एक्स्प्लोर

Bacchu Kadu : जातीचा संघर्ष थांबवा, छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांनी एकत्र येऊन लढावं! बच्चू कडूंचा सल्ला

Bacchu Kadu : भुजबळ आणि जरांगे यांनी एकत्र येऊन लढा द्यावा आणि हा जातीचा संघर्ष थांबवावा. यासाठी मी स्वतः भुजबळ आणी जरांगे यांची भेट घेणार असल्याचे मत आमदार बच्चू कडूंनी बोलताना व्यक्त केले आहे. 

Amravati News अमरावती : राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) अत्यंत कळीचा होऊन गेला आहे. अशातच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला असून वेळीच आमच्या मागण्या मान्य करण्याचे आवाहन  जरांगे पाटील यांनी केले आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी ओबीसींच्या आरक्षण बचावासाठी उपोषणाचे हत्यार उगारले आहे. दरम्यान लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आचा सातवा दिवस आहे. त्यामुळे राज्यांमध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असंच काहीसे चित्र निर्माण झालं आहे. अशातच यावर भाष्य करताना प्रहारचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडूंनीही (Bacchu Kadu)  यांनी  जातीचा संघर्ष थांबावून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील यांनी एकत्र येऊन लढण्याचा सल्ला दिला आहे. 

स्वतः भुजबळ आणी जारांगे यांची भेट घेणार- बच्चू कडू

राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरु आहे. हे थांबलं पाहिजे. एकाकडे कोकणातल्या मराठ्यांनी या मागणीला विरोध दाखवला आहे. तर मराठवाड्यातल्या  मराठा ओबीसी मध्ये यायला तयार आहेत. सध्याच्या आरक्षणात वाढ करून यावर तोडगा काढावा, असं माझं मतं आहे. तसेच ही लढाई भुजबळ आणी जारांगे यांनी एकत्र येऊन लढावी आणि हा जातीचा संघर्ष थांबवावा. यासाठी मी स्वतः भुजबळ आणी जारांगे यांची भेट घेणार असल्याचे मत ही  बच्चू कडूंनी बोलताना व्यक्त केले आहे. 

सरसंघचालकांनी आता बोलून उपयोग नाही- बच्चू कडू

देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यांच्या निकालानंतर संघ नेतृत्वाची जाहीर भूमिका पहिल्यांदाच सर्वांसमोर आली. संघाच्या प्रशिक्षण प्रणालीत अत्यंत महत्वाच्या कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोपीय सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी सर्वच राजकीय पक्षांना कानपिचक्या दिल्या. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, आर एस एसने आकडेवारीवर बोलण्यापेक्षा परिणामावर बोलायला हवं होतं. जेव्हा अजित दादांना युतीत घेतलं तेव्हा बोलायला पाहिजे होतं. आता बोलणे योग्य नाही. एकीकडे नैतिकतेवर बोलायचं आणी दुसरीकडे आकडे सांगायचे हे योग्य नसल्याचेही बच्चू कडू म्हणाले. 

शिवसेनेबाबत जे झालं ते वाईटच झालं

आज शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आहे. पक्षात उभी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि  एकनाथ शिंदेची शिवसेने कडून आज हा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावर भाष्य करताना बच्चू कडूंनी खंत व्यक्त केली आहे. शिवसेनेबाबत जे झालं ते वाईटच झालं. पण आता त्याला काही इलाज नाही. असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar PC: मला टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी व्यक्ती नाही, अमित शहांना प्रत्युत्तरABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 14 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सWalmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122Walmik Karad Mother : माझ्या लेकाला न्याय मिळाला पाहिजे, सगळे गुन्हे खोटे, वाल्मिकच्या आईची साद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
Embed widget