एक्स्प्लोर

शक्तीपीठ महामार्गला विरोध, लातुरमध्ये 12 जिल्ह्यातील शेतकरी एकत्र, राजू शेट्टींनी स्वीकारलं फडणवीसांचं आव्हान  

शक्तीपीठ महामार्गला विरोध करण्यासाठी आद लातुरमध्ये 12 जिल्ह्यातील शेतकरी एकत्र आले होते. यावेळी राजू शेट्टींनी सरकारवर जोरदार टीका केली.

Raju Shetti : गेल्या महिन्यात शक्तीपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Highway) विरोधात मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानात शेतकऱ्यांनी (Farmers) आंदोलन केले होते. या आंदोलनाविषयी बोलताना विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानात जेवढे लोक आले त्यापेक्षा तिप्पट शक्तीपीठ महामार्ग पाहिजे, असे म्हणायला लोक येतील असे वक्तव्य केले होते. आम्ही त्यांचे आव्हान स्वीकारले आहे. फक्त येताना सोबत सातबारा घेऊन यावे, असे म्हणत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना प्रति आव्हान दिले आहे. 

कायदा हातात घेऊन शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतील

मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने लातुरात आयोजित राज्यस्तरीय परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. या परिषदेस राज्यातील बारा जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. शक्तीपीठ महामार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत, असे ते म्हणाले. कायदा हातात घेऊन शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतील. त्यांच्यात हिंमत असेल तर शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करायला यावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी दिले. तसेच शक्तीपीठ महामार्गाला कुठल्याही शेतकऱ्यांचे समर्थन नाही. हा महामार्ग व्हायला पाहिजे यासाठी जो आटापिटा चाललाय त्याच्या पाठीमागे मोठे अर्थकारण असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. महायुती पुन्हा एकदा सत्तेत येताच शक्तिपीठबाबत धोरण बदललं असून कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ करायचा असा निर्धार सरकारकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा 12 जिल्ह्यातून विरोध असतानाही शक्तीपीठ रेटला जात असताना शेतकरी सुद्धा आक्रमक झाला आहे.

शक्तीपीठ महामार्गाच्या निर्णय निसर्ग उध्वस्त करणारा

दरम्यान, शक्तीपीठ महामार्गाच्या निर्णय निसर्ग उध्वस्त करणारा आहे. माणसे देशोधडीला लावणारा आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा अशी मागणी असताना ती पूर्ण होत नाही, मग महामार्ग बनवायचा कशाला? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. राज्याकडे सध्या पैसा नाही, अशावेळी हा प्रकल्प राबवण्यासाठी अट्टाहास का आहे? असा सवालही बाधित शेतकरी करत आहेत. यावेळी काही ठराव घेण्यात आले आहेत. या विषयातील अभ्यासू व्यक्ती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित चर्चा करुनच मार्ग काढावा बाकीचे पर्याय आम्हाला नको असे काही ठराव करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Raju Shetti : शक्तीपीठातून 50 हजार कोटी हाणण्याचा तुमचा डाव, सत्ता जाताच हीच जनता पायाखाली तुडवायला मागे पाहणार नाही; गिरीश फोंडेंना निलंबित करताच राजू शेट्टी आक्रमक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : ऑपरेशन लोटसमुळे शिंदे नाराज, कोणत्या प्रवेशांमुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी टोकाची भूमिका घेतली?
ऑपरेशन लोटसमुळे शिंदे नाराज, कोणत्या प्रवेशांमुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी टोकाची भूमिका घेतली?
Advay Hiray: अद्वय हिरेंचा भाजप प्रवेश शिंदे गट थांबवणार का? उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या घरी जाऊन बसले, नाशिकच्या राजकारणात ट्विस्ट
अद्वय हिरेंचा भाजप प्रवेश शिंदे गट थांबवणार का? उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या घरी जाऊन बसले, नाशिकच्या राजकारणात ट्विस्ट
Parth Pawar Pune Land Scam: अजित पवार व्यवहार रद्द करणारे कोण? पार्थ पवार प्रकरणावरून अंजली दमानिया आक्रमक, उद्या मोठा गौप्यस्फोट करणार
अजित पवार व्यवहार रद्द करणारे कोण? पार्थ पवार प्रकरणावरून अंजली दमानिया आक्रमक, उद्या मोठा गौप्यस्फोट करणार
Pimpri Chichwad Mahanagarpalika:  पिंपरी चिंचवडमध्ये नवा ट्विस्ट; ऐनवेळी आरक्षणात बदल, नियम काय सांगतो, जाणून घ्या सविस्तर
पिंपरी चिंचवडमध्ये नवा ट्विस्ट; ऐनवेळी आरक्षणात बदल, नियम काय सांगतो, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vikhroli Building demolition: विक्रोळी पार्कसाईटमध्ये पालिकेची धडक कारवाई
Prakash Mahajan : ज्यांच्यासाठी लढले, विरोधकांना भिडले, त्या Raj Thackeray यांच्यावर घणाघाती टीका
Maharashtra Cabinet Shiv Sena vs BJP : डोंबिवलीत भाजपचं मिशन लोटसमुळे शिवसेनेत नाराजी?
Maharashtra Cabinet Shiv Sena vs BJP : राज्य मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांची गैरहजेरी
Andheri CNG Crisis : मरोळमध्ये सीएनजीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : ऑपरेशन लोटसमुळे शिंदे नाराज, कोणत्या प्रवेशांमुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी टोकाची भूमिका घेतली?
ऑपरेशन लोटसमुळे शिंदे नाराज, कोणत्या प्रवेशांमुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी टोकाची भूमिका घेतली?
Advay Hiray: अद्वय हिरेंचा भाजप प्रवेश शिंदे गट थांबवणार का? उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या घरी जाऊन बसले, नाशिकच्या राजकारणात ट्विस्ट
अद्वय हिरेंचा भाजप प्रवेश शिंदे गट थांबवणार का? उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या घरी जाऊन बसले, नाशिकच्या राजकारणात ट्विस्ट
Parth Pawar Pune Land Scam: अजित पवार व्यवहार रद्द करणारे कोण? पार्थ पवार प्रकरणावरून अंजली दमानिया आक्रमक, उद्या मोठा गौप्यस्फोट करणार
अजित पवार व्यवहार रद्द करणारे कोण? पार्थ पवार प्रकरणावरून अंजली दमानिया आक्रमक, उद्या मोठा गौप्यस्फोट करणार
Pimpri Chichwad Mahanagarpalika:  पिंपरी चिंचवडमध्ये नवा ट्विस्ट; ऐनवेळी आरक्षणात बदल, नियम काय सांगतो, जाणून घ्या सविस्तर
पिंपरी चिंचवडमध्ये नवा ट्विस्ट; ऐनवेळी आरक्षणात बदल, नियम काय सांगतो, जाणून घ्या सविस्तर
मुख्यमंत्र्यांसोबतच्या कॅबिनेटला दांडी, शिवसेना मंत्र्यांची मोठी नाराजी; महायुतीत तणाव, शिंदेगटाच्या नाराजीची 6 कारणे
मुख्यमंत्र्यांसोबतच्या कॅबिनेटला दांडी, शिवसेना मंत्र्यांची मोठी नाराजी; महायुतीत तणाव, शिंदेगटाच्या नाराजीची 6 कारणे
नवं घर झालं, मुहूर्त ठरला, सुरज चव्हाणच्या घरी सनई चौघडे वाजणार, लग्नाची पत्रिका झाली व्हायरल, चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस
नवं घर झालं, मुहूर्त ठरला, सुरज चव्हाणच्या घरी सनई चौघडे वाजणार, लग्नाची पत्रिका झाली व्हायरल, चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस
Shivsena Shinde Camp & BJP: अमित शाह म्हणाले, कुबड्या नको, नाराज शिंदें गटाला विनाशाची कुणकुण लागायला हवी होती, सुषमा अंधारेंचं टीकास्त्र, 'त्या' 3 घटना जिव्हारी
अमित शाह म्हणाले, कुबड्या नको, नाराज शिंदें गटाला विनाशाची कुणकुण लागायला हवी होती, सुषमा अंधारेंचं टीकास्त्र, 'त्या' 3 घटना जिव्हारी
Delhi Blast: भारतात हमास सारखा हल्ला करण्याची योजना; ड्रोन, बॉम्ब अन् लहान रॉकेट बनवले जात होते, दिल्ली बॉम्बस्फोटाच्या चौकशीतील सर्वात खळबळजनक खुलासा
भारतात हमास सारखा हल्ला करण्याची योजना; ड्रोन, बॉम्ब अन् लहान रॉकेट बनवले जात होते, दिल्ली बॉम्बस्फोटाच्या चौकशीतील सर्वात खळबळजनक खुलासा
Embed widget