एक्स्प्लोर

राज्य सरकारने जाहीर केलेला दुष्काळ केंद्राच्या संहितेप्रमाणे नाही

केंद्राच्या दुष्काळ संहितेनुसार दुष्काळ जाहीर न केल्यामुळे केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या मदत निधीमध्ये अडचण येऊ शकते.

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेला दुष्काळ हा केंद्र सरकारच्या दुष्काळ संहितेप्रमाणे नसल्याचं समोर आलं आहे. राज्य सरकारने जाहीर केलेला दुष्काळ केंद्राच्या संहिता 16 प्रमाणे नसल्याची कबुली खुद्द राज्य सरकारच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दिली आहे. या प्रकरणी संजय लाखे पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. केंद्राच्या दुष्काळ संहितेनुसार दुष्काळ जाहीर न केल्यामुळे केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या मदत निधीमध्ये अडचण येऊ शकते. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या दुष्काळ मॅन्युअलनुसार आज राज्यातल्या आणखी 250 मंडळात दुष्काळ जाहीर केला. काल रात्री सरकारने 151 तालुक्यात गंभीर आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला होता. 112 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर 39 तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे. संहिता 16 काय सांगते? संहिता 16 नुसार 30 ऑक्टोबरपूर्वी पेरणी, पावसाचा पडलेला खंड, हवेतील आर्द्रता आणि पीक परिस्थिती कशी आहे, याची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारने दुष्काळ नियंत्रण कक्ष उभारला पाहिजे, त्याला कर्मचारी वर्ग दिला पाहिजे. या नियंत्रण कक्षाने सर्व बाबींची पाहणी करुन राज्य दुष्काळ नियंत्रण समितीला दिले पाहिजे, असंही संहिता सांगते राज्यात दुष्काळ नियंत्रण कक्ष उभारणे बंधनकारक असताना राज्य सरकारने तो उभारला नाही. त्यामुळे संहितेनुसार प्रत्येक जिह्यातील परिस्थितीची पाहणी झालेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दरमहा जिल्हा दुष्काळ निवारण समितीची बैठक घ्यायला हवी, पण अशी बैठक झालेली नाही मंत्रालयातून अहवाल तयार करण्यात आल्यामुळे एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला, तर बाजूच्या तालुक्यात दुष्काळ नाही. कोर्टात आज राज्यातील दुष्काळ परिस्थितीबाबत सुनावणी झाली असता, संहितेप्रमाणे आम्ही दुष्काळ जाहीर केला नाही, कॅबिनेटची मान्यता घेऊन दुष्काळ जाहीर करु, असं सरकारी वकिलांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील कोणकोणत्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर?
31 ऑक्टोबरला दुष्काळाचा जीआर काढला, तरी त्याला अर्थ उरत नाही. कॅबिनेटमध्ये आज प्रस्ताव मंजूर झाला म्हणजे अधिकृतरित्या 1 नोव्हेंबरला दुष्काळ जाहीर झाला. मात्र संहितेनुसार 30 ऑक्टोबरपूर्वी दुष्काळ जाहीर करायला हवा. केंद्राच्या दुष्काळ संहितेनुसार दुष्काळ जाहीर न केल्यामुळे केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या मदत निधीमध्ये अडचण येऊ शकते. जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरला, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्य शासन परिशिष्ट 'अ' मध्ये नमूद केलेल्या 151 तालुक्यांमध्ये त्यांच्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे गंभीर/मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. 151 तालुक्यांव्यतिरीक्त ज्या महसुली मंडळांमध्ये 700 मिमी किंवा 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला तिथेही आज दुष्काळ जाहीर करण्यात आला. केंद्राकडे सादर केलेल्या व्यतिरिक्त ज्या महसुली मंडळांमध्ये 700 मिमी किंवा 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला ते दुष्काळी म्हणून जाहीर करायचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात अनधिकृत प्रवेश केला, महिलेची पोलिसांत फिर्याद
बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात अनधिकृत प्रवेश केला, महिलेची पोलिसांत फिर्याद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मे 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मे 2026 | शनिवार
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
Delhi Police: दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhishek Banerjee: बंगालमध्ये खासदार अभिषेक बॅनर्जींवर प्राणघातक हल्ला; दगड, चपला, अंडी फेकली, शर्ट फाडला; हेल्मेट घातल्यानं डोकं वाचलं, म्हणाले, 'अजून एक महिना सुद्धा झालेला नाही तोपर्यंत..'
Video: बंगालमध्ये खासदार अभिषेक बॅनर्जींवर प्राणघातक हल्ला; दगड, चपला, अंडी फेकली, शर्ट फाडला; हेल्मेट घातल्यानं डोकं वाचलं, म्हणाले, 'अजून एक महिना सुद्धा झालेला नाही तोपर्यंत..'
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कारची कंटेनरला धडक; 2 ठार 2 जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कारची कंटेनरला धडक; 2 ठार 2 जखमी
बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात अनधिकृत प्रवेश केला, महिलेची पोलिसांत फिर्याद
बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात अनधिकृत प्रवेश केला, महिलेची पोलिसांत फिर्याद
Gold : पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम! सोन्याची खरेदी 70 टक्क्यांनी घटली, 'जुने मोडून नवे' दागिने करण्याकडे कल
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम! सोन्याची खरेदी 70 टक्क्यांनी घटली, 'जुने मोडून नवे' दागिने करण्याकडे कल
Shekhar Suman Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला
Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला, 'काॅकरोच'वरूनही तुफानी टोलेबाजी
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
Rishabh Pant : रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद सोडलं, LSG चा कॅप्टन कोण होणार? टीम इंडियाच्या माजी खेळाडूनं तीन नावं सुचवली
रिषभ पंतनं आयपीएल संपण्यापूर्वी लखनौचं कर्णधार पद सोडलं, नवा कर्णधार कोण? भारताच्या माजी खेळाडूनं तीन नावं सुचवली
Bihar Politics : कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
Embed widget