अकोल्यात तापमानानं गाठला विक्रमी उच्चांक, पारा 42 अंशावर, जनजीवन प्रभावीत, राज्यातील कोणत्या भागात किती तापमान?
Maharashtra Temperature : अकोल्यात तापमानानं गाठला विक्रमी उच्चांक, पारा 42 अंशावर, जनजीवव प्रभावीत, राज्यातील कोणत्या भागात किती तापमान?
Maharashtra Temperature News : दिवसेंदिवस राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या उन्हाचा लोकांना मोठा त्रास होत आहे. दरम्यान, आजही राज्याच्या बहुतांश भागात तापमानाचा पारा 40 अंशावर गेला आहे. तर काही ठिकाणी 40 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद झली आहे. आज अकोल्यात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. आजही अकोल्याचा पारा 42 अंशावर पोहोचला आहे.
मार्चच्या अगदी दुसऱ्याच आठवड्यात अकोल्याचं तापमान 42 अंशावर
मार्चच्या अगदी दुसऱ्याच आठवड्यात अकोल्याचं तापमान 42 अंशावर पोहोचलं आहे. कालही अकोल्याचा पारा 42 अंशांवर होता. उन्हाळ्याच्या या मोसमातील सर्वाधिक तापमानाची काल आणि आज अकोल्यात नोंद झाली आहे. पुढच्या काही दिवसात अकोल्यात तापमानाचे नवे उच्चांक होण्याची शक्यता आहे. उन्हामुळं अकोल्याचे जनजीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित झालं आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढत आहे. तापमानात वाढ झाल्याने दुपारी उकाडाही जाणवत आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान होते. तर राज्यातील उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार तापमानात वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामान होते. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज देण्यात आला आहे.
पुणे शहरात तापमान 39 अंशावर
पुणे शहरात तापमान 39 अंशावर गेले आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेला पावलं उचलायला सुरुवात केली आहे. महानगरपालिकेने सोशल मीडियावर पोस्ट करत उन्हापासून बचाव करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून पुणेकरांना उन्हापासून बचाव करण्याचं आवाहन करण्यात आल आहे.
गेल्या पाच दिवसातील अकोल्याचे तापमान
दिनांक तापमान ( सेल्सिअस अंशांमध्ये)
8 मार्च 40.9
9 मार्च 40.4
10 मार्च 40.7
11 मार्च 41
12 मार्च 42
13 मार्च 42
Heat wave: काय करावं ?
• पुरेसे पाणी प्या, तहान लागलेली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या.
• उन्हात काम करत असल्यास ओल्या कपड्याने डोके मान चेहरा झाकून ठेवा. सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळावा.
• टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी व स्थानिक उपलब्ध पाणीदार फळे आणि पाणीदार भाज्या यांचा आहारात समावेश करा.
• घर थंड ठेवण्यासाठी खिडक्यांना पडदे लावा, रात्री खिडक्या उघड्या ठेवा आणि गारव्यासाठी पंखे किंवा ओल्या कपड्यांचा वापर करा.
• हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
• घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री, टोपीचा आणि गॉगल वापर करा.
• ओआरएस (ORS), घरी बनवलेली लस्सी, कोशिंबीर, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी किंवा ताक यांचा नियमित आहारात वापर करा.
महत्त्वाच्या बातम्या





















