एक्स्प्लोर

Ahmednagar : अहमदनगरचे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर' नामांतर करा; गोपीचंद पडळकरांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र 

अहमदनगरचे (Ahmednagar ) नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर (Punyashlok Ahilya Devi Nagar) करावे अशी मागणी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis)यांच्याकडे केली आहे

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याचे (Ahmednagar) नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर (Punyashlok Ahilya Devi Nagar) करावे अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे औरंगाबाद पाठोपाठ आता अहमदनगरचेही नामांतर होणार का? याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे अवघ्या हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेव्हा मुघल, निजामशाहीत हिंदूसंस्कृतीवर हल्ले होत होते, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदुसंस्कृतीत प्राण फुंकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. अनेक घाट, बारव बांधले. मंदिरांचे पुनर्निर्माण केलं, स्त्रीयांना सन्मान मिळवून दिला. लोकहितासाठी कुशल प्रशासनाचा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला.आज जे काही या देशातलं सांस्कृतिक वैभव टिकून आहे त्यात हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा मोठा वाटा आणि वारसा आहे. असं आमदार पडळकर यांनी म्हटलं आहे.

सोबतच अहमदनगरची ओळख करून देताना निजामशाही इतिहास डोकावता कामा नये असंही पडळकर यांनी म्हटलं आहे.त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर' करावे ही लोकभावना आहे असं त्यांनी म्हटलं आहे. हिंदू राजमाता, हिंदू संस्कृतीच्या जीर्णोद्धारकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे 'अहमदनगर' नाव बदलून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करण्यात यावे, अशी मागणी पडळकर यांनी पत्रातून केली आहे. 

राज्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचं नामांतर अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असं करण्यात आलं आहे. या नामांतराला काही पक्षांनी विरोध देखील केला आहे. त्यातच आता आमदार पडळकर यांनी ही मागणी केल्याने नवा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sandeep Deshpande: महाराष्ट्र भूषण सोहळ्यात अमित शाहांसमोर चेंगराचेंगरी होऊन लोकं मेली तेव्हा अमित साटमांना आंदोलन करावसं वाटलं नाही का? मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल
भाजप मुंबईचं महापौर मिळवण्यासाठी अर्णव खैरेच्या मृत्यूचं नीच राजकारण करतोय; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
BMC : मुंबईतील प्रभाग आरक्षणावर 129 हरकती, महापालिका आयुक्त अंतिम निर्णय घेणार
मुंबईतील प्रभाग आरक्षणावर 129 हरकती, महापालिका आयुक्त अंतिम निर्णय घेणार
Uddhav Thackeray: भाषावाद, प्रांतवादाचे विष भाजप-संघ पसरत आहे आणि खापर आपल्यावर फोडतोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
भाषावाद, प्रांतवादाचे विष भाजप-संघ पसरत आहे आणि खापर आपल्यावर फोडतोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Surya Kant: सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहणार; भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहणार; भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jitendra Awhad On MNS Yuti : सर्वांना एकत्र घेऊन मुंबईची निडणूक लढण्याचा निर्णय, आव्हाडांची माहिती
Ajit Pawar Jalna : नगरसेवक पदाच्या उमेदवारांना खुर्च्या न दिल्याने अजितदादा संतापले..
Omprakash Rajenimbalkar : जे पेरलं तेच उगवत आहे, कुसळ पेरली तर कुसळच उगवतात, शिंदेंना खोचक टोला
Delhi Blast Update: दिल्लीत स्फोटकं बनवण्यासाठी पिठाच्या चक्कीचा वापर, सूत्रांची माहिती
Ameet Satam On Thackeray : ठाकरे बंधूंना समज येण्यासाठी आम्ही प्रार्थना करणार- साटम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sandeep Deshpande: महाराष्ट्र भूषण सोहळ्यात अमित शाहांसमोर चेंगराचेंगरी होऊन लोकं मेली तेव्हा अमित साटमांना आंदोलन करावसं वाटलं नाही का? मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल
भाजप मुंबईचं महापौर मिळवण्यासाठी अर्णव खैरेच्या मृत्यूचं नीच राजकारण करतोय; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
BMC : मुंबईतील प्रभाग आरक्षणावर 129 हरकती, महापालिका आयुक्त अंतिम निर्णय घेणार
मुंबईतील प्रभाग आरक्षणावर 129 हरकती, महापालिका आयुक्त अंतिम निर्णय घेणार
Uddhav Thackeray: भाषावाद, प्रांतवादाचे विष भाजप-संघ पसरत आहे आणि खापर आपल्यावर फोडतोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
भाषावाद, प्रांतवादाचे विष भाजप-संघ पसरत आहे आणि खापर आपल्यावर फोडतोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Surya Kant: सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहणार; भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहणार; भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
Sharad Pawar with Thackeray brothers: ठाकरेंशी फारकत घेणाऱ्या काँग्रेससोबत जाण्यास शरद पवारांचा नकार, राज-उद्धवशी युती करण्याचे संकेत
ठाकरेंशी फारकत घेणाऱ्या काँग्रेससोबत जाण्यास शरद पवारांचा नकार, राज-उद्धवशी युती करण्याचे संकेत
Amit Satam: संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार
Ghulam Nabi Azad: झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका
Embed widget