एक्स्प्लोर

'आरोग्य पंढरी झाली कोरोनानगरी', सांगली जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

सांगली जिल्हा हा राज्यभर आरोग्यपंढरी म्हणून ओळखला जातो. पण प्रशासनच्या चुकीच्या नियोजनामुळे आरोग्यपंढरीची मृत्यू पंढरी झाली आहे.

सांगली : सांगली जिल्ह्यात सोमवारी (31 ऑगस्ट) कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिवसभरात तब्बल 998 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.त्यामुळे आता पर्यंतचे कोरोनारुग्ण संख्येचे सर्व रेकॉर्ड ब्रेक झाले आहेत. तर 30 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपैकी तब्बल 223 रुग्ण हे सांगली महापालिका क्षेत्रातील आहेत, ज्यामध्ये 138 सांगली शहरातील तर 85 हे मिरज शहरातील आहेत.तर मिरज आणि वाळवा तालुक्यात प्रत्येकी 170 रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सोमवारी दिवसभरात तब्बल 375 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत.नव्या कोरोना रुग्णांच्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना संख्या ही 4 हजार 543 तर आज पर्यंतचा एकूण आकडा हा 12 हजार 394 झाला आहे, आता पर्यंत 7 हजार 356 जण कोरोना मुक्त,आणि आज अखेर 495 जणांचा मृत्यू झाला आहे,तसेच 661 जण हे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

मार्च महिन्यात मुंबई, पुणे पाठोपाठ कोरोना रुग्णाच्या संख्येत सांगली जिल्ह्याचा नंबर लागला होता. तो पण इस्लामपूर मध्ये एकाच ठिकाणी 27 हुन अधिक रुग्ण सापडले गेल्याने.मात्र नंतर या 27 रुग्णावर उपचार झाले आणि सर्वजण कोरोना रुग्ण मुक्त झाले. यामुळे सांगलीच्या कोरोना मुक्त पॅटर्नची बरीच चर्चा देखील झाली. पण जुलै -ऑगस्ट मध्ये पुन्हा जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने डोके वर काढले आणि जिल्हा पुन्हा कोरोनाच्या सावटाखाली गेला. अनेकवेळा लॉकडाऊन केला मात्र रुग्ण संख्या काही कमी होऊ शकली नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग झालाय. आता तर दिवसाला 1 हजार इतके रुग्ण सापडू लागल्याने यंत्रणेची आणि जिल्हावासियांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. एकीकडे पॉझिटीव्ह रुग्ण संख्या वाढत असताना मृत्यूदर ही राज्याच्या सरासरी पेक्षा पुढे गेला आहे. काही दिवसापूर्वी स्वतः आरोग्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील मृत्यूदराबाबत चिंता व्यक्त करत मृत्यू रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. मात्र अजून पर्यंत तरी यंत्रणा मृत्यूदर आणि कोरोना रुग्ण संख्ख्या आटोक्यात आणू शकलेली नाही.

सांगली जिल्ह्यात आणि महापालिका क्षेत्रात कोरोनाचा आता उद्रेक झालाय. गेल्या चार दिवसात दोन हजार रुग्ण वाढले. तर मृतांची संख्याही वाढत आहे. सांगलीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 950 वर गेला आहे. 29 जुलैला सांगलीत मृतांची सख्या 70 इतकी होती. तीच संख्या 29 ऑगस्टला 465 इतकी झाली आहे. जिल्ह्याचा मृत्यू दरही चार टक्के इतका आहे. तोही राज्यात नव्हे तर देशात जास्त आहे. जिल्ह्यात "कम्युनिटी स्प्रेडिंग सुरु झालं आहे. प्रशासनाने खासगी रुग्णालये अधिग्रहीत केलीत पण, तेथील कारभाराबाबत तक्रारी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आता कमी पडत आहे. त्यामुळे तातडीने जिल्ह्यात जम्बो हॉस्पिटल उभारण्याची मागणी होऊ लागली आहे. शिवाय तालुका स्तरावर कोरोना रुग्णालये उभारावीत आणि कोरोनारुग्ण मुक्त होत असलेल्या रुग्णाचा प्लाझ्मा घ्यावा, यासाठी प्लाझ्मा केंद्र उभारावित अशी मागणी कोरोनावर मात केलेली लोकप्रतिनिधी करत आहेत.

तसे सांगली ही राज्यभर आरोग्यपंढरी म्हणून ओळखली जाते. पण प्रशासनच्या चुकीच्या नियोजनामुळे आरोग्यपंढरीची मृत्यू पंढरी झाली आहे. 10 हजाराच्यावर जिल्ह्यातील रुग्ण संख्या गेली असताना आणि रुग्ण संख्या वाढणार हे माहित असताना देखील अजून पर्यंत बेडची संख्या वाढवली नसल्याने एका सिरीयस रुग्णासाठी बेड ,ऑक्सीजन मिळवताना रुगणाची हेळसांड होत आहे. त्यामुळे युद्धपातळीवर सांगलीत हॉस्पिटल उभारण्याची मागणी नागरिक करत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थती हाताबाहेर गेल्याने व व्हेंटीलेटर बेड अभावी नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासनाने एककल्ली कारभार बंद करून जिल्ह्यातील आय एम ए व जनरल प्रॅक्टिशनर फोरम च्या डाॅक्टरांना विनंती करून त्यांना विश्वासात घेवून त्यांना कोरोना नियंत्रणासाठी सहभागी करून घ्यावे अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

एकीकडे मुंबई मधील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना सांगली सारख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने आता जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्य पातळीवरील आरोग्य यंत्रणा जिल्ह्यात राबवणे गरजचे बनले आहे.

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Gopichand Padalkar on Jayant Patil: जयंत पाटलांना 40 वर्षात ईश्वरपूरचा रस्ता बांधता आला नाही अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
जयंत पाटलांना 40 वर्षात ईश्वरपूरचा रस्ता बांधता आला नाही अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
Farmers Loan Waiver Maharashtra: मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडली, महायुती सरकारने काय कारण सांगितलं?
मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडली, महायुती सरकारने काय कारण सांगितलं?
Operation Tiger 3: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? 'ऑपरेशन टायगर 3'च्या वेगवान हालचाली ; ठाकरेंचे 10 आमदार अन् शरद पवारांचे खासदार एकनाथ शिंदेंच्या रडारवर
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? 'ऑपरेशन टायगर 3'च्या वेगवान हालचाली ; ठाकरेंचे 10 आमदार अन् शरद पवारांचे खासदार एकनाथ शिंदेंच्या रडारवर

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
Akshay Kumar on Rajesh Sharma: अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
Nashik Crime News: शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Chanakya Niti: तुमचा खरा मित्र कोण? 'या' 5 परिस्थितीवरून सहज ओळखा, चाणक्यनीतीत सांगितलेलं गुपित ओळखा...
तुमचा खरा मित्र कोण? 'या' 5 परिस्थितीवरून सहज ओळखा, चाणक्यनीतीत सांगितलेलं गुपित ओळखा...
Embed widget