एक्स्प्लोर

Ambadas Danve : खून, खंडणी प्रकरणातील आरोपींसोबत मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

Ambadas Danve : अयोध्या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानातून खून, खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगेला नेण्यात आल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.

Ambadas Danve On  CM Eknath Shinde Ayodhya Tour : राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रविवारी आपल्या आमदार, खासदारांसह अयोध्या दौरा केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अनेक भाजप नेते देखील उपस्थित होते. मात्र हा अयोध्या दौरा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आला आहे. तर विरोधकांनी देखील या दौऱ्यावरून भाजप-शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान याचवेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ट्वीट करत या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अयोध्या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानातून खून, खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगेला नेण्यात आल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी एक फोटो देखील ट्वीट केला आहे. 

अंबादास दानवे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "काय हा 'फडतूस'पणा?... अगोदर गुजरातला वॉशिंग मशीन लावून गद्दार धुतले. आता पवित्र अशा अयोध्येत मशीन लावून खून, खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगे तेथे धुवायला नेलेला वाटतं. ते ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानातून...आता हे तुम्हाला चालते का? देवेंद्र फडणवीस जी?... असे दानवे यांनी म्हटले आहे. 

कोण आहे सिद्धेश अभंगे? 

अंबादास दानवे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यात त्यांच्याच विमानातून कुख्यात गुंड सिद्धेश अभंगे प्रवास करत असल्याचा आरोप केला आहे. सोबतच त्यांनी एक फोटो देखील ट्वीट केला आहे. तर सिद्धेश अभंगे हा ठाण्यातील कुख्यात गुंड असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी त्याच्यावर ठाणे पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई देखील केली होती. तर याच कारवाईनंतर त्याची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. 2020 मध्ये त्याची तुरूंगातून सुटका झाली होती. तर नाशिक कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी समर्थकांची तुफान गर्दी उसळली होती. त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला होता.  

जयंत पाटलांची टीका...

शिंदे गटासह भाजप नेत्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील टीका केली आहे. राज्यातील शेतकरी संकटात आहे. अनेक भागात गारांचा पाऊस सुरु असताना सरकारचे दुलर्क्ष होत आहे. शेतकरी संकटात असताना राज्यातील मंत्री अयोध्येत जाऊन बसले आहेत. पहिल्यांदा सरकार आल्याने सर्वचसर्व मंत्रीमंडळ अयोध्येत गेले असून, दुसरीकडे शेतकरी मात्र संकटात असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

CM Eknath Shinde : आयोध्येत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन बांधणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget