एक्स्प्लोर

2nd January In History : आजच्या दिवशी सुरू झाला भारतरत्न पुरस्कार,  गीतकार सफदर हश्मी यांचे निधन; आज इतिहासात 

On This Day In History :  भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद 2 जानेवारी 1954 भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली. तसेच कवी आणि गीतकार सफदर हश्मी यांचे आजच्याच दिवशी निधन झाले. 

मुंबई : भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा यांसारख्या विशिष्ट क्षेत्रात देशाची असाधारण आणि उल्लेखनीय सेवा करणाऱ्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' (Bharat Ratna) दिला जातो. 2 जानेवारी 1954 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद (Former President of India Rajendra Prasad) यांनी या सन्मानाची स्थापना केली होती. 2 जानेवारी 1989 मध्ये कवी आणि गीतकार सफदर हश्मी यांचे निधन झाले. तसेच वीर भाई कोतवाल यांचे देखील आजच्या दिवशी निधन झाले. प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.

1906: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती डी. एन. खुरोदे यांचा जन्मदिन Dara Nusserwanji Khurody

दारा नुसेरवानजी खुरोडे ( Dara Nusserwanji Khurody) हे एक प्रसिद्ध भारतीय उद्योजक होते. जे भारताच्या दुग्ध उद्योगातील त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी अनेक खाजगी आणि सरकारी संस्थांमध्ये काम केले. पुढे त्यांनी अनेक सरकारी उच्च पदांवरही काम केले. डी.एन. खुरोडे यांनी 1946 ते 1952 या काळात मुंबईचे दूध आयुक्त म्हणूनही काम पाहिले. 1963 मध्ये डी.एन. खुरोडे यांना वर्गीस कुरियन यांच्यासोबत संयुक्तपणे 'रॅमन मॅगसेसे पुरस्कार' प्रदान करण्यात आला. भारत सरकारने 1964 मध्ये त्यांना 'पद्मभूषण' देऊन गौरविले.

1943 : भाई कोतवाल यांचे निधन

विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ भाई कोतवाल हे रायगड जिल्ह्यातील समाजसेवक आणि स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांनी सशस्त्र क्रांतीचाही अवलंब केला. ते समाजसुधारक आणि क्रांतिकारक होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. 2 जानेवारी 1943 रोजी सिद्धगडच्या जंगलात ते आपल्या टीमसह भूमिगत असताना ब्रिटीश पोलीस अधिकारी डीएसपी आर. हॉल यांच्याशी झालेल्या चकमकीत ते मारले गेले.  एल.एल.बी झालेल्या भाईंनी देशप्रेमाने प्रभावित होउन स्वतःला देशकार्यास वाहून घेतले. विठ्ठल कोतवाल यांचा जन्म 1 डिसेंबर 1912 रोजी रायगड जिल्ह्यातील मुंबईजवळील माथेरान येथे झाला. 

1954 : राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली

भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना आणि अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. १९५४ मध्ये तत्कालीन भारत सरकारतर्फे घेण्यात आला. त्यानंतर 2 जानेवारी 1954 मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती  डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यावर मोहोर उठवली. 

1959:  किर्ती आझाद यांचा जन्मदिन (Kirti Azad)

माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी कीर्ती आझाद यांचा आज वाढदिवस आहे. 2 जानेवारी 1959 रोजी बिहारच्या पूर्णिया येथे जन्मलेले कीर्ती आझाद यांचे वडील भागवत झा बिहारचे मुख्यमंत्रीही होते. वडिलांकडूनच त्यांना राजकारणाचा वारसा लाभला. कीर्ती आझाद यांनी भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य म्हणून 7 कसोटी आणि 25 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ते 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते. 

1989 : कवी आणि गीतकार सफदर हाश्मी यांचे निधन

अभिनेते, दिग्दर्शक, लेखक-कवी सफदर हाश्मी यांचे 2 जानेवारी 1989 रोजी निधन झाले. सफदर हाश्मी हे कम्युनिस्ट विचारसरणीचे होते. विद्यार्थी जीवनात त्यांनी स्टु़डंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेचे सक्रीय सभासद होते. 'इप्टा'मधून बाहेर पडत त्यांनी दिल्लीत 1973 मध्ये जन नाट्य मंचची (जनम) स्थापना केली. 

'जनम'चा सीटू या डाव्या विचारांच्या कामगार संघटनेशी घनिष्ट संबंध होता. याशिवाय त्यांनी लोकशाहीवादी विद्यार्थी, महिला, तरुण, शेतकरी इत्यादींच्या चळवळींमध्येही सक्रिय भूमिका बजावली. आणीबाणी लागू झाल्यानंतर सफदर हाश्मी हे गढवाल, काश्मीर येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यानंतर पुढे दिल्लीच्या विद्यापीठात इंग्रजी साहित्य विषयाचे लेक्चरर होते.  आणीबाणीनंतर, सफदर पुन्हा राजकीयदृष्ट्या सक्रिय झाले. 'जनम' ही भारतातील एक महत्त्वाची पथनाट्य संस्था म्हणून उदयास आली. 

दोन लाख कामगारांच्या प्रचंड मेळाव्यासमोर 'मशीन' हे नवे पथनाट्य सादर करण्यात आले. यानंतर आणखी बरीच नाटके आली, ज्यात शेतकऱ्यांची अस्वस्थता दाखवणारे 'गाव से शहर तक' हे नाटक, जातीयवादी फॅसिझमचे चित्रण असणारे नाटक , बेरोजगारीवर आधारीत 'तीन करोड', घरगुती हिंसाचारावर आधारीत 'औरत' आदी पथनाटके गाजली. सफदरने दूरदर्शनसाठी अनेक माहितीपट आणि 'खिलती कलियों का' या मालिकेची निर्मितीही केली. त्यांनी लहान मुलांसाठी पुस्तके लिहिली आणि भारतीय रंगभूमीच्या समीक्षेतही योगदान दिले.
 
साहिबाबाद येथे 1 जानेवारी 1989 मध्ये पथनाट्य सादर करत असताना गुंडानी जन नाट्य मंचच्या कलाकारांवर हल्ला केला. आपल्या सहकाऱ्यांना वाचवताना सफदर हाश्मी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर 2 जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले. त्यावेळी ते फक्त 34 वर्षांचे होते.

2015: भारतीय शास्रज्ञ वसंत गोवारीकर यांचे निधन 

वसंत रणछोड गोवारीकर हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. गोवारीकर हे 1991 ते 1993 या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकर हे 1994 ते 2000 या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला डॉ. गोवारीकरांचे नाव देण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या घडामोडी

1316: दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याचे निधन.
1757: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.
1936: मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना
1942 : दुसऱ्या महायुद्धात  जपानी सैन्याने फिलिपाइन्सची राजधानी मनिला ताब्यात घेतली. 
1978 : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी काँग्रेस (आय) नावाने एक नवीन पक्ष स्थापन केला आणि स्वतःला त्याचे अध्यक्ष म्हणून घोषित केले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget