एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
महाराष्ट्राच्या दृष्टीने हा काळा दिवस : स्मिता पाटील
राज्यातील गुन्हेगारीला आळा बसावा आणि वाममार्गाला लागणाऱ्या तरुण पिढीला वाचवण्यासाठी आर.आर आबांनी डान्सबार बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. आज पुन्हा डान्सबारला परवानगी मिळते ही बाब खेदजनक आहे.
![महाराष्ट्राच्या दृष्टीने हा काळा दिवस : स्मिता पाटील Dance Bar Ban : This day is black day for Maharashtra, Smita Patil says महाराष्ट्राच्या दृष्टीने हा काळा दिवस : स्मिता पाटील](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/17175514/Smita-R-R-Patil.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांगली : डान्सबारला पुन्हा परवानगी मिळणे हा महाराष्ट्राच्या दृष्टीने काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी व्यक्त केली आहे. हा निर्णय म्हणजे राज्य सरकारच्या कर्माची फळं असल्याची टीकाही पाटील यांनी केली. याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून कायदा करण्याची मागणी करणार असल्याचे स्मिता पाटील यांनी म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाकडून महाराष्ट्रात डान्सबारला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात डान्सबारचा मार्ग खुले होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर स्मिता पाटील यांनी खेद व्यक्त केला आहे. स्मिता पाटील म्हणाल्या की, राज्यातील गुन्हेगारीला आळा बसावा आणि वाममार्गाला लागणाऱ्या तरुण पिढीला वाचवण्यासाठी आर.आर आबांनी डान्सबार बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. आज पुन्हा डान्सबारला परवानगी मिळते ही बाब खेदजनक आहे.
सरकारने कोर्टात योग्य भूमिका मांडली नाही. अनेक वेळा सरकारचे वकील सुद्धा गैरहजर राहिले. त्याचबरोबर 2016 मध्ये कायद्यात बदल केला त्याचा हा परिणाम असून डान्सबारला आज परवानगी मिळाली हे राज्य सरकारच्या कर्माचे फळ असल्याची टीका यावेळी स्मिता पाटील यांनी केली. डान्सबारवर बंदी यावी या मागणीसाठी लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आपण भेटणार असून आर.आर. पाटील फाउंडेशन आणि कुटुंबीयांच्या वतीने राज्यात डान्सबार बंदीसाठी आपण प्रयत्नशील राहू असेही स्मिता पाटील म्हणाल्या.
महाराष्ट्रात डान्सबारची छमछम सुरु होण्याचा मार्ग मोकळा
महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्सबारची छम-छम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील डान्स बारबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे अनेक नियम आणि अटी शिथिल केल्या. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे डान्स बार चालक आणि बारबालांना मोठा दिलासा मिळाला. बारबालांना गुणगौरव म्हणून टीप न देण्याची राज्य सरकारची अट रद्द करण्यात आली आहे. तर सीसीटीव्ही लावण्याचा नियमही शिथिल करण्यात आला आहे. आता संध्याकाळी 6 ते रात्री 11.30 वाजेपर्यंत महाराष्ट्रात डान्स बार सुरु राहणार आहेत. यामुळे बारबालांना पुन्हा रोजगार मिळण्याची आशा याचिकाकर्त्या वर्षा काळे यांनी व्यक्त केली आहे. नवे नियम काय? -डान्सिंग एरियामध्ये सीसीटीव्ही लावण्याचा नियम सुप्रीम कोर्टाकडून रद्द -बार आणि डान्सिंग एरिया वेगवेगळे ठेवण्याची अट शिथिल -बारबालांना टीप देण्यास परवानगी देण्यात आली असली, तरी ते पैसे बारबालांवर पैसे उधळता येणार नाहीत -बारबालांना डान्स बारमध्ये अश्लील नृत्य करण्यास मज्जाव -बारबालांना गुणगौरव म्हणून टीप न देण्याची राज्य सरकारची अट रद्द -डान्स बारमध्ये दारु पिण्यावर राज्य सरकारने घातलेली बंदी उठवली -महाराष्ट्रात संध्याकाळी 6 ते रात्री 11.30 वाजेपर्यंत डान्स बार सुरु राहणार -डान्स बार हे धार्मिक स्थळे आणि शाळा यापासून किमान एक किलोमीटर दूर ठेवण्याची अटही मागेराज्य सरकारने उगारलेल्या छडीची नको, तर घुंगरांची छमछम व्हावी, यासाठी डान्सबार चालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात अंतिम निकाल देण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या नव्या कायद्याविरोधात डान्सबार चालकांनी केलेल्या याचिकेवरील निर्णय यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. महाराष्ट्र सरकारने कायदे इतके कडक केले आहेत, की आम्हाला डान्स बारचा परवानाच मिळू दिला नाही, असा आरोप डान्स बार चालकांनी केला होता. या कायद्यामुळे महिलांचं शोषण आणि इतर गैरप्रकार रोखले जात आहेत, असा दावा सरकारने केला होता. सुप्रीम कोर्टाने डान्सबारला हिरवा कंदील दाखवल्यानंतर राज्य सरकारने काही 'संस्कारी' अटी आणि शर्थी घातल्या होत्या. 2005 साली डान्सबार बंदी दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपलं संपूर्ण राजकीय वजन पणाला लावून 2005 साली डान्स बार बंदीचा निर्णय घेतला होता. याविरोधात बार मालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने डान्स सुरु ठेवण्याचा निर्णय दिला होता. राज्य शासनाने याविरोधात पोलिस कायद्यात बदल केला. मात्र 16 जुलै 2013 रोजी सुप्रीम कोर्टाने डान्स बारवरील बंदी उठवली होती. ही बंदी उठवल्यानंतर तेव्हा पुन्हा एकदा याबाबत नवा कायदा लागू करण्यात आला होता. ज्यामध्ये मागील कायद्यातील त्रुटी काढून टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने पुन्हा ही बंदी 15 ऑक्टोबर 2015 रोजी घातली होती. सुप्रीम कोर्टात राज्य सरकारची भूमिका: - बारबालांसोबत बारमालकांनी करार करणे आवश्यक - बारबालांना ठराविक पगार आवश्यक, थेट बारबालांच्या बॅंक खात्यात जमा करणे अनिवार्य - वयाच्या 30 ते 35 वर्षांनंतर बारबालांना काम मिळत नाही. त्यांच्यासाठी करारपद्धती करा - बारबालांसाठी पीएफची सोय करा - बारबालांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, ते तपासून पहा - डान्स बारमध्ये अग्निशमन उपाय आणि महापालिका एनओसी अनिवार्य - डान्स बार धार्मिक स्थळे आणि शाळा यापासून किमान एक किलोमीटर दूर असावे - डान्स बारमध्ये ग्राहक लाखो रुपये उधळतात. त्याऐवजी ग्राहकाने दिलेली टीप बिलामध्ये समाविष्ट करावी. म्हणजे टॅक्स सरकारच्या तिजोरीत जमा होईल. पैसे उधळण्याची कृती करता कामा नये. - बारबालेशी गैरवर्तणूक केल्यास किंवा बारमध्ये वाद झाल्यास सीसीटीव्ही पुरावा म्हणून महत्त्वाचा. घटना घडल्याबरोबर आरोपीला पकडता येईल. डान्स बार चालकांची बाजू : - बारबालांसाठी नोकरीचा करार नको - बारबाला सतत काम बदलत असतात. त्यांना पैसे कसे द्यावे याचा अधिकार बारबालांवर सोडावा. - ग्राहकाने उधळलेले पैसे आणि टीप बिलात समाविष्ट करायला नको. - एक किमी अंतराचा नियम नको. मुंबईत तेवढी जागाच उरली नाही. - सुरक्षेच्या नावाखाली पोलिस जाच करतात. डान्सबारमध्ये सीसीटीव्ही नको.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
महाराष्ट्र
टेलिव्हिजन
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion