एक्स्प्लोर

Aerosol Pollution In Maharashtra : महाराष्ट्रातील एरोसोल प्रदूषण 'धोकादायक'वरुन 'अति धोकादायक' पातळीवर जाण्याचा अंदाज

Aerosol Pollution In Maharashtra : महाराष्ट्रातील 'एरोसोल' प्रदूषण हे सध्याच्या 'धोकादायक'वरुन 'अति धोकादायक' पातळीवर जाण्याची शक्यता आहे. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, घनकचरा जाळणे आणि वाहनांद्वारे होणारे उत्सर्जन हे महाराष्ट्रातील 'एरोसोल' प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहेत.

Aerosol Pollution In Maharashtra : महाराष्ट्रातील 'एरोसोल' (Aerosol) प्रदूषणाचे प्रमाण हे सध्याच्या 'धोकादायक' पातळीवरुन 'अति धोकादायक' पातळीवर जाण्याची शक्यता आहे. कोलकाता (Kolkata) येथील बोस इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासातून हा इशारा देण्यात आला आहे. 'अ डीप इन्साइट इनटू स्टेट-लेव्हल एरोसोल पोल्यूशन इन इंडिया' हा ताजा अभ्यास प्रकाशित झाला आहे.

औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, घनकचरा जाळणे आणि वाहनांद्वारे होणारे उत्सर्जन हे महाराष्ट्रातील 'एरोसोल' प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहेत. अभ्यासात देशातील विविध राज्यांचे दीर्घकालीन कल (2005-2019), स्रोत विभागणी आणि भविष्यातील शक्यता मांडण्यात आल्या आहेत. यानुसार महाराष्ट्र सध्या 'धोकादायक' वर्गात असून यात एओडीचे (एरोसोल ऑप्टिकल डेप्थ) प्रमाण 0.4 ते 0.5 इतके आहे. वाढत्या प्रदूषणामुळे ते 0.5 पातळीच्या पार जात अतिधोकादायक वर्गात जाण्याची शक्यता आहे.

प्रदूषणाच्या स्रोताचे मूल्यमापन 2005 ते 2009, 2010 ते 2014 आणि 2015 ते 2019 अशा तीन टप्प्यांवर करण्यात आले आहेत. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या उत्सर्जनाचा वाटा 2015 ते 2019 मध्ये 39 टक्के इतका होता. तर घनकचरा जाळण्याने होणारे एरोसोल प्रदूषणाचे प्रमाण 24 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर, तर वाहनांद्वारे होणाऱ्या उत्सर्जनाचे प्रमाण तीनही टप्प्यांमध्ये 14 ते 15 टक्के होते. 

एरोसोल म्हणजे काय? 

पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते वातावरणातील विविध स्तरांमध्ये हवेत वितरीत झालेले धुळीचे कण, धूर, धुके, समुद्री मीठ, सल्फेट, वाळवंटातील धूळ याची एकत्रित मोजमाप होते 

वातावरणातील विविध लेअर्समध्ये मोजमाप झालेल्या पॅरामीटरला एरोसोल ऑप्टिकल डेप्थ म्हणजेच एओडी म्हणतात 

सरळसरळ म्हणायचं तर एरोसोल म्हणजेच पीएम 2.5 ची मात्रा वातावरणात किती आहे हे यातून कळते 

धुळीचे कण, धूर, धुके, समुद्री मीठ, सल्फेट, वाळवंटातील धूळ हे श्वसनास हानिकारक असतात.

दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली
दोन वर्षांनंतर देशभरात कोरोना निर्बंधमुक्त दिवाळी (Diwali 2022) साजरी करण्यात आली. परंतु लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फोडलेल्या फटाक्यांमुळे मुंबईतील हवा प्रदूषित झाली. मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली. संपूर्ण पावसाळ्यात हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक स्थितीत होता. पण पावसाचे प्रमाण कमी होताच आणि दिवाळीतील आतषबाजीमुळे हवा गुणवत्ता खालावली. हवेची ढासळलेली गुणवत्ता लहान मुले, हृदयरुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी धोकादायक आहे.

इतर महत्त्वाची बातमी

Firecracker: प्रदूषणामुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णात होत आहे वाढ, फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मुंबई-पुण्यातील हवा गुणवत्तेवर परिणाम

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
Vanrang 2026 Mumbai : दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget