एक्स्प्लोर

आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव कॅप्टन मुंबईत बसून नियंत्रण ठेवतायेत : शरद पवार

आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव कॅप्टन (मुख्यमंत्री ठाकरे) एका ठिकाणी बसून सगळी टीम काम करते आहे की नाही, यावर नियंत्रण ठेवत आहेत. असं सांगून शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची शनिवारी पत्रकार परिषदेत पाठराखण केली.

औरंगाबाद : कोरोनाचे सबंध महाराष्ट्रावर संकट आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यात जाऊन बसले तर बाकीच्या जिल्ह्यांच्या समस्यांवर तातडीने निर्णय घेता येणे अवघड होईल. आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव कॅप्टन (मुख्यमंत्री ठाकरे) एका ठिकाणी बसून सगळी टीम काम करते आहे की नाही, यावर नियंत्रण ठेवत आहेत. मला करमत नाही. मी सतत लोकांत राहणारा माणूस आहे, मला एका जागी बसवत नाही. म्हणून मी फिल्डवर जात असल्याचे सांगून शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची शनिवारी पत्रकार परिषदेत पाठराखण केली. 80 वयोमान असूनही राज्यातील विविध जिल्ह्यात जाऊन शरद पवार आढावा घेत आहेत पण मुख्यमंत्री काही बाहेर पडत नाही, या टीकेवर पवार यांनी भाष्य केले.

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनामुळे वाढलेला मृत्यूदर, प्रशासनाच्या उपाययोजना जाणून घेण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीला शरद पवार यांची विशेष उपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी बैठकीला होते.

भूकंप झाला होता तेव्हा त्या भागात मुख्यमंत्र्याचे कार्यालय हलवण्यापर्यंतची कार्यवाही शरद पवार यांनी केली होती. त्या संदर्भात विचारेल्या प्रश्नावर बोलाताना पवार म्हणाले, भूकंपाची आपत्ती तशी मर्यादित जिल्ह्यात आणि गावांमध्ये होती. त्यामुळे तेथे तसे करता आले. कोरोना ही समस्या संपूर्ण राज्यभर आहे. त्यामुळे राज्यातील सर्व माहिती मुख्यमंत्री स्वत: सकाळपासून संध्याकाळपर्यंत घेतात. तातडीने राज्याचे निर्णय घेण्यासाठी कॅप्टनने चमू नीट काम करतो आहे का हे पाहायचे असते. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. पालकमंत्र्यासह येथील नेते आवश्यकत त्या बाबी त्यांच्या कानावर घालत आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आवश्यक त्या बाबी कानावर टाकू, असं म्हणत मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीची शरद पवार यांनी पाठराखण केली.

पुढे ते म्हणाले की, मला अनेक संकटात अनेकांनी मदत केली आहे. त्यामुळे संकटाच्या काळात आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली पाहिजे, त्यांच्याशी बोलले पाहिजे. या कर्तव्य भावनेतून आपण दौरा करत आहोत. त्यामागे अन्य कोणताही उद्देश नाही. प्रश्न विचारताना वयाच्या उल्लेखावरुन त्यांनी मिश्किल टिप्पणीही केली. माझे वय 80 असताना तुम्ही ते 85 कशासाठी करता त्यावर माझा आक्षेप आहे, असे म्हणत शरद पवारांनी पत्रकार परिषदेचे वातावरण हलके राहील, असेही पाहिले.

आपत्ती व्यवस्थापन कायद्याांतर्गत खासगी डॉक्टरांना कामावर बोलावण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. अद्याप तशी वेळ आली नसल्याचे सांगत असे करता येईल, असेही त्यांनी सूचित केले. औरंगाबादमध्ये अल्पसंख्याक समाजाने सहकार्य केल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला. दोन दिवसापासून बकरी ईदसाठी सामुहिक नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. त्यांच्याकडे पाहून या पुढेही कोरोना काळात सहकार्य मिळेल, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली येथील कोरोनाची स्थिती काळजी करण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातही मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिली, नाशिक औरंगाबाद या शहराची स्थिती काळजी करण्यासारखी आहे. ऑगस्टमध्ये कदाचित करोनाची मोठी लाट आली तर खाटांची कमतरता भासू शकेल. त्यामुळे औरंगाबादमध्ये खाटा वाढवण्यासाठी काम करावे लागेल, अशी सूचना त्यांनी यावेळी प्रशासनास केली. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याांतर्गत खासगी डॉक्टरांना समन्स बजावून कामावर बोलावता येण्याची तरतूद आहे. अद्यााप तशी वेळ आली नाही. मात्र अशी तरतूद वापरता येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडये तसेच घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कानन येळीकर यांनी कोरोना संदर्भातील माहिती पालकमंत्री सुभाष देसाई व लोकप्रतिनिधीसमोर दिली. केंद्र सरकारकडे करोनाकाळात कोणती मागणी नोंदवायची याचा साधारण अंदाज यावा म्हणून दौरा करत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar | कॅप्टन एकाच ठिकाणी असावा म्हणून मुख्यमंत्री मुंबईत - शरद पवार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मे 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मे 2026 | शुक्रवार
Vidhan Parishad Election : तीन नाही तर आम्हाला सात जागा हव्यात, आता तडजोड नाही; शिवसेनेचा ठाम पवित्रा, भाजपची कोंडी? 
तीन नाही तर आम्हाला सात जागा हव्यात, आता तडजोड नाही; शिवसेनेचा ठाम पवित्रा, भाजपची कोंडी? 
Voter List Revision : ... तर मतदार यादीतून तुमचंही नाव गायब, महाराष्ट्रात मतदार याद्यांची मॅपिंग सुरु, 2002 च्या यादीशी तुमचं नाव जुळतंय का?
... तर मतदार यादीतून तुमचंही नाव गायब, महाराष्ट्रात मतदार याद्यांची मॅपिंग सुरु, 2002 च्या यादीशी तुमचं नाव जुळतंय का?

व्हिडीओ

Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipake : मोठी बातमी, अभिजीत दीपकेचं इन्स्टाग्राम खातं हॅक, कॉकरोच जनता पार्टीचं इन्स्टावरील बॅकअप अकाऊंट हटवलं
अभिजीत दीपकेचं इन्स्टाग्राम खातं हॅक, कॉकरोच जनता पार्टीचं इन्स्टावरील बॅकअप अकाऊंट हटवलं
NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
Ladki Bahin Yojana : ...पैशांची कमतरता असेल लाडकी बहीण योजना बंद करा, शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
...पैशांची कमतरता असेल लाडकी बहीण योजना बंद करा, शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
RBI कडून केंद्र सरकारच्या तिजोरीत 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश जमा,आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाचा मोठा निर्णय
RBI कडून केंद्र सरकारच्या तिजोरीत 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश जमा, सरकारला संकटकाळात दिलासा
NEET UG Paper Leak :  नीट यूजी परीक्षेचा पेपर लीक होताच लातूरमध्ये साफसफाई सुरु, उद्योग भवनातील क्लासेस, हॉस्टेल बंद करण्याचे आदेश  
 लातूरच्या ट्युशन एरियावर प्रशासनाचा दणका, उद्योग भवन मधील क्लासेस, हॉस्टेल तात्काळ बंद करण्याचे आदेश
Pune Rain : पुणे आणि पिंपरी चिंचवडला पावसानं झोडपलं, पुणेकरांची तारांबळ, उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा
पुणे आणि पिंपरी चिंचवडला पावसानं झोडपलं, पुणेकरांची तारांबळ, उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा
CET : राज्यात अभियांत्रिकी प्रवेश वेळेतच होणार, विद्यार्थी-पालकांनी संभ्रम बाळगू नये, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचा खुलासा
राज्यात अभियांत्रिकी प्रवेश वेळेतच होणार, विद्यार्थी-पालकांनी संभ्रम बाळगू नये : राज्य सामाईक परीक्षा कक्ष
Abhijeet Dipke: भारतातील 94 टक्के तरुणांना 'पाकिस्तानी' का म्हणता? थेट स्क्रीनशाॅट दाखवत अभिजित दीपकेची ट्रोलर्सना सणसणीत चपराक
भारतातील 94 टक्के तरुणांना 'पाकिस्तानी' का म्हणता? थेट स्क्रीनशाॅट दाखवत अभिजित दीपकेची ट्रोलर्सना सणसणीत चपराक
Embed widget