एक्स्प्लोर

Dhananjay Deshmukh: 'आरोपींना अभय दिलं नसतं तर खून झाला नसता', CCTV सापडल्यानंतर धनंजय देशमुखांचा यंत्रणेवर ठपका, म्हणाले..

Dhananjay Deshmukh: याची जबाबदारी सीआयडी एसआयटीवर आहे .या सगळ्यांची उत्तर आम्हाला लेखी स्वरूपात हवी आहेत तोंडी घेणार नाही .असं धनंजय देशमुख म्हणाले .

Dhananjay Deshmukh: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात हत्या झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी पुण्याच्या दिशेने जातानाचा एक सीसीटीव्ही समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे . या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असा ठपका असणाऱ्या वाल्मीक कराडने (Walmik Karad) 31 डिसेंबर 2024 ला शरणागती पत्करण्यापूर्वी 3 आलिशान गाड्यांमधून बीड -मांजरसुंबा via पुण्यात जातानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे . याच गाड्यांच्या ताफ्यात वाल्मीक कराडची पांढरी स्कॉर्पिओ (white Scorpio)असल्याचाही सांगण्यात येत आहे .या गाड्यांमधूनच आरोपींना फरार करण्यासाठी मदत केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे . दरम्यान, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आरोपींना अभय दिलं नसतं तर खून झाला नसता. आता मात्र यंत्रणेवर शंका येत आहे. सीसीटीव्ही व्हिडिओ माध्यमांना भेटतात मग यंत्रणा त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही असा सवाल केला आहे .याबाबत आम्ही अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचंही धनंजय देशमुख म्हणालेत . (Santosh Deshmukh Case)

काय म्हणाले धनंजय देशमुख ?

मला यंत्रणेवर शंका येत आहे .याचे कारण सीसीटीव्ही व्हिडिओ माध्यमांना भेटतात मग यंत्रणा त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही ?माझ्या भावाचे ज्या आरोपी आहेत त्यांना शिक्षा देताना हे महत्त्वाचे आहे .माध्यमांना व्हिडिओ मिळतात मग यंत्रणेने केलं काय ?आमचा विश्वासघात झाला तर याला जबाबदार कोण याचे उत्तर आम्हाला हवं आहे .यंत्रणेने आत्तापर्यंत काय काय हस्तगत केले याची माहिती देशमुख कुटुंबाला दिली पाहिजे .यासाठी आम्ही अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत .जी घटना घडली त्यानंतर आरोपी सर्व जिल्ह्यात होते .सरेंडर होण्यासाठी त्या जिल्ह्याच्या बाहेर गेले . याची जबाबदारी सीआयडी एसआयटीवर आहे .या सगळ्यांची उत्तर आम्हाला लेखी स्वरूपात हवी आहेत तोंडी घेणार नाही .असं धनंजय देशमुख म्हणाले .

आरोपींना अभय दिलं नसतं तर हा खून झाला नसता- धनंजय देशमुख

आता मला संशय येतोय आरोपींना  फरार करण्यात आणि आसरा देण्यास मदत करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही ? या गोष्टीवर मला शंका आहे . याची माहिती मी घेणार आहे .जे समोर येत आहे त्यावर पोलीस यंत्रणा व्यक्त झाली नाही .कराड यांना कोठडीत कमी आणि हॉस्पिटलमध्ये अधिक राहायचे आहे .आम्ही पीडित कुटुंब आहे .यंत्रणा काय कारवाई केली पाहिजे हे त्यांनी ठरवलं पाहिजे .आरोपींना अभय दिलं नसतं तर हा खून झाला नसता असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय .

हेही वाचा:

Walmik Karad: 3 आलिशान गाड्या, CIDला शरण येण्याआधी मांजरसुंब्यात जेवण केलं,वाल्मीक कराडनं पुण्यात कसा पळ काढला?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?
मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?
Kolhapur News: कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jaisingh Mohite on BJP : विधानसभेला आतून मदत करण्यासाठी 50 कोटींची ऑफर, मोहितेंनी केली भाजपची पोलखोल
Sanjay Raut Full PC : एक महिन्यांनंतर राऊत मैदानात; निलेश राणेंचं कौतुक तर शिंदेंवर
Devendra Fadnavis On Nagarparishad Election Postponed : निवडणुका पुढे ढकलणं अतिशय चुकीचं
Dhairyasheel Mohite Speech : मी शंकरराव मोहिते पाटलांचा नातू, असेल हिम्मत तर आत टाकून दाखवा
Local Body Election:राज्यात नगराध्यक्षपदाच्या 22 निवडणुका लांबणीवर,अनगरचीही निवडणूक प्रक्रिया स्थगित

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?
मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?
Kolhapur News: कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
Winter Session Of Parliament: संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
Virat Kohli News : रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
Buldhana BJP : कुणी कुणाला मतं टाकली हे जर कुणाला बारकाईने समजत असेल तर ते फक्त आणि फक्त मला समजतं; भाजप आमदाराचं धक्कादायक वक्तव्य
कुणी कुणाला मतं टाकली हे जर कुणाला बारकाईने समजत असेल तर ते फक्त आणि फक्त मला समजतं; भाजप आमदाराचं धक्कादायक वक्तव्य
Jaya Bachchan On Marriage: 'लग्नसंस्था जुनी झालीये...', जया बच्चन यांचं स्पष्ट मत, नात नव्यानंही लग्न करु नये, व्यक्त केली इच्छा
'लग्नसंस्था जुनी झालीये...', जया बच्चन यांचं स्पष्ट मत, नात नव्यानंही लग्न करु नये, व्यक्त केली इच्छा
Embed widget