारशेहून अधिक शेतकरी वंचित राहतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यास सेवा केंद्र चालक जबाबदार असून त्याची ताबडतोब चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. योग्य न्याय दिला नाहीतर सामूहिक उपोषण करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या निवेदनावर दोन्ही गावातील 100 शेतकऱ्यांची सही आहे.
  
प्रशासनास याची माहिती मिळाल्यावर आता तपास सुरु आहे. यातून कायद्यानुसार काय उपाय योजना करता येतील याची चाचपणी सुरु आहे. शिरुर अनंतपाळचे तहसीलदार अतुल जताळे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अंगद सुडके यांनी चौकशी सुरु केली आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होईल. 

शेतकऱ्यांना आलेले अनुभव 

बाकली येथील बाबूराव शिंदे यानी साडेचार हजार रुपये पिक विमा करिता त्या केंद्रावर भरले होते. पावती जी बनावट आहे मिळाली मात्र त्याच्या नावे
प्रत्यक्षात दोन हजाराचा भरणा झाला होता. बिबराळ येथील रमेश नारायण सालुंखे यांनी 7744 रुपयांचा विमा भरण्याची रक्कम दिली होती. मात्र त्याच्या नावे 4744 रुपयच भरण्यात आले आहेत. त्याच्या कुटुंबातील अनेकांना याच प्रकारे फसविण्यात आले आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar Rains: 8 दिवसांपूर्वी 8 मृत्यू, तरीही चांदसेली घाट 'जैसे थे', दरड कोसळून वाहतूक ठप्प
Pandharpur : Vitthal मंदिराचे 24 तास दर्शन सुरु, समिती अध्यक्षांची माहिती
Farmer Distress: 'तोंडातला घास निसर्गाने हिरावला', Gondia तील अवकाळी पावसाने नुकसान
Tourist Rush :Diwali सुट्टीच्या शेवटच्या वीकेंडला Raigad वर पर्यटकांची गर्दी,वाहन पार्किंगच्या रांगा
Nalasopara Drug : नालासोपाऱ्यात 14 कोटींची MD Drugs फॅक्टरी उद्ध्वस्त, Mumbai Police ची मोठी कारवाई!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
पुढील आठवड्यात देशभरात मतदारयाद्या सुधारणा कार्यक्रम सुरु होणार? आगामी वर्षात पाच राज्यात निवडणूक रणधुमाळी
पुढील आठवड्यात देशभरात मतदारयाद्या सुधारणा कार्यक्रम सुरु होणार? आगामी वर्षात पाच राज्यात निवडणूक रणधुमाळी
Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol: रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर आणखी एक सनसनाटी आरोप, गोखलेंसाठी केंद्रीय मंत्रि‍पदाचा गैरवापर, नेमकं काय घडलं?
धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर आणखी एक आरोप, गोखलेंसाठी केंद्रीय मंत्रि‍पदाचा गैरवापर, नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : आता मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहता का? आजवर इतका लबाड मुख्यमंत्री देशाने पाहिला नाही; कर्जमाफीच्या मुद्दयावरुन बच्चू कडूंनी ओढले टीकेचे आसूड
आता मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहता का? आजवर इतका लबाड मुख्यमंत्री देशाने पाहिला नाही; कर्जमाफीच्या मुद्दयावरुन बच्चू कडूंचे टीकेचे आसूड
Jain Boarding House Land: पुण्यातील जैन बोर्डिंग जागा वादात आता आणखी एक ट्विस्ट! कर्ज दिलेल्या त्या दोन पतसंस्थांकडून गहाणखत थेट रद्दबातल
पुण्यातील जैन बोर्डिंग जागा वादात आता आणखी एक ट्विस्ट! कर्ज दिलेल्या त्या दोन पतसंस्थांकडून गहाणखत थेट रद्दबातल
Embed widget