एक्स्प्लोर

शक्तीपीठ महामार्गला विरोध, लातुरमध्ये 12 जिल्ह्यातील शेतकरी एकत्र, राजू शेट्टींनी स्वीकारलं फडणवीसांचं आव्हान  

शक्तीपीठ महामार्गला विरोध करण्यासाठी आद लातुरमध्ये 12 जिल्ह्यातील शेतकरी एकत्र आले होते. यावेळी राजू शेट्टींनी सरकारवर जोरदार टीका केली.

Raju Shetti : गेल्या महिन्यात शक्तीपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Highway) विरोधात मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानात शेतकऱ्यांनी (Farmers) आंदोलन केले होते. या आंदोलनाविषयी बोलताना विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानात जेवढे लोक आले त्यापेक्षा तिप्पट शक्तीपीठ महामार्ग पाहिजे, असे म्हणायला लोक येतील असे वक्तव्य केले होते. आम्ही त्यांचे आव्हान स्वीकारले आहे. फक्त येताना सोबत सातबारा घेऊन यावे, असे म्हणत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना प्रति आव्हान दिले आहे. 

कायदा हातात घेऊन शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतील

मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने लातुरात आयोजित राज्यस्तरीय परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. या परिषदेस राज्यातील बारा जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. शक्तीपीठ महामार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत, असे ते म्हणाले. कायदा हातात घेऊन शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतील. त्यांच्यात हिंमत असेल तर शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करायला यावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी दिले. तसेच शक्तीपीठ महामार्गाला कुठल्याही शेतकऱ्यांचे समर्थन नाही. हा महामार्ग व्हायला पाहिजे यासाठी जो आटापिटा चाललाय त्याच्या पाठीमागे मोठे अर्थकारण असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. महायुती पुन्हा एकदा सत्तेत येताच शक्तिपीठबाबत धोरण बदललं असून कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ करायचा असा निर्धार सरकारकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा 12 जिल्ह्यातून विरोध असतानाही शक्तीपीठ रेटला जात असताना शेतकरी सुद्धा आक्रमक झाला आहे.

शक्तीपीठ महामार्गाच्या निर्णय निसर्ग उध्वस्त करणारा

दरम्यान, शक्तीपीठ महामार्गाच्या निर्णय निसर्ग उध्वस्त करणारा आहे. माणसे देशोधडीला लावणारा आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा अशी मागणी असताना ती पूर्ण होत नाही, मग महामार्ग बनवायचा कशाला? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. राज्याकडे सध्या पैसा नाही, अशावेळी हा प्रकल्प राबवण्यासाठी अट्टाहास का आहे? असा सवालही बाधित शेतकरी करत आहेत. यावेळी काही ठराव घेण्यात आले आहेत. या विषयातील अभ्यासू व्यक्ती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित चर्चा करुनच मार्ग काढावा बाकीचे पर्याय आम्हाला नको असे काही ठराव करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Raju Shetti : शक्तीपीठातून 50 हजार कोटी हाणण्याचा तुमचा डाव, सत्ता जाताच हीच जनता पायाखाली तुडवायला मागे पाहणार नाही; गिरीश फोंडेंना निलंबित करताच राजू शेट्टी आक्रमक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget