एक्स्प्लोर

कलम 45 घटनाबाह्य, छगन भुजबळांना दिलासा मिळणार?

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा अर्थात मनी लाँड्रिंगमधलं कलम 45 हे घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा अर्थात मनी लाँड्रिंगमधलं कलम 45 हे घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या कलमानुसार आरोपींना जामीन नाकारण्यात येत होता, मात्र हे कलम रद्द झाल्याने या प्रकरणातल्या सर्व आरोपींना जामिन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार आहे. यावेळी कोर्टाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाची दखल घेतली जाऊ शकते. याआधी उच्च न्यायालयाने डिसेंबर 2016 मध्ये छगन भुजबळांचा जामीन अर्ज नाकारला होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाने हे कलम रद्द ठरवल्यानंतर आता छगन भुजबळांतर्फे पुन्हा कोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला. कलम 45 घटनाबाह्य, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी जामीन मिळणं सोपं! आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग कायद्यातंर्गत तुरुंगात असणाऱ्या अनेक आरोपींची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. कारण या कायद्याचं कलम 45 हे घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. तसंच कलम 45च्या शर्तींनुसार ज्या आरोपींना जामीन नाकारण्यात आला होता ते आदेशही सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवले आहेत. त्यामुळं ज्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत त्यांना जामीन मिळण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, पीएमएलए कायद्यातील  कलम 45 हे  ‘ब्लॅक मनी’ला चाप लावण्यात महत्त्वाचे अस्त्र असल्याचे केंद्र सरकारला वाटत होते. मात्र, आता सुप्रीम कोर्टाने हे कलमच घटनाबाह्य ठरवल्याने सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आरोपींना पुन्हा जामीन अर्ज करण्याची संधी या प्रकरणात ज्यांना आधी जामीन मिळाला नव्हता ते आता पुन्हा एकदा जामीनासाठी अर्ज करु शकतात. असं कोर्टानं यावेळी स्पष्ट केलं आहे. अनेकजण जामीन न मिळाल्यानं गेले अनेक वर्ष जेलमध्येच आहेत. त्यामुळे खालच्या कोर्टानं त्यांच्या जामीन अर्जावर नव्यानं विचार करावा. असा आदेशही कोर्टानं दिला आहे. कलम 45 मध्ये नेमकं काय म्हटलं होतं? कलम 45 नुसार न्यायाधीश आरोपीला तेव्हाच जामीन देऊ शकतं जेव्हा त्यांना पूर्णपणे खात्री असेल की आरोपीनं कोणाताही गुन्हा केलेला नाही. तसेच न्यायाधीशांना याचीही खात्री असायला हवी की, जामीन मिळाल्यावर तो पुन्हा कोणताही गुन्हा करणार नाही. अशा अटी या कलमामध्ये घालण्यात आल्या होत्या. सरकारची मागणी कोर्टानं फेटाळली काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी हे कलम अतिशय महत्वाचं असल्याचं सरकारच्या वतीनं कोर्टात सांगण्यात आलं. मात्र, पण यावर बोलताना कोर्टानं स्पष्ट केलं की, लोकांचं वैयक्तिक स्वातंत्र्य ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यकर्त्यांचं मराठी शाळांच्या जागेवर लक्ष्य; मुंबईतील 'भैय्यांना' मराठी शिकवणाऱ्यांनाही राज ठाकरेंनी सुनावलं
राज्यकर्त्यांचं मराठी शाळांच्या जागेवर लक्ष्य; मुंबईतील 'भैय्यांना' मराठी शिकवणाऱ्यांनाही राज ठाकरेंनी सुनावलं
RPF जवान देवदुतासारखा धावला; ट्रेनमधून उतरणाऱ्या माय-लेकराचा जीव वाचला, कल्याण स्थानकावरील थरार
RPF जवान देवदुतासारखा धावला; ट्रेनमधून उतरणाऱ्या माय-लेकराचा जीव वाचला, कल्याण स्थानकावरील थरार
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची फोनवरुन चर्चा; विधानपरिषदेसाठी मुंबईतल्या नावावर शिक्कामोर्तब? रात्री उशिरा जाहीर होणार
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची फोनवरुन चर्चा; विधानपरिषदेसाठी मुंबईतल्या नावावर शिक्कामोर्तब? रात्री उशिरा जाहीर होणार
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?

व्हिडीओ

Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report
Pune Christian Conversion : पुण्यात पर्यटक म्हणून आले... धर्मप्रचाराला लागले Special Report
Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report
Vidhan Parishad Election MVA : काँग्रेसला न सांगताच दानवेंच्या नावाची घोषणा? Special Report
Sanjay Raut Pune : उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढणार? सस्पेन्स कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Exit Poll : आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
West bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
Congress : काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेनेच्या एकतर्फी वागण्यावर नाराज, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 मतांसाठी प्रयत्न करणार,विधानपरिषदेवरुन मविआला तडे?
राज्यसभेला शरद पवारांना पाठिंबा दिला, आता राष्ट्रवादीनं आम्हाला पाठिंबा द्यावा, काँग्रेसची भावना, सूत्रांची माहिती
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
Riyan Parag : पंजाबचा विजयरथ रोखणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, बीसीसीआयनं नोटीस पाठवलं, एका व्हिडिओनं खळबळ
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, एका व्हिडिओनं खळबळ, बीसीसीआयची आक्रमक भूमिका
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही पाचपर्यंत बंपर मतदान; सीएम ममतांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, 'CRPF ने सर्व मतदान केंद्रे बळकावली, सीमा रक्षणाऐवजी एका राजकीय पक्षाचे रक्षण करत आहेत'
बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही पाचपर्यंत बंपर मतदान; सीएम ममतांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, 'CRPF ने सर्व मतदान केंद्रे बळकावली, सीमा रक्षणाऐवजी एका राजकीय पक्षाचे रक्षण करत आहेत'
Embed widget