एक्स्प्लोर

Badlapur School Case: बदलापूर आंदोलनाबाबत संजय राऊतांकडून महत्त्वाची कागदपत्रं शेअर, 'बदलापुरमधील आंदोलक बाहेरचे' नरेटिव्ह खोडून काढलं

Badlapur School Case: बदलापूरमध्ये झालेल्या आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी बदलापूर आंदोलनात बाहेरचे सहभागी झाले होते, असा दावा केला आहे.

Badlapur School Case: राज्यासह देशाला हादरवून सोडलेल्या बदलापूरमधील दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचाराच्या घटनेने संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला. तर मंगळवारी (20 ऑगस्टला) बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले. संतापलेल्या पालकांनी आणि इतर नागरिकांनी रेल्वेसेवा बंद पाडली, मात्र, हे विरोधकांचे कटकारस्थान असून हे आंदोलक बदलापूरच्या बाहेरचे होते, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. यावर, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही कागदपत्रे शेअर करत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

विरोधकांचे कटकारस्थान असून हे आंदोलक बदलापूरच्या बाहेरचे होते, या दाव्यावरती संजय राऊतांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हटलं आहे की, "देवेंद्र फडणवीस जी, उघडाडोळे..बघा नीट! बदलापूर आंदोलकांचे हे पोलीस रिमांड एप्लीकेशन आहे. सर्व आंदोलक बदलापूरचेच आहेत. आपले मंत्री सांगत होते आंदोलक  भाडोत्री आणि बाहेरची आहेत! काय लायकीची माणसं आपल्या मंत्रीमंडळात आहेत!", अशा शब्दात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर टीका केली आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?

बदलापुरातील एका नामांकित शाळेमध्ये सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे याने दोन चिमुरड्यांवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर मंगळवारी बदलापूरमध्ये पालकांनी आणि नागरिकांनी शाळेला वेढा घातला, लोक हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरले, यावेळी संतप्त पालकांनी आणि नागरिकांनी शाळेत घुसून तोडफोड केली. तर, काही पालक नागरिकांनी बदलापूर रेल्वेस्थानकात आंदोलन करत रेल्वे सेवा बंद पाडली. आंदोलनामुळे बदलापूर ते कर्जत रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली. यानंतर पोलिसांकडून सुमारे 300 जणांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आलं त्याचबरोबर, काहींना अटक केल्याचे सांगण्यात येते.

हे आंदोलन म्हणजे विरोधकांचे कटकारस्थान- एकनाथ शिंदे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आंदोलन म्हणजे विरोधकांचं कटकारस्थान असल्याचं म्हटलं आहे. बदलापूरमध्ये चिमुरड्यांवर झालेला अत्याचार ही खेदजनक बाब आहे. पण हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित होते. या आंदोलनात स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच होते. आंदोलनाच्या ठिकाणी गाड्या भरून भरून या काही आंदोलनकर्ते आले होते. त्यांना सरकारची बदनामी करायची होती, असा दावा यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे.

आंदोलकांमधील काही लोक राजकीय हेतूने आलेत- गिरीश महाजन

आंदोलकांमधील काही लोक राजकीय हेतूनं आल्याचं म्हटलं. तिथं लाडकी बहीण योजनेचे पोस्टर्स हाती दिसून आले, या घटनेचा काहीही संबंध नसताना, जाणीवपूर्वक पोस्टर्स छापून आंदोलनस्थळी आणले होते. विरोधकांनी इतकी पातळी सोडावी याची कमाल वाटते. ही घटना कुठली आहे, त्याची तीव्रता काय, गांभीर्य काय, हे आपण पाहत नाही. आपला राजकीय फायदा कसा होईल, यासाठी ठराविक लोकांना येथे सोडून देण्यात आले. आंदोलनकर्त्यांमध्ये स्थानिक लोक किती होती आणि बाहेरची किती होती हे सिद्ध होईल, असं ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) म्हणाले. 

या सर्व दाव्यांवरती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या सोशल मिडीयावरती पोलीस रिमांड संबधी काही कागदपत्रे शेअर करत देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. आपले मंत्री सांगत होते, आंदोलक भाडोत्री आणि बाहेरचे आहेत, पण सर्व आंदोलक बदलापूरचेच आहेत, असे सांगतानाच, काय लायकीची माणसे आपल्या मंत्रिमंडळात आहेत, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane : मुस्लिमांसबत व्यवहार करायचा नाही, नितेश राणेंचं टोकाचं वक्तव्यSitaram Yechury Demise : सीताराम येचुरी यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरु होते उपचारRajesaheb Deshmukh  : बीडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांनी घेतली शरद पवारांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
Embed widget