एक्स्प्लोर

Badlapur School Case : बदलापूरच्या भडक्यात रेल्वे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवेंसह 10 पोलिस किरकोळ जखमी; आंदोलन चिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड

Badlapur School Case : संतप्त नागरिकांनी रेल्वे रुळांवर उतरून रेल रोको निदर्शने केली. रेल्वे रुळांवर जमाव आक्रमक झाल्याने पोलिसांवर दगडफेक झाल्याच्या घटना सुद्धा घडल्या.

Badlapur School Case : ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडल्याने संपूर्ण शहरात संतापाची लाट पसरली आहे. सर्वजण रस्त्यावर उतरले. संतप्त नागरिकांनी रेल्वे रुळांवर उतरून रेल रोको निदर्शने केली. रेल्वे रुळांवर जमाव आक्रमक झाल्याने पोलिसांवर दगडफेक झाल्याच्या घटना सुद्धा घडल्या. बदलापूरच्या भडक्यात रेल्वे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवेंसह 10 पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. 

आता बदलापुरात आंदोलन चिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु करण्यात आली आहे. माध्यमे आणि पोलिसांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर येथील शाळेत दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. हा खटला जलदगतीने चालवला जाईल आणि त्यासाठी विशेष सरकारी वकील नेमावा, असेही शिंदे म्हणाले.

बदलापूर घटनेची चौकशी महिला आयपीएस अधिकारी करणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन शाळकरी मुलींसोबत झालेल्या गैरवर्तनाच्या घटनेची एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने तपास करण्यासाठी महानिरीक्षक दर्जाच्या भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी आरती सिंह यांची नियुक्ती केली आहे. या घटनेची लवकरात लवकर चौकशी करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. आम्हाला या प्रकरणात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करायचे आहे आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीसाठी न्यायचा आहे.

एफआयआरमध्ये झालेल्या विलंबावर प्रश्न उपस्थित

त्याच वेळी, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यास झालेल्या विलंबावर प्रश्न उपस्थित केला आहे. NCPCR चे अध्यक्ष प्रियांक कानुंगो यांनी सोशल मीडियावर या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथक पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एफआयआर नोंदवण्यासाठी पोलिसांनी पीडितेच्या पालकांना 12 तास का थांबवले, असा सवाल त्यांनी केला.

उज्वल निकम विशेष सरकारी वकील 

बदलापूर प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी गठीत करण्याचे तसेच, कर्तव्यात कसूर करणार्‍या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेत जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

इतर महत्वाच्या बातम्या 

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर

व्हिडीओ

Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
Embed widget