एक्स्प्लोर

CBSE Board Exams Date:  26 एप्रिलपासून सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा ; शेवटच्या आठवड्यात लेखणाचा सराव महत्वाचा, तज्ज्ञांचा सल्ला 

CBSE Board Exams Date : CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहेत. CBSE बोर्डाची 10वीची परीक्षा 24 मे पर्यंत, तर 12वीची परीक्षा 15 जून 2022 पर्यंत चालणार आहे.

CBSE Board Exams Date : सीबीएसई ( CBSE) च्या दुसऱ्या टर्मच्या परीक्षा (Exams) सुरू होण्यासाठी फक्त 10 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहेत. CBSE बोर्डाची 10वीची परीक्षा 24 मे पर्यंत, तर 12वीची परीक्षा 15 जून 2022 पर्यंत चालणार आहे. या परीक्षेसाठी तज्ज्ञांनी काही सल्ले दिले आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना लिखाणाची सवय नाही. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी लिखाणाचा सराव करणे खूप आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.  

 CBSE बोर्डाच्या परीक्षा 2022 पूर्वी वर्षातून एकदाच होत होत्या. परंतु, यावेळी देशभरातील कोरोनाची परिस्थिती पाहता सीबीएसई बोर्डाकडून ही परीक्षा दोन टर्ममध्ये घेतली जात आहे. CBSE टर्म 1 ची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये झाली आहे. विद्यार्थ्यांनी तब्बल दोन वर्षांनी लेखी परीक्षा दिली होती, त्यामुळे या परीक्षेची पद्धत वस्तुनिष्ठ ठेवण्यात आली होती.  

येणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी लिखाणाचा सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी लेखणाच्या सरावासह वेळेचे नियोजन केले पाहिजे. विद्यार्थ्यांना या परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर त्यासाठी लेखन हा खूप महत्वाचा भाग आहे. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन शिक्षण झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय मोडली आहे. त्यामुळे या परीक्षेत जास्त गुण मिळवायचे असतील तर विद्यार्थ्यांनी लिखाणाचा सराव करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. 

ऑफलाइन शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास आणि गृहपाठ दिला जातो. त्यामुळे त्यांचा लेखनाचा पुरेसा सराव होतो. शिवाय शाळेत घेण्यात येणाऱ्या नियमित चाचण्यांमुळे विद्यार्थ्यांना लिखाणासाठी वेगळा असा सराव करावा लागत नाही. बोटांच्या आणि हातांचा स्नायूंना सवय होण्यासाठी लेखणाचा नियमित सराव आवश्यक आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी सलग दोन-तीन तास लिखाण केले तरी त्याचा कोणताही त्रास होणार नाही. याबरोबरच परीक्षेत चांगले गुण मिळवू शकत नसलेल्या आणि अभ्यासात कमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लिखाणाचा वेग फार महत्वाचा आहे. एवढेच नाही तर या वेगासह अचूक लिहिणेही खूप महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांना दोन तासांत 40 गुणांचा पेपर पूर्ण करायचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना राहिलेल्या दिवसांत लिखाणाचा सराव करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

महत्वाच्या बातम्या

CBSE विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; पुढील वर्षापासून 10वी, 12वीची परीक्षा एकदाच होणार

NEET 2022 Date : 17 जुलैला 'नीट' परीक्षा, तर 6 मेपर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Laxman Hake : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू! उद्या तारीख,वेळ आणि ठिकाण जाहीर करणार
लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू! उद्या तारीख,वेळ आणि ठिकाण जाहीर करणार
RSS on cockroach janata party: 'कॉक्रोच जनता पार्टी'वर RSS ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'भारतातील जेन-झी...'
'कॉक्रोच जनता पार्टी'वर RSS ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'भारतातील जेन-झी...'
रायगडची जागा राष्ट्रवादीला, पण विधानपरिषदेसाठी शिवसेना आमदाराच्या मुलीने अर्ज भरला; उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया
रायगडची जागा राष्ट्रवादीला, पण विधानपरिषदेसाठी शिवसेना आमदाराच्या मुलीने अर्ज भरला; उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया
Babanrao Taywade: ओबीसी आरक्षणाला सध्या तरी कोणताही धक्का नाही, पण जरांगे यांच्या दबावामुळे धक्का लागला तर...; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सरकारला इशारा
ओबीसी आरक्षणाला सध्या तरी कोणताही धक्का नाही, पण जरांगे यांच्या दबावामुळे धक्का लागला तर...; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सरकारला इशारा

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil Protest: रखरखत्या उन्हात मनोज जरांगेंचं आजपासून उपोषण सुरु; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
रखरखत्या उन्हात मनोज जरांगेंचं उपोषण सुरु; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
रायगडची जागा राष्ट्रवादीला, पण विधानपरिषदेसाठी शिवसेना आमदाराच्या मुलीने अर्ज भरला; उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया
रायगडची जागा राष्ट्रवादीला, पण विधानपरिषदेसाठी शिवसेना आमदाराच्या मुलीने अर्ज भरला; उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया
DK Shivkumar : कर्नाटकमध्ये डीके शिवकुमार यांच्या सरकारमध्ये कोण कोण मंत्री होणार? संभाव्य मंत्र्यांची यादी समोर 
कर्नाटकमध्ये डीके शिवकुमार यांच्या सरकारमध्ये कोण कोण मंत्री होणार? संभाव्य मंत्र्यांची यादी समोर 
Donald Trump : अमेरिका- इराण शांतता करारावर सस्पेन्स कायम, डोनाल्ड ट्रम्प यांचा होर्मुझवरील दावा इराणनं खोटा ठरवला, युद्ध थांबणार की भडकणार?
अमेरिका- इराण शांतता करारावर अजूनही सस्पेन्स, होर्मुझवरील ट्रम्प यांचा दावा इराणनं खोटा ठरवला, पुढं काय घडणार? 
Pimpri-Pune Liquor Poisoning : पहिले उलट्या, मग तोंडाला फेस, काही तासांत किडन्याही निकाम्या; पुण्यातील दारुकांड प्रकरणातील मृत्यूचा हादरवणारा घटनाक्रम
पहिले उलट्या, मग तोंडाला फेस, काही तासांत किडन्याही निकाम्या; पुण्यातील दारुकांड प्रकरणातील मृत्यूचा हादरवणारा घटनाक्रम
Share Market : अवघ्या 10 मिनिटात सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, MSCI च्या पुनर्रचनेच्या अपडेटनं बाजारात भूकंप; गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फटका 
विदेशातून एक अपडेट येताच भारतीय शेअर बाजारात भूकंप, 10 मिनिटात सेन्सेक्स कोसळला; गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Embed widget