एक्स्प्लोर

गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे : एकनाथ खडसे

मृतांच्या नातेवाईकांना सरकारने आर्थिक मदत करायला हवी, अशी मागणी खडसे यांनी केली आहे. तसेच राज्यातील विविध प्रश्नांवर त्यांना आपले मत व्यक्त केले आहे.

  जळगाव :  वर्धा जिल्हयात हिंगणघाट येथे शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला जातो, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. सध्याच्या काळात अनेक घटना पाहता महिलांवर अत्याचार होण्याच्या घटनांत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकार प्रयत्न करीत असले तरी अशा मानसिक विकृतीच्या विरोधात घटना घडल्यानंतर त्वरित कठोर शासन करण्यात आले पाहिजे. न्यायालयाचा निर्णय त्वरित मिळाला तर अशा घटनांत गुन्हेगार लोकांवर वचक निर्माण होऊ शकेल आणि त्यावर प्रतिबंध लागू शकतो, असे मत भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील हिंगोणे येथे झालेल्या अपघातात बारा लोकांचा बळी गेला आहे. मात्र हे अवैध प्रवासी वाहतुकीचे बळी असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. अवैध रीतीने राख आणि रेती वाहतूक करण्यात येत आहे. त्याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. त्यावर नियंत्रण आणले तर निरपराध लोकांचं जीव वाचू शकतात. मृतांच्या नातेवाईकांना सरकारने आर्थिक मदत करायला हवी, अशी मागणी एकनाथ  खडसे यांनी केली आहे. जळगाव येथील खडसे यांच्या निवासस्थानी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. दिल्लीच्या निवडणुकीचा विचार केला तर भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीसाठी संपूर्ण देशभरातील आमदार खासदार आणि नेते या ठिकाणी जाऊन प्रचाराचे काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एखादया कार्यकर्त्याप्रमाणे घरोघर जाऊन प्रचार पत्रक वाटत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचं अभिनंद केलं पाहिजे, त्यांच्या प्रयत्नाला यश मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे मुलीचं लग्नाचं वय अठरा वर्ष वरून 21 वर्ष करण्याचा सरकार विचार करीत आहेत. सरकारच्या या निर्णयाच एकनाथराव खडसे यांनी समर्थन केले असून या निर्णयामुळे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळू शकेल. मात्र अठरा वर्षाचा कायदा असताना देखील आजही अनेक बालविवाह होत आहेत हे पाहता असा निर्णय झाला तर तो स्वागतार्ह आहे. मात्र त्याला किती यश मिळेल या विषयी त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्तीत केले आहे मनसेने बांगलादेशवासियांना मुंबई मधून चले जावं ची पोस्टरबाजी सुरू केली आहे. या घटनेच खडसे यांनी समर्थन केले आहे. बांगलादेश मधून मोठ्या संख्येने लोक भारतात येतात आणि या ठिकाणी येऊन अनेक जण गुन्हेगारी करतात, त्यामुळे त्यांना देशाबाहेर काढलाच पाहिजे. अगोदरच देशाची लोकसंख्या जास्त त्यात यांची भर पडल्याने नागरीसुविधांवर देखील त्याचा परिणाम होतो त्यामुळे अशा विचारांशी सहमत आहे. केंद्रानेही या प्रकारची भूमिका अगोदरच घेतली आहे, त्यामुळे मनसेच्या या भूमिकेचं आपण स्वागत करतो अस मत एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले आहे. Wardha | वर्ध्यातील हिंगणघाटात एकतर्फी प्रेमावरुन विकी नगराळेचा शिक्षिकेला जीवंत जाळण्याचा प्रयत्न
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: दिल्लीत आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक संचालन समितीची बैठक
Maharashtra Live Blog Updates: दिल्लीत आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक संचालन समितीची बैठक
Maharashtra Traffic Police: वसुलीसाठी जबरदस्ती करु नका, चालकांशी सौजन्याने वागा, अन्यथा...; वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांचे निर्देश
वसुलीसाठी जबरदस्ती करु नका, चालकांशी सौजन्याने वागा, अन्यथा...; वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांचे निर्देश
युद्धाचा परिणाम थेट उद्योगांवर, पाच दिवसांपासून बीडमध्ये ठिबक सिंचनच्या पाईपचे उत्पादन बंद, पुरवठ्याची साखळी विस्कळीत
युद्धाचा परिणाम थेट उद्योगांवर, पाच दिवसांपासून बीडमध्ये ठिबक सिंचनच्या पाईपचे उत्पादन बंद, पुरवठ्याची साखळी विस्कळीत
RTE Admission : आरटीई अंतर्गत दुर्बल घटकांच्या 25 टक्के जागांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार
आरटीई अंतर्गत दुर्बल घटकांच्या 25 टक्के जागांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget