एक्स्प्लोर

Aerosol Pollution In Maharashtra : महाराष्ट्रातील एरोसोल प्रदूषण 'धोकादायक'वरुन 'अति धोकादायक' पातळीवर जाण्याचा अंदाज

Aerosol Pollution In Maharashtra : महाराष्ट्रातील 'एरोसोल' प्रदूषण हे सध्याच्या 'धोकादायक'वरुन 'अति धोकादायक' पातळीवर जाण्याची शक्यता आहे. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, घनकचरा जाळणे आणि वाहनांद्वारे होणारे उत्सर्जन हे महाराष्ट्रातील 'एरोसोल' प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहेत.

Aerosol Pollution In Maharashtra : महाराष्ट्रातील 'एरोसोल' (Aerosol) प्रदूषणाचे प्रमाण हे सध्याच्या 'धोकादायक' पातळीवरुन 'अति धोकादायक' पातळीवर जाण्याची शक्यता आहे. कोलकाता (Kolkata) येथील बोस इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासातून हा इशारा देण्यात आला आहे. 'अ डीप इन्साइट इनटू स्टेट-लेव्हल एरोसोल पोल्यूशन इन इंडिया' हा ताजा अभ्यास प्रकाशित झाला आहे.

औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, घनकचरा जाळणे आणि वाहनांद्वारे होणारे उत्सर्जन हे महाराष्ट्रातील 'एरोसोल' प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहेत. अभ्यासात देशातील विविध राज्यांचे दीर्घकालीन कल (2005-2019), स्रोत विभागणी आणि भविष्यातील शक्यता मांडण्यात आल्या आहेत. यानुसार महाराष्ट्र सध्या 'धोकादायक' वर्गात असून यात एओडीचे (एरोसोल ऑप्टिकल डेप्थ) प्रमाण 0.4 ते 0.5 इतके आहे. वाढत्या प्रदूषणामुळे ते 0.5 पातळीच्या पार जात अतिधोकादायक वर्गात जाण्याची शक्यता आहे.

प्रदूषणाच्या स्रोताचे मूल्यमापन 2005 ते 2009, 2010 ते 2014 आणि 2015 ते 2019 अशा तीन टप्प्यांवर करण्यात आले आहेत. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या उत्सर्जनाचा वाटा 2015 ते 2019 मध्ये 39 टक्के इतका होता. तर घनकचरा जाळण्याने होणारे एरोसोल प्रदूषणाचे प्रमाण 24 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर, तर वाहनांद्वारे होणाऱ्या उत्सर्जनाचे प्रमाण तीनही टप्प्यांमध्ये 14 ते 15 टक्के होते. 

एरोसोल म्हणजे काय? 

पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते वातावरणातील विविध स्तरांमध्ये हवेत वितरीत झालेले धुळीचे कण, धूर, धुके, समुद्री मीठ, सल्फेट, वाळवंटातील धूळ याची एकत्रित मोजमाप होते 

वातावरणातील विविध लेअर्समध्ये मोजमाप झालेल्या पॅरामीटरला एरोसोल ऑप्टिकल डेप्थ म्हणजेच एओडी म्हणतात 

सरळसरळ म्हणायचं तर एरोसोल म्हणजेच पीएम 2.5 ची मात्रा वातावरणात किती आहे हे यातून कळते 

धुळीचे कण, धूर, धुके, समुद्री मीठ, सल्फेट, वाळवंटातील धूळ हे श्वसनास हानिकारक असतात.

दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली
दोन वर्षांनंतर देशभरात कोरोना निर्बंधमुक्त दिवाळी (Diwali 2022) साजरी करण्यात आली. परंतु लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फोडलेल्या फटाक्यांमुळे मुंबईतील हवा प्रदूषित झाली. मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली. संपूर्ण पावसाळ्यात हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक स्थितीत होता. पण पावसाचे प्रमाण कमी होताच आणि दिवाळीतील आतषबाजीमुळे हवा गुणवत्ता खालावली. हवेची ढासळलेली गुणवत्ता लहान मुले, हृदयरुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी धोकादायक आहे.

इतर महत्त्वाची बातमी

Firecracker: प्रदूषणामुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णात होत आहे वाढ, फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मुंबई-पुण्यातील हवा गुणवत्तेवर परिणाम

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जुलै 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
Embed widget