एक्स्प्लोर

संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेऊन सांगलीत प्रशासनाची तयारी

सांगली महापालिका क्षेत्रात मागील महापुराचा अनुभव आणि काही त्रुटी याचा विचार करून यंदाचा आपत्ती नियोजन आराखडा महापालिकेने तयार केला आहे. मागील आपत्ती वेळी अचानक पाणी वाढले आणि नियोजनात त्रुटीही निर्माण झाल्या होत्या.

सांगली : यंदा हवामान विभागाने अतिवृष्टीचा दिलेला इशारा, मागील वर्षीचा महापुराचा अनुभव आणि यंदाही संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेऊन सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये पूर पट्ट्यात पाच ठिकाणी 24 तास बोट स्टेशन कार्यरत असणार आहेत तर हायरिस्क परिसरातील 15 ठिकाणावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून यंत्रणेचा वॉच राहणार आहे. कृष्णा नदीने 20 फुटाची पातळी ओलांडताच पूर पट्ट्यातील नागरिकांना सक्तीने स्थलांतरीत होण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे पुराच्या संकटापूर्वीच नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे नियोजन आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडून करण्यात आले आहे. मात्र यंदाच्या आपत्तीत नागरिकांना वेळेपूर्वीच सुरक्षितपणे बाहेर पडावे लागणार आहे. याचबरोबर कोरोनाच्या महामारीमुळे यंदा पूरग्रस्त म्हणून कोणालाही एकत्र ठेवले जाणार नसल्याने पूर पट्ट्यातील नागरिकांना आपली व्यवस्था स्वतःच करावी लागणार आहे. त्यामुळे आयुक्तांच्या या नियोजनामुळे नागरिकांना आपले नुकसान टाळता येणार आहेत शिवाय कोणतीही जीवित हानीही होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. सांगली महापालिका क्षेत्रात मागील महापुराचा अनुभव आणि काही त्रुटी याचा विचार करून यंदाचा आपत्ती नियोजन आराखडा महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी तयार केला आहे. मागील आपत्ती वेळी अचानक पाणी वाढले आणि नियोजनात काहीश्या त्रुटीही निर्माण झाल्या. मात्र मागील पुराचा अनुभव लक्षात घेता आयुक्त कापडणीस यांनी आपल्या पूर आपत्तीचा आराखडा तयार केला आहे. यासाठी महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे प्रमुख चिंतामणी कांबळे यांची टीम सज्ज झाली आहे. यामध्ये महापालिकेने सर्व आपत्कालीन यंत्रणेसह मनुष्यबळ, स्वयंसेवी संस्था, तसेच आपत्ती मित्र यांच्याशी समन्वय साधत यंदाचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनानुसार महापालिका यंत्रणा कृष्णा नदीची पाणीपातळी 20 फूट ओलांडताच मनपा यंत्रणा पुरपट्ट्यातील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याबाबतचे आवाहन पोलिसांच्या मदतीने करणार आहे. पुराच्या स्थितीत शहराचा पाणीपुरवठा नियमित राहील याबाबत सुद्धा नियोजन केले आहे. आपत्कालीन स्थितीत मोबाईल यंत्रणा सुरळीत राहावी, यासाठी सुद्धा योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. याचबरोबर पूर पट्ट्यातील लोकांना आपत्ती पूर्व प्रशिक्षण दिले जात असून आपत्ती काळात सेवेसाठी स्वतंत्र पथकही असणार आहे. याचबरोबर आपत्ती काळात कोणतीही जीवितहानी होणार नाही याबाबत मनपाचे प्रशासन काळजीपूर्वक प्रयत्न करीत असून मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे सर्व आपत्कालीन विभाग सज्ज झाले आहेत. सध्या निसर्ग चक्री वादमाळमुळे पर्जन्यवृष्टी सुरू आहे. धरणातील विसर्ग पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत अचानक वाढ संभवत नाही. आर्यविन पुल, सांगली येथील नदीतील पाणी पातळी बंधाऱ्यातील पाणी साठ्यामुळे 5 फूट 9 इंच इतकी आहे. सध्या कोयना, धोम, कन्हेर, उरमोडी, तारळी, वारणा धरणातून पूरनियंत्रणासाठी पाणी सोडण्याची शक्यता नाही. त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे. आपत्तीसाठी मनपाची सज्ज यंत्रणा - एकूण फायर कर्मचारी 62 - अग्निशामक गाड्या 7, 1 रेस्क्यू व्हॅन - 50 लाईफ जॅकेट, 25 लाईफ रिंग - वुड कटर 10, कॉम्बी टूल्स 2 - यांत्रिक फायबर बोटी 7 , ओबीएम मशीन 7 - आपत्ती काळातील साहित्य उपलब्ध असे असेल नियोजन
  • पाच ठिकाणी 24 तास बोट स्टेशन
  • सांगली वाडी, कर्नाळ चौकी, टिळक चौक, होंडा शोरूम, कृष्णा घाट मिरज या प्रत्येक ठिकाणी 1 बोट आणि चार कर्मचारी कार्यरत असणार आणि लोकांना मदत करणार
  • मोठे पुरवठादार, एनजीओ स्वयंसेवक, स्वीमर यांच्याशी समन्वय मनपाचा समन्वय असणार
  • मंगलधाम मध्ये 15 दिवसात वेधर मोनिटरिंग स्टेशन सुरू होईल तसेच आपती नियोजन प्रशिक्षणाचा हॉलही कार्यान्वित होईल
  • आपत्तीपूर्व प्रशिक्षण लोकांमध्ये जा जागृती, तात्पुरत्या व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या जात आहे
  • पाणी पातळी वाढत चालल्यास 15 ठिकाणी लावण्यात आलेल्या कॅमेरेद्वारे पूरपातळी रेषेवर वॉच राहणार
  •  आपत्ती काळात पोलिसांची मदत घेऊन लोकांना स्थलांतरीत होण्याची विनती करणार
  • आपत्ती काळात मोबाईल टॉवर, एमएसइबी यांना सतर्क केले जाणार
  • इमर्जन्सी सेवेसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार
कर्मचारी सुरक्षेबाबत दक्षता मनपा वैद्यकीय पथक तैनात असणार जे आपत्तीपूर्व आणि नंतर तसेच वेळोवेळी तपासणी करेल नागरिकांनी या गोष्टी कराव्यात
  • कृष्णा नदीने 25 फुटाची पातळी ओलांडली तर लोकांनी सुरक्षितपणे आपले साहित्य, जनावरांसहित बाहेर स्थलांतरित व्हावे
  • मुख्य मार्गावरील दुतर्फा पार्क केलेल्या गाड्या रिकाम्या जागी लावाव्यात
  • आपल्या घरातील महत्वाची कागदपत्रे किंवा साहित्य वेळीच हलवावे
सध्याच्या घडीला धरणामध्ये असलेला पाणीसाठा व कंसात विसर्ग क्युसेक्समध्ये कोयना 32 टक्के (2100) धोम 40 टक्के (584) कन्हेर 26 टक्के (325) उरमोडी 62 टक्के (262) तारळी 39 टक्के (450) वारणा 33 टक्के (निरंक).
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जून 2026 | गुरुवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जून 2026 | गुरुवार
Mumbai Goa Highway : 31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला
31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला
Prashant jagtap : शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केला; श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा गंभीर आरोप
शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केला; श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा गंभीर आरोप
Maharashtra Live News Updates: विधान परिषद निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याची मुदत संपली
Maharashtra Live News Updates: विधान परिषद निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याची मुदत संपली

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget