एक्स्प्लोर

Coronavirus Lockdown : नेता बोले अन् लॉकडाऊन हाले! औरंगाबाद, नांदेड, बीड, जालन्याला दिलासा मात्र परभणी, हिंगोली बंदच

कोरोनाची दुसरी लाट आली अन् मागच्या वर्षीपेक्षा भीषण परिस्थिती महाराष्ट्रावर ओढावली. देशात सार्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आणि मृत्यूदर असलेले मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि अहमदनगर हे 8 जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. प्रतिदिन हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. शिवाय अनेक रुग्णांना कोरोनामुळे जीवही गमवावा लागत आहे.

परभणी : "राजा बोले अन् दल हाले" ही जुनी प्रचलीत म्हण आता बदलून "नेता बोले अन् लॉकडाऊन हाले" अशी करावी लागणार आहे. कारण ज्या जिल्ह्यांना स्थानिक नेतृत्व आणि पालकमंत्री आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित केल्यानंतरही ते मागे घेण्यात आले. मात्र मुंबईकर पालकमंत्री असलेल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला इतर जिल्ह्यांच्या तुलनेने रुग्ण कमी असतानाही संचारबंदीचा सामना करावा लागत आहे. 

कोरोनाची दुसरी लाट आली अन् मागच्या वर्षीपेक्षा भीषण परिस्थिती महाराष्ट्रावर ओढावली. देशात सार्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आणि मृत्यूदर असलेले मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि अहमदनगर हे 8 जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. प्रतिदिन हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. शिवाय अनेक रुग्णांना कोरोनामुळे जीवही गमवावा लागत आहे. हे थांबवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? हे ना शासनाला कळतंय, ना जिल्हा प्रशासनाला. त्यामुळे लावा लॉकडाऊन अन् बंद पाडा शहर हे एकमेव धोरण सध्या अवलंबविलं जात आहे.

मुंबईत दिवसागणिक 5 हजार, पुण्यात 3 हजार,नागपुरात 6 हजार, औरंगाबादेत 1500 ते 2000, नांदेड 1000 अशी धडकी भरवणारी कोरोना रुग्णांची आकडेवारी या मोठ्या महानगरांची आहे. आता यातील मुंबई, पुण्यात निर्बंध आहेत. मात्र पुर्णतः ही शहर बंद नाहीत. औरंगाबाद, नागपूर, नांदेड या शहरांत लॉकडाऊन घोषित करण्यात आले. मात्र औरंगाबादला एमआयएम खासदार इम्तीयाज जलील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि प्रशासनाने लॉकडाऊन मागे घेतले. नागपुरातही लॉकडाऊन मागे घेण्यात आले. तर नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही रुग्णवाढ होत असताना लावलेले लॉकडाऊन मागे घ्यायला लावले. बीड मध्येही नागरिकांना दिलासा देण्यात आला. महत्वाचे म्हणजे आरोग्य मंत्र्यांच्या जालना जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरळीत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन विषयीची घेतलेली भूमिका दुटप्पी आणि चुकीची असल्याचा आरोप नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. 

परभणी जिल्ह्यात 15 मार्च ते 31 मार्च या 16 दिवसांत 5525 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 64 जणांचा मृत्यू झाला आहे. हिंगोलीत आजपर्यंत 6567 रुग्ण आढळले आहेत. तर 90 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. या दोन्ही जिल्ह्यांची आकडेवारीही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. त्यातच परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक हे मुंबईकर आहेत. शिवाय हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यादेखील मुंबईच्या असल्याने हे दोन्ही जिल्हे इतर जिल्ह्यांच्या तुलनेने कायम संचारबंदी अन्यथा लॉकडाऊनचा सामना करत आहेत. महत्वाचे म्हणजे, यावर एकही स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र आवाज ऊठवायला तयार नाही. त्यामुळे ही दुट्टपी भुमिका अन्यायाची असून याविरोधात आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप नेत्यांनी दिला आहे. 

पालकमंत्र्यांनी मुंबईतून निर्णय घ्यायचे अन् अधिकाऱ्यांनी एसीत बसून ते जाहीर करायचे आणि मोकळे व्हायचे हेच धोरण मागच्या वर्षभरापासून सुरु आहे. यामुळे सर्वसामान्य व्यापारी, मजूर वर्ग आता हतबल झाला आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले, लाखो बेरोजगार झाले. आज हातावर पोट असणाऱ्यांचे मोठे हाल होत आहे. महत्वाचे म्हणजे लॉकडाऊन किंवा संचारबंदीच्या काळातच रुग्णवाढ जास्त होत असल्याचे आजपर्यंतच्या आकड्यांवरून समोर येत आहे. त्यामुळे या संचारबंदी आणि लॉकडाऊनच विचार करणं गरजेचं आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: महिलेच्या लैंगिक शोषणाावरून सुरू झालेला तपास आता थेट नरबळीपर्यंत पोहोचला; अशोक खरात प्रकरणात खळबळ
Maharashtra Live Blog Updates: महिलेच्या लैंगिक शोषणाावरून सुरू झालेला तपास आता थेट नरबळीपर्यंत पोहोचला; अशोक खरात प्रकरणात खळबळ
Uddhav Thackeray On Eknath Shinde: एकनाथ शिंदेंकडून साहेब असा उल्लेख; उद्धव ठाकरे म्हणाले, काहीजण बोलत होते..., विधान परिषदेतील निरोपावेळी काय घडलं?
एकनाथ शिंदेंकडून साहेब असा उल्लेख; उद्धव ठाकरे म्हणाले, काहीजण बोलत होते..., विधान परिषदेतील निरोपावेळी काय घडलं?
VIDEO : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, पण दुरावा कायम;  निरोप समारंभातील फोटोसेशन चर्चेत
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, पण दुरावा कायम;  निरोप समारंभातील फोटोसेशन चर्चेत
Sugar Industry : साखर कारखान्यांना दिलासा! आर्थिक सहाय्यासाठी राज्यस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
साखर कारखान्यांना दिलासा! आर्थिक सहाय्यासाठी राज्यस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

व्हिडीओ

Ashok Kharat | खरातच्या दरबारात कुणाकुणाची हजेरी? Special Report
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं
Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : काँग्रेसच्या तुलनेत एक लिटर पेट्रोलवर मोदी सरकार किती टॅक्स लावते? खासदाराने आकडेवारीच मांडली
काँग्रेसच्या तुलनेत एक लिटर पेट्रोलवर मोदी सरकार किती टॅक्स लावते? खासदाराने आकडेवारीच मांडली
Rinku Singh: शाहरुख खानच्या लाडक्या रिंकू सिंगचं प्रमोशन, कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल सुरु होण्यापूर्वी मोठा निर्णय
रिंकू सिंगचं प्रमोशन, कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल सुरु होण्यापूर्वी मोठा निर्णय, कोणती जबाबदारी मिळाली?
Mhada Lottery 2026 : मुंबईकरांसाठी गुड न्यूज, लवकरच 2500 घरांसाठी लॉटरी निघणार, किंमत किती असणार? 
मुंबईकरांसाठी गुड न्यूज, लवकरच 2500 घरांसाठी लॉटरी निघणार, किंमत किती असणार? 
Air India : 19 मार्चला कॅनडाला जाणारं विमान चीनमधून परत फिरवण्याची वेळ,  8 तासात विमान पुन्हा दिल्लीत पोहोचलं, एअर इंडियावर नामुष्की का आली?
कॅनडाला जाणारं विमान चीनमधून परत फिरवण्याची वेळ, एअर इंडियावर नामुष्की कोणत्या कारणामुळं आली?
मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलणं गरजेच; विधानपरिषदेतील निवृत्तीच्या भाषणावरुन निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर जोरदार टीका
मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलणं गरजेच; विधानपरिषदेतील निवृत्तीच्या भाषणावरुन निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर जोरदार टीका
Ashok Kharat Property : नाशिक, अहिल्यानगर, पुणे अन् पनवेलमध्ये संपत्ती, भोंदू अशोक खरातच्या 40 कोटींच्या संपत्तीचा तपशील हाती, देवेंद्र फडणवीस यांची माहिती
भोंदू अशोक खरातची 40 कोटींची संपत्ती समोर, खरातची जमीन कोणत्या शहरात, देवेंद्र फडणवीस यांनी सर्व तपशील मांडला
अजित दादांच्या घराबाहेर काळी जादू, अनेक नेत्यांनी करंगळीही कापली; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, कोणाचं नाव घेतलं?
अजित दादांच्या घराबाहेर काळी जादू, अनेक नेत्यांनी करंगळीही कापली; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, कोणाचं नाव घेतलं?
... म्हणून रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार; अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन
... म्हणून रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार; अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन
Embed widget