एक्स्प्लोर

Raju Shetti : निर्णायक लढाईसाठी एकत्र या, 50 हजार रुपयांच्या अनुदानासाठी राजू शेट्टींचा एल्गार

तत्कालीन राज्य सरकारनं जाहीर केलेलं प्रोत्साहनपर अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालं नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

Raju Shetti : नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 जुलै रोजी 50 हजार रुपये जमा होणार होते. मात्र, अद्याप ते पैसे जमा झाले नाहीत. सध्या सुरु असलेल्या राजकारणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केलं आहे. तत्कालीन राज्य सरकारनं जाहीर केलेलं प्रोत्साहनपर अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालं नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या विरोधात येत्या 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता कोल्हापूरमधील दसरा चौकात एकत्र येण्याच आवाहन राजू शेट्टींनी केलं आहे.  गट-तट, पक्ष विसरुन निर्णायक लढाईसाठी कोल्हापूरच्या दसरा चौकात उपस्थित राहा असं आवाहन शेट्टी यांनी केलं आहे.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणार असल्याची घोषणा राज्य सरकारनं दोन वर्षापूर्वी केली होती. अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वेळोवेळी मागणी केली. मोर्चा काढला. त्यानंतर मार्च 2022 च्या बजेटमध्ये तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. हे पैसे 1 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होते. परंतू, दुर्दैवानं, त्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आता नवं आलेलं सरकार म्हणत आहे की, मागील सरकार हे अल्पमतात होतं, त्यांच्या निर्णयाची अमंलबजावणी करणार नाही. त्यांच्या राजकारणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. पावसाळ्याचे दिवस आहेत. खताला पैसे नाहीत, बियाणाला पैसे नाहीत. आर्थिक अडचण आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हक्काचे 50 हजार रुपये खात्यावर आले असते तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता असे शेट्टी म्हणाले. त्यामुळं आता सरकारवर दबाव टाकण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

एकूण 10 हजार कोटीपैकी एकट्या कोल्हापूर जिल्ह्याला 987  कोटी रुपये येणं आहे. म्हणजे 10 टक्के रक्कम कोल्हापूर जिल्ह्याला येणार आहे. त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात मोठा उठाव होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं गट तट विसरुन एकत्र या. गटात तटात आता काय राहिले आहे. कोण कोणालाही मिठी मारत असल्याचे शेट्टी म्हणाले. त्यामुळं 13 तारखेला दसरा चौकात एकत्र या असे आवाहन राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. आपण आळस केलं तर नुकसान आपलचं होणार आहे. ही निर्णायक लढाई आहे. तुम्ही साथ दिली तर यापेक्षाही मोठी लढाई मी करणार असल्याचे शेट्टी म्हणाले. सगळेजण मिळून हे पैसे वसूल करु असे शेट्टी म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget