एक्स्प्लोर

काय सांगता! उंदराने अख्ख्या शहराचा पाणीपुरवठा बंद पाडला; औरंगाबाद शहरवासियांवर पाणी जपून वापरण्याची वेळ

औरंगाबादकरांना (Aurangabad News) पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. एका उंदराने अख्ख्या शहराचा पाणीपुरवठा 11 तासांसाठी बंद पाडला होता.

Aurangabad Water Issue : आधी चार ते पाच दिवसाला पाणी येणाऱ्या औरंगाबादकरांना (Aurangabad News) पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. कारण एका उंदराने अख्ख्या शहराचा पाणीपुरवठा 11 तासांसाठी बंद पाडला होता. तर आता शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, औरंगाबादकरांवर पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भर पावसात औरंगाबादकरांवर पाणी संकट ओढवले आहे.

त्याचं झालं असं की, सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास जायकवाडी पंपगृहातील पंप क्रमांक 4 च्या फिडरमध्ये अचानक एक उंदीर घुसला. त्याने घातलेल्या गोंधळानंतर शॉर्टसर्किट होऊन ट्रान्सफॉर्मर खराब झालं. याबाबत माहिती मिळताच महानगरपालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतलं. मात्र या संपूर्ण दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल 13 तास लागले. त्यामुळे या काळात शहरात थेंब भर सुद्धा पाणी आलं नाही.

नागरिकांना नाहक मनस्ताप....

या घटनेमुळे जायकवाडी धरणातून येणारी पाणीपुरवठा योजना तब्बल 13 तास बंद होती. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. नागरिकांना एक ते दोन दिवस उशिरा पाणी येणार आहे. आधीच पाच ते सहा दिवसांनी येणारे पाणी आणखी दोन दिवसांनी वाढल्याने, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. एकीकडे जायकवाडी धरण 100 टक्के भरलंय, मात्र तरीही औरंगाबादकरांना पिण्याचे पाणी काही मात्र वेळेवर मिळत नाहीये.

सतत पाणीपुरवठा विस्कळीत...

गेल्या आठवड्यात 700 मिमि व्यासाची जलवाहिनी बिडकीन गावाजवळ फुटली होती. त्यामुळे दुरुस्तीसाठी तब्बल 30 तासांचा कालावधी लागला. त्यानंतर महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात होता. पण याचवेळी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात पंपात पुन्हा तांत्रिक बिघाड झाला. या दोन्ही घटनांमुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला होता. त्यातच आता उंदीरमामाच्या प्रतापामुळे पुन्हा एकदा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

जायकवाडीत पंपगृहातील मेनहोलमध्ये उंदीर शिरल्यामुळे स्पार्किंग होऊन काल सोमवारी पहाटे वीजपुरवठा खंडीत झाला. यामुळे नवीन आणि जुन्या अशा दोन्ही योजनांवरील पाणी उपसा बंद पडला. त्याचा परिणाम पाणी पुरवठा विस्कळीत होण्यावर झाला आहे. तांत्रिक बिघाड असो किंवा अजून काही कारण असो आणि आता उंदीर. औरंगाबादकरांना पाण्याच्या बाबतीत अडचणी मात्र कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत, हे मात्र खरं...

इतर महत्वाच्या बातम्या

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग कमी, सतर्कतेचा इशारा मात्र कायम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसलेRavindra Dhangekar On Pune Car Accindet Case :2 निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी होतीAditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोपSpecial Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget