एक्स्प्लोर

Coronavirus Lockdown : नेता बोले अन् लॉकडाऊन हाले! औरंगाबाद, नांदेड, बीड, जालन्याला दिलासा मात्र परभणी, हिंगोली बंदच

कोरोनाची दुसरी लाट आली अन् मागच्या वर्षीपेक्षा भीषण परिस्थिती महाराष्ट्रावर ओढावली. देशात सार्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आणि मृत्यूदर असलेले मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि अहमदनगर हे 8 जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. प्रतिदिन हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. शिवाय अनेक रुग्णांना कोरोनामुळे जीवही गमवावा लागत आहे.

परभणी : "राजा बोले अन् दल हाले" ही जुनी प्रचलीत म्हण आता बदलून "नेता बोले अन् लॉकडाऊन हाले" अशी करावी लागणार आहे. कारण ज्या जिल्ह्यांना स्थानिक नेतृत्व आणि पालकमंत्री आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित केल्यानंतरही ते मागे घेण्यात आले. मात्र मुंबईकर पालकमंत्री असलेल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला इतर जिल्ह्यांच्या तुलनेने रुग्ण कमी असतानाही संचारबंदीचा सामना करावा लागत आहे. 

कोरोनाची दुसरी लाट आली अन् मागच्या वर्षीपेक्षा भीषण परिस्थिती महाराष्ट्रावर ओढावली. देशात सार्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आणि मृत्यूदर असलेले मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि अहमदनगर हे 8 जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. प्रतिदिन हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. शिवाय अनेक रुग्णांना कोरोनामुळे जीवही गमवावा लागत आहे. हे थांबवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? हे ना शासनाला कळतंय, ना जिल्हा प्रशासनाला. त्यामुळे लावा लॉकडाऊन अन् बंद पाडा शहर हे एकमेव धोरण सध्या अवलंबविलं जात आहे.

मुंबईत दिवसागणिक 5 हजार, पुण्यात 3 हजार,नागपुरात 6 हजार, औरंगाबादेत 1500 ते 2000, नांदेड 1000 अशी धडकी भरवणारी कोरोना रुग्णांची आकडेवारी या मोठ्या महानगरांची आहे. आता यातील मुंबई, पुण्यात निर्बंध आहेत. मात्र पुर्णतः ही शहर बंद नाहीत. औरंगाबाद, नागपूर, नांदेड या शहरांत लॉकडाऊन घोषित करण्यात आले. मात्र औरंगाबादला एमआयएम खासदार इम्तीयाज जलील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि प्रशासनाने लॉकडाऊन मागे घेतले. नागपुरातही लॉकडाऊन मागे घेण्यात आले. तर नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही रुग्णवाढ होत असताना लावलेले लॉकडाऊन मागे घ्यायला लावले. बीड मध्येही नागरिकांना दिलासा देण्यात आला. महत्वाचे म्हणजे आरोग्य मंत्र्यांच्या जालना जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरळीत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन विषयीची घेतलेली भूमिका दुटप्पी आणि चुकीची असल्याचा आरोप नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. 

परभणी जिल्ह्यात 15 मार्च ते 31 मार्च या 16 दिवसांत 5525 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 64 जणांचा मृत्यू झाला आहे. हिंगोलीत आजपर्यंत 6567 रुग्ण आढळले आहेत. तर 90 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. या दोन्ही जिल्ह्यांची आकडेवारीही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. त्यातच परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक हे मुंबईकर आहेत. शिवाय हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यादेखील मुंबईच्या असल्याने हे दोन्ही जिल्हे इतर जिल्ह्यांच्या तुलनेने कायम संचारबंदी अन्यथा लॉकडाऊनचा सामना करत आहेत. महत्वाचे म्हणजे, यावर एकही स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र आवाज ऊठवायला तयार नाही. त्यामुळे ही दुट्टपी भुमिका अन्यायाची असून याविरोधात आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप नेत्यांनी दिला आहे. 

पालकमंत्र्यांनी मुंबईतून निर्णय घ्यायचे अन् अधिकाऱ्यांनी एसीत बसून ते जाहीर करायचे आणि मोकळे व्हायचे हेच धोरण मागच्या वर्षभरापासून सुरु आहे. यामुळे सर्वसामान्य व्यापारी, मजूर वर्ग आता हतबल झाला आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले, लाखो बेरोजगार झाले. आज हातावर पोट असणाऱ्यांचे मोठे हाल होत आहे. महत्वाचे म्हणजे लॉकडाऊन किंवा संचारबंदीच्या काळातच रुग्णवाढ जास्त होत असल्याचे आजपर्यंतच्या आकड्यांवरून समोर येत आहे. त्यामुळे या संचारबंदी आणि लॉकडाऊनच विचार करणं गरजेचं आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget