एक्स्प्लोर

भाजप दंगली घडवणारं सरकार : प्रकाश आंबेडकर

बीडमध्ये वंचित बहुजन विकास आघाडीच्यावतीने सत्ता निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला प्रकाश आंबेडकर यांच्यासह ओबीसी नेते लक्ष्मण माने आणि एमआयएमचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला.

बीड : भाजप सरकार दंगली घडवणारं सरकार आहे, अशा शद्बात भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर टीका केली. बीडमध्ये वंचित बहुजन विकास आघाडीच्यावतीने सत्ता निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला प्रकाश आंबेडकर यांच्यासह ओबीसी नेते लक्ष्मण माने आणि एमआयएमचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला. भाजप आणि आरएसएसचा इतिहास हा दंगली घडवण्याचा इतिहास आहे. हे दंगली घडवणारं सरकार असून या सरकारला देशातील जनतेची चिंता नाही. दुष्काळामुळे सध्या राज्यात गंभीर स्थिती निर्माण झालेली असताना हे सरकार दुष्काळग्रस्त भागात कोणत्याही उपाययोजना करत नाहीये. त्यामुळे सरकारला सत्तेतून खाली खेचण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं. महाराष्ट्रातील सरकार भ्रष्टाचार विरोधी सरकार आहे म्हणून सांगितल जातं. मात्र भाजप सरकारने भ्रष्टाचाराच्या नावावर 41 योजना बंद केल्या. आजाऱ्याल्या बरा करण्यापेक्षा त्या आजाराला फाशी देणारा हे सरकार आहे, असंही ते म्हणाले. नोटाबंदीत भाजपने पैसा कमावला मोदींनी नोटबंदी केली आणि त्यात मोठ्या प्रमाणात पैसा कमावला. तोच पैसा जनतेची मतं विकत घेण्यासाठी आता भाजप सरकार वापरत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. नोटाबंदीमुळे पाच कोटींहून अधिक बेरोजगार झाले. आजही त्यांना रोजगार नाही, मिळेल ते काम करतात. म्हणून मोदींना आणि आरएसएसला विचारा की चाललेला गाडा बिघडवलात का? आता देशात शांतता आणि संविधानाच्या रक्षणासाठी वंचित विकास आघाडीला येत्या काळात निवडून द्या, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. साखर शाळा बंद केल्या बीड जिल्हा मागील तीस वर्षांपासून ऊसतोड कामगार म्हणून ओळखला जातो. येथील कामगार मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात जातो. कामगाराची पुढची पिढी ऊसतोड कामगार होऊ नये म्हणून, कामगार आहे तिथे साखर शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ऊसतोड कामगारांचे मुलं शिकू लागले, चांगलं काम करु लागले. मात्र ज्यावेळी कामगार कमी होत आहेत हे लक्षात आलं त्यावेळी चालू केलेल्या साखर शाळा आणि प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या, असं प्रकाश आंबेडकर यांनी आरोप केला. काँग्रेस- राष्ट्रवादीवर घणाघात एका देशामध्ये एक घटना मानणारी आणि एक न मानणारी अशी व्यवस्था चालू देणार नाही.एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले म्हणतात की आम्ही भारताचं संविधान मान्य करणार नाही. दुसरीकडे आम्ही तुम्हाला संविधान मानायला लावू, असं म्हणण्याची ताकद काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये नाही, अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकरांनी केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kuldeep Singh Sengar: उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
मुख्यमंत्र्‍यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्‍यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
Nashik News: लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!

व्हिडीओ

NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर
Pradeep Ramchandani Ulhasnagar Corporation : मोठी बातमी! उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kuldeep Singh Sengar: उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
मुख्यमंत्र्‍यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्‍यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
Nashik News: लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
Raj Thackeray BMC Election 2026: नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
Thane Election MNS Candidates list: ठाण्यात भाजप-शिंदे गटाला टक्कर द्यायला राज ठाकरेंनी 14 मावळे रिंगणात उतरवले, मनसेची पहिली उमेदवारी यादी
ठाण्यात भाजप-शिंदे गटाला टक्कर द्यायला राज ठाकरेंनी 14 मावळे रिंगणात उतरवले, मनसेची पहिली उमेदवारी यादी
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाची 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर; 66 उमेदवारांची नावं, एका क्लिकवर
Maharashtra weather update: उत्तरेत पावसाच्या शक्यता, महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामान बदलणार; वर्षाअखेरीस हवामान खात्याचा अंदाज काय?
उत्तरेत पावसाच्या शक्यता, महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामान बदलणार; वर्षाअखेरीस हवामान खात्याचा अंदाज काय?
Embed widget