एक्स्प्लोर

मुंबईसह महाराष्ट्राला डेंग्यू, मलेरियाचा विळखा, रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबईः मुंबईसह राज्यामध्ये सध्या डेंग्यू आणि मलेरियाने थैमान घातलं आहे. डेंग्यूचे डास होऊ नये म्हणून पालिकेकडून फवारणी केली जातच आहे. मात्र प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर काळजी घेणं गरजेचं आहे. परिसरात स्वच्छता ठेवावी तसंच डासांचा कडक बंदोबस्त करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मुंबई-ठाण्यात डेंग्यूचं थैमान मुंबईत पडणारा पाऊस डेंग्यू आणि मलेरियांच्या डासांसाठी तारक ठरणारा आहे. त्यामुळेच मुंबई आणि ठाणे डेंग्यू-मलेरियाचं माहेरघर बनलं, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण गेल्या काही दिवसात मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश हॉस्पिटलमध्ये डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईत  डेंग्यूचे 160 रुग्ण आहेत. तर 1000 हून अधिक जणांना डेंग्यू झाल्याचा संशय आहे. ठाण्यात डेंग्यूचे 310 रुग्ण आहेत. तर डेंग्यू संशयितांचा आकडा 910 च्या घरात आहे. तर मलेरियाच्या रुग्णांची संख्या 1003 आहे. पुण्यात डेंग्यूसह चिकनगुनियाचं थैमान डेंग्यूमुळे पुण्याचा तापही वाढलाय. जुलैपासून आतापर्यंत बाराशेंहून अधिक रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या रुग्णाचा मृत्यूही झालाय. पुण्यात डेंग्यूसोबत चिकनगुनियानेही थैमान घातलं आहे. पुण्यातील चिकुनगुनिया संशयित रुग्णः जुलै- 27 ऑगस्ट - 119 सप्टेंबरमध्ये आतापर्यंत- 78 विदर्भातही डेंग्यूची साथ महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्येही डेंग्यूची साथ पसरली आहे. 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2016 विदर्भात डेंग्यूचे 63 रुग्ण आढळले आहेत. नागपूर विभागातील रुग्णांची संख्या नागपूर विभागात 27 नागपूर शहरात 16, नागपूर ग्रामीणमध्ये 7, गडचिरोलीत 2, वर्ध्यात 2 मराठवाड्याला डेंग्यूचा विळखा जिल्हा          रुग्ण       मृत्यू औरंगाबाद      12         0 जालना            17        2 परभणी            15        1 हिंगोली           03        0 नांदेड         94         0 लातूर             20        0 उस्मानाबाद    2          0 बीड           22            2 सध्या राज्यभर जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे अनेक भागात पाणी साचतं आणि हेच साचलेलं पाणी डासांसाठी घर बनतं. त्यामुळे आपल्या घराच्या आजूबाजूला पाणी साठणार नाही. याची काळजी घेणंही आवश्यक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Sanjay Raut : संजय राऊत यांचं
संजय राऊत यांचं नवं पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला,  "बोध कीर्तन" पुस्तकात नेमकं काय असणार? 
UP News: 'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
Embed widget