एक्स्प्लोर

देशातील चित्र बदलेल, इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता हे विसरू नका; जयंत पाटील यांचा कार्यकर्त्यांना संदेश

केंद्र सरकारचे अपयश हे लोकांपर्यंत पोहोचवा, प्रत्यक्षात पटवून देत नाही तोपर्यंत लोक काही गोष्टी मान्य करत नाहीत असा संदेश ना. जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

सांगली: या जगात सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही आलेले नाही, देशात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही पराभव झालेला होता हे कधी विसरू नका. त्यामुळे देशातीलही चित्र बदलेल असा विश्वास राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. यावेळी विटा येथे आयोजित राष्ट्रवादी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

ना. जयंत पाटील कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हणाले की, प्रयत्नार्थी परमेश्वर, त्यामुळे प्रयत्न करा, कामाला लागा. शाहू, फुले, आंबेडकराचा एक वेगळा विचार आहे. जातीयवाद आणि  त्याचे काय परिणाम या देशात होतायत हे आज सर्वजण पाहत आहेत.

आपल्या देशाची अर्थव्यवस्था कुठे चालली आहे असा सवाल करत जयंत पाटील म्हणाले की, मोदींच्या काळात पेट्रोल किती वाढलेय हे लोकांना जाऊन  सांगणे गरजेचे आहे. मोदींनी पेट्रोलचे दर किती वाढवले, आधीचे मनमोहन सिंग यांचे सरकार बरे होते हे महिलांना आणि ग्रामस्थांना पटवून दिले की ही लोक पुन्हा कशाला कमळाला मतदान करतील. लोकांचे प्रश्न कसे सोडवले पाहिजेत हे समजावण्याची गरज आहे.

ना. जयंत पाटील म्हणाले की, प्रचाराचे तंत्र आता बदलले आहे. प्रत्यक्षात पटवून देत नाही तोपर्यंत लोक काही गोष्टी मान्य करत नाहीत. त्यामुळे आपण लोकांशी बोला. आज महागाई इतकी वाढली आहे याबाबत लोकांना सांगा आणि केंद्र सरकारची पोलखोल करा. हे सगळे करण्यासाठी आपल्याला आता प्रचाराचे ज्या पद्धतीने तंत्र बदलले आहे ते आपण आत्मसात करायला पाहिजे. कुठलीही संघटना विचारांवर अधारीत असेल तर कार्यकर्ते झपाटून काम करतात. तुम्ही लोकांशी संपर्क ठेवल्याशिवाय लोक तुम्हाला प्रतिसाद देत नाहीत. त्यासाठी आपले सैन्य तयार पाहिजे. त्यामुळे बुथ कमिट्या सक्षम करा.

पुर्वीच्या काळी निरोप मिळाला तरी कार्यकर्ते येत होते, आता संदर्भ बदलले आहेत असं सांगत ना. जयंत पाटील म्हणाले की, आता जमाना बदलला आहे. संपर्काचे तंत्र बदलले आहे. प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत आपल्याला पोहचले पाहिजे. प्रत्येक बुथवर दहा कार्यकर्ते असतील तर तुमच्या एका निरोपावर जवळपास साडेतीन हजार कार्यकर्ते तत्पर हजर असतील. दररोज एक संदेश त्यांच्यापर्यंत पोहचवला पाहिजे. त्यातून सरकारने केलेले काम आणि विरोधकांच्या चुका दाखवून दिल्या पाहिजेत. आपलं सैन्य तयार असेल तर निवडणूक सोपी होते. उद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका आहेत. तुमची बुथवरची कमिटी सक्षम असेल, तर निवडणूक सहज होईल.

महत्त्वाच्या बातम्या: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget