एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
पहिली आणि शेवटची विनंती करते, पंकजांचं नामदेव शास्त्रींना पत्र
आज आपल्याकडे आपली लेक एक पहिली आणि शेवटची विनंती करते. लोकांची तळमळ पाहून कोणी मध्यस्थी नको म्हणून मीच विनंती करते, शेवटी मी लहानच आहे. मी लहान होते, तुम्ही मोठे व्हा.
![पहिली आणि शेवटची विनंती करते, पंकजांचं नामदेव शास्त्रींना पत्र Bhagwangad Dasara Melava Issue Pankaja Mundes Letter To Namdev Shastri पहिली आणि शेवटची विनंती करते, पंकजांचं नामदेव शास्त्रींना पत्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/29111125/namdev-pankaja.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भगवानगड दसरा मेळाव्याच्या वाद यंदाही कायम आहे. यानिमित्ताने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि गडाचे मठाधिपती महंत नामदेव शास्त्री आमनेसामने आले आहेत. यातच आता पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांना पत्र लिहिून भावनिक साद घातली आहे.
आज आपल्याकडे आपली लेक एक पहिली आणि शेवटची विनंती करते. लोकांची तळमळ पाहून कोणी मध्यस्थी नको म्हणून मीच विनंती करते, शेवटी मी लहानच आहे. मी लहान होते, तुम्ही मोठे व्हा. काही नको त्यांना फक्त 20 मिनिटं वेळ वर्षातून द्या. ते पुन्हा कोयता घेऊन राबायला जातील, त्यांना ऊर्जा मिळते. मी आतापर्यंत कोणापुढे झुकले नाही, मात्र समाजासाठी नतमस्तक होते. मला दिवाळीची माहेरची भेट द्या, असं पंकजा मुंडे यांनी पत्रात लिहिलं आहे.
पंकजा मुंडे यांचं पत्र
तसं आपल्यात काय झालं या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडेही नाही. पण आज आपल्याकडे आपली लेक एक पहिली आणि शेवटची विनंती करते आहे आणि लोकांची तळमळ बघून मी ठरवलं, कोणी मध्ये नको, मीच विनंती करते. शेवटी मी लहानच आहे. वारणीच्या गहिनीनाथ गडाच्या सप्ताह समारोपाच्या कार्यक्रमात तसं म्हणाले होते ही, "मी लहान होते, तुम्ही मोठे व्हा." कृपया त्या असंख्य लेकरांकडे बघा! काही नको त्यांना फक्त 20 मिनिटं वेळ वर्षातून द्या. ते गरीब कोयता घेऊन जातील राबायला आणि मी ही परत येणार नाही. त्यांना काय मिळतं? तर त्यांच्या फाटक्या कुडात राहायची ऊर्जा मिळते, उन्हातान्हात राबायची ताकद मिळते. वेदनेत हसण्याची शक्ती मिळते. त्यांच्या किडकिडीत छातीत अभिमान भरुन नेतात, उर भरुन उत्साह घेऊन जातात. काट्या कुपट्यात, उन्हातान्हात राबतात. कोणी ऊसाच्या फडात तर कोणी राना, कोणी मुंबई सेंट्रलवर 4 बॅगा उचलून घेतं, 3 ऐवजी कोणी चेंबूरमध्ये रात्रभर टॅक्सी चालवतं. कोणी पोलिसवाला राबतो ट्रॅफिकमध्ये नाक्यावर. कष्ट करतात, परंतु हे सर्व भूषणाने स्वाभिमानाने वावरतात. तो स्वाभिमान वाढवणं आपल्याला जमलं तर करावं पण तो हिरावून घेऊ नये हे नक्की. मी कोणासमोर कधीही झुकले नाही पण समाजासाठी नतमस्तक होते आणि विनंती करते, तेवढे क्षण दिवाळीची माहेरची भेट म्हणून मला द्या. माझ्यासाठी नाही पण त्या चेहऱ्यासाठी जे उजळलले राहावेत म्हणून मी संघर्ष यात्रा काढली. यांच्या डोळ्यात अश्रू असे न का पण जिवंतपणा असू देत यासाठी आपण योगदान दिलं पाहिजे. समाज बांधणं जमलं नाही तर तो तोडणं तरी आपण होऊ देऊ नये. भक्तांना त्रास होऊ नये, कोणत्याही माझ्या भावाला इजा होऊ नये, त्यांच्या भावना जपण्यासाठी कृपया विचार करुन सकारात्मक निर्णय घ्याल ही अपेक्षा. शेवटी तुम्ही आणि मी यांच्यामुळेच आहोत व यांच्यासाठी काम करणं आपलं कर्तव्यच आहे.
पंकजा
![Pankaja_Letter](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/27154922/Pankaja_Letter.jpg)
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रीडा
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion