एक्स्प्लोर

CM Eknath Shinde : विरोधक बांधावर जाताय, गेलं पाहिजे, सगळ्यांना कामाला लावलंय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

CM Eknath Shinde : सध्या अनेकजण शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. गेलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या व्यथा, समजून घेतल्या पाहिजे.

CM Eknath Shinde : सध्या अनेकजण शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. गेलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या व्यथा, समजून घेतल्या पाहिजे. सरकार आणि विरोधकांनी मिळून काम केले पाहिजे. विरोधक बांधावर जात आहेत, चांगली गोष्ट आहे, आपणच सगळ्यांना कामाला लावलेल आहे, अशी खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांना लगावला आहे. तर नंदुरबारच्या (Nandurbar) नगर परिषदेचा रखडलेला 7 कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करुन दिला. मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेने सभागृहात एकच जल्लोष झाला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज नंदुरबार नगर परिषद (Nagar Parishad) नूतन इमारत उद्घाटन झालं. या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरच्या आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. यावेळी ते बोलत होते, ते म्हणाले, समृद्धी महामार्गासारखे अनेक मोठे प्रकल्प देखील सुरू झाले, राज्यामध्ये काही ठिकाणी गती मंदावली, किंबहुना पूर्णपणे थांबली होती, मात्र शिंदे फडणवीस सरकार स्थापन केल्यानंतर तातडीने चालना देण्याचे काम सुरू करण्यात आले. जसं केंद्राने काही पेट्रोल डिझेलमध्ये पैसे कमी केले तसेच राज्याने देखील केले पाहिजे, परंतु गेल्या अडीच वर्षांमध्ये ते केले नव्हते, परंतु आपल्या सरकार आल्या आल्या पेट्रोलमध्ये पाच रुपये, डिझेल मध्ये तीन रुपये कमी करून टाकले. लोकांना काही प्रमाणात का होईना दिलासा देण्याचं काम आपण केलं. आपल्या सरकारने एनडीआरएफच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतला. सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून दोन हेक्टरला मदत देण्याचा निर्णय घेतला. त्याच बरोबर सरकारने 6 हजार कोटी रुपये निधी वाटण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या लोकांना पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा घेतला.

ते पुढे म्हणाले, तसेच 75 वर्षे वयाच्या नागरिकांना देखील एसटीमध्ये मोफत प्रवास करण्यास सुरवात केली. गेल्या 52 महिन्यांमध्ये एक कोटी पेक्षा जास्त लोकांनी जास्त आणि त्याचा फायदा घेतला लाभ घेतला. त्याचबरोबर या दुष्काळग्रस्त भागांमध्ये जे वाया जाणार पाणी आहे, ते पाणी वळविण्याचा देखील निर्णय पहिल्याच कॅबिनेटमध्ये घेतला. या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली आली पाहिजे, लाखो हेक्टर जमीन सिंचन खाली आणण्यासाठी पाणी वळवण्याचा निर्णय घेतला. सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा जो काही लाखो एकच शेती सेंद्रिय देखील झाली पाहिजे, यासाठी देखील आपला पाठपुरावा सुरू आहे. त्याचबरोबर दिवाळी गोड झाली पाहिजे, म्हणून राज्यांमध्ये पहिल्यांदा रवा, साखर, चणाडाळ, तेल केवळ शंभर रुपयांमध्ये देण्याचा देखील निर्णय आपण घेतला.हे सर्व सामान्य लोकांच्या हिताचे निर्णय आपण घेतलेले असून म्हणून आपण काम करणारा आपल्या सरकार आहे. 

प्रत्येक विभागामध्ये कमी वेळेमध्ये जास्तीचं काम करण्याचा प्रयत्न आपल्या सरकार करत आहे. आणि म्हणूनच तीन महिन्यांमध्ये ७२ मोठे निर्णय, 400 जीआर काढले. गुलाबराव पाटील यांनी जवळपास बावीस हजार पाणीपुरवठा योजना मजूर करण्यात आले आहेत. तसेच आदिवासी समाजाला न्याय देण्याचे काम करायचे आहे, कार्यकर्ता महत्वाचा असतो, त्यामुळे प्रत्येक तळागाळातील कार्यकर्त्यापर्यंत पोहचायचे आहे. नंदुरबार शहर वेगाने विकसित होत आहे, मात्र अजूनही अनेक विकासाच्या गोष्टी करायच्या असून आज तातडीने जे जे काही लागेल, नगरविकासाच्या माध्यमातून करण्यात येतील. त्यासाठी राज्य सरकार हात आखडता घेणार आहे. 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरभरून मदत 
एकाच दिवशी जवळपास सहा लाख 90 हजार लोकांच्या खात्यामध्ये एकाच क्लिकवर अडीच हजार कोटी रुपये पाठविण्यात आले. बाकी लोकांचे वाटप सुरु असून राज्यामध्ये जे शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. पहिल्या पावसानंतर अतिवृष्टीमध्ये त्यांना देखील आपण तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. त्याच बरोबर जे सततच्या पावसामुळे निकषांमध्ये बसत नव्हते, त्यांचेही पंचनामे करण्याचे सूचना दिल्या असून त्यांनाही मदत देण्याचे ठरविले आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांचे देखील पंचनामे करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला असून काल-परवापर्यंत जे जे काही नुकसान झालंय ते शेतकऱ्यांना मदत दिले पाहिजे, ही भूमिका आपण घेतली. त्याचबरोबर जून जुलै मध्ये झालेल्या नुकसान, तसेच ऑगस्टमध्ये झालेले नुकसान सप्टेंबरमध्ये तात्काळ देण्याचा सुरू झालं आहे. शेतकऱ्यांना देखील प्रति युनिट एक रुपया कमी करण्याचा देखील निर्णय घेतला त्याच बरोबर स्थिर आकारांमध्ये पंधरा रुपये प्रति महिना सवलत देण्याचा देखील आपण निर्णय घेतला. त्याचबरोबर झालेल्या नुकसान जे निकषांमध्ये बसत नाही, त्या शेतकऱ्यांना देखील 90 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. 

03 मिनिटांत सात कोटी मंजूर 
यावेळी शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं भाषण सुरु होतं.  चंद्रकांत रघुवंशी यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आठवण सांगितली. विलासराव आलेले असताना त्यांनी एक कोटी रुपयांचा निधी 3 दिवसात मंजूर केला असे सांगितले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंचावरुनच अधिकाऱ्यांना फोन लावून 7 कोटी 28 लाख रुपयांचा निधी तत्काळ मंजूर करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेने उपस्थितांनी टाळ्या वाजवीत, घोषणा देत मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शैलीत नंदुरबार नगर परिषदचा रखडलेला 7 कोटी रुपयांचा  निधी फोन करून मंजूर केला.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फलटण-कोरेगावमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार; अजित पवारांना धक्के सुरुच
फलटण-कोरेगावमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार; अजित पवारांना धक्के सुरुच
Ladki Bahin Yojna: छातीत कळ आली अन् खाली कोसळल्या,  मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'लाडक्या बहिणीचा' मृत्यू
Ladki Bahin Yojna: छातीत कळ आली अन् खाली कोसळल्या, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'लाडक्या बहिणीचा' मृत्यू
Dilip Khedkar : मोठी बातमी : पूजा खेडकरच्या वडिलांचा विधानसभेसाठी शड्डू, भाजपकडे उमेदवारी मागणार, मतदारसंघही ठरला!
मोठी बातमी : पूजा खेडकरच्या वडिलांचा विधानसभेसाठी शड्डू, भाजपकडे उमेदवारी मागणार, मतदारसंघही ठरला!
Harshvardhan Patil : तोपर्यंत हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देऊ नये! थेट आमदाराच्या मागणीने इंदापुरात आता नवा वाढण्याची शक्यता
तोपर्यंत हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देऊ नये! थेट आमदाराच्या मागणीने इंदापुरात आता नवा वाढण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 14 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaCM Eknath Shinde : लाखो मुंबईकरांना टोलमाफीच्या निर्णयामुळे दिलासा मिळणार - एकनाथ शिंदेABP Majha Headlines :  1 PM : 14 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सToll Free Entry Mumbai MNS : मुंबईत टोलमुक्त प्रवेश; मनसेकडून मिठाई वाटप; शिवसेनेचाही जल्लोष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फलटण-कोरेगावमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार; अजित पवारांना धक्के सुरुच
फलटण-कोरेगावमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार; अजित पवारांना धक्के सुरुच
Ladki Bahin Yojna: छातीत कळ आली अन् खाली कोसळल्या,  मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'लाडक्या बहिणीचा' मृत्यू
Ladki Bahin Yojna: छातीत कळ आली अन् खाली कोसळल्या, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'लाडक्या बहिणीचा' मृत्यू
Dilip Khedkar : मोठी बातमी : पूजा खेडकरच्या वडिलांचा विधानसभेसाठी शड्डू, भाजपकडे उमेदवारी मागणार, मतदारसंघही ठरला!
मोठी बातमी : पूजा खेडकरच्या वडिलांचा विधानसभेसाठी शड्डू, भाजपकडे उमेदवारी मागणार, मतदारसंघही ठरला!
Harshvardhan Patil : तोपर्यंत हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देऊ नये! थेट आमदाराच्या मागणीने इंदापुरात आता नवा वाढण्याची शक्यता
तोपर्यंत हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देऊ नये! थेट आमदाराच्या मागणीने इंदापुरात आता नवा वाढण्याची शक्यता
कॅबिनेट मंत्री राज ठाकरेंच्या घरी, गेल्यावर्षी टोलबाबत चर्चा, यावर्षी निर्णय,  मनसेचा अ‍ॅक्शन प्लॅन नेमका काय होता?
कॅबिनेट मंत्री राज ठाकरेंच्या घरी, गेल्यावर्षी टोलबाबत चर्चा, यावर्षी निर्णय,  मनसेचा अ‍ॅक्शन प्लॅन नेमका काय होता?
केंद्राच्या जुन्या निर्णयामुळे लॉरेन्स बिश्नोईचा ताबा मिळण्यास अडचण, आता मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय!
केंद्राच्या जुन्या निर्णयामुळे लॉरेन्स बिश्नोईचा ताबा मिळण्यास अडचण, आता मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय!
Chandgad Vidhan Sabha : चंदगडमध्ये भाजप आणि अजित पवार गटामध्ये पुन्हा वादाची ठिणगी; राजेश पाटील म्हणाले, 'महायुती अबाधित ठेवायची असेल, तर..'
चंदगडमध्ये भाजप आणि अजित पवार गटामध्ये पुन्हा वादाची ठिणगी; राजेश पाटील म्हणाले, 'महायुती अबाधित ठेवायची असेल, तर..'
Nashik News : येवल्यात भुजबळ-जरांगे समर्थकांमध्ये जोरदार राडा, 44 जणांविरोधात गुन्हा दाखल
येवल्यात भुजबळ-जरांगे समर्थकांमध्ये जोरदार राडा, 44 जणांविरोधात गुन्हा दाखल
Embed widget