Hinganghat Women Ablaze | आरोपीलाही पीडितेप्रमाणेच यातना व्हायला हव्या, वडिलांची उद्विग्न प्रतिक्रिया
वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये 3 फेब्रुवारीला आरोपी विकी नगराळेने एकतर्फी प्रेमातून तरुणीला जिंवत जाळलं. या हल्ल्यात शिक्षिका असलेल्या तरुणीचा चेहरा पूर्णत: भाजला होता. सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर आज तिची प्राणज्योत मालवली.

महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची ट्विटरवर प्रतिक्रिया - माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय... महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला, आपण या 'हिंसक-पुरुषी' मानसिकतेशी संघर्ष सुरू करूया #हिंगणघाटअतिशय दुःखद..! अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यु झाला.या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होतेय.पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती.या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली.तिच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
— Supriya Sule (@supriya_sule) February 10, 2020
"त्या नराधम आरोपीला लवकरात लवकर कशी शिक्षा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असून महिला व बालकल्याण विभागातर्फे पीडित कुटुंबाला आर्थिक मदत सुदधा मंजूर केली असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शासन ठोस पाऊले उचलत असल्याचेही बच्चू कडू यांनी सांगितले. हिंगणघाटच्या निर्भयाचा आज वेदनादायी अंत झाला कोणत्या शतकातं आहोतं आपण, दिवसेंदिवस महिलांचे प्रश्न कमी न होता वाढताहेत. बाई म्हणून तिच्या कतृत्वाच्या कहाण्यांपेक्षा अत्याचाराच्या कहाण्या होताहेत कोण जबाबदार याला कोण घेणार जबाबदारी. आज ती जळाली नाही समाजाचा व व्यवस्थेचा बुरखा जळालाय, असं ट्विट भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिलीय.माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय... महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला, आपण या ‘हिंसक-पुरुषी’ मानसिकतेशी संघर्ष सुरू करूया #हिंगणघाट
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) February 10, 2020
हिंगणघाट घटनेतील तरुणीच्या मृत्यूप्रकरणी कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी दुःख व्यक्त केलय. कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करत यातील आरोपीला फाशीची शिक्षा दिली जावी अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केलीय. तसेच मनाला चीड आणणारी अशी ही घटना असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, असंही ते म्हणाले आहेत. चव्हाण नांदेडमध्ये माध्यमांशी बोलत होते. हिंगणघाट येथील मुलीचा मृत्यू दुर्दैवी आहे. आमच्या सरकारच्या वतीने आम्ही तिला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मुंबईतील डॉक्टर स्थानिक डॉक्टरांनीही खूप प्रयत्न केले. मी मुलीच्या वडिलांशी बोललो. आम्ही मुलीच्या कुटुंबासोबत आहोत. घरातील भावाला किंवा आणखी कोणाला तरी नोकरीत सामावून घेऊ. शासनाकडून कुटुंबाला मदत करू तसेच ज्येष्ठी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांच्याशी देखील बोललो आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक वर चालवून लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा मृत्यू दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. ते म्हणाले, डॉक्टरांनी प्रयत्न केले. पण नियतीला मान्य नव्हतं. कोणत्याही व्यक्तीचं मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. कठोर कायदे केले पाहिजेत, असा कायदा होत नाही तोपर्यंत त्या बहिणीला न्याय मिळणार नाही. राज्यात अशा घटना घडू नये यासाठी समाजाचं प्रबोधन होणं गरजेचं असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं. संबंधित बातमी : Hinganghat Women Ablaze | हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीचा मृत्यू Hinganghat Burnt Teacher Death | हा मृत्यू नसून खून : खासदार सुप्रिया सुळे | ABP Majha#हिंगणघाट च्या निर्भयाचा आज वेदनादायी अंत झाला कोणत्या शतकातं आहोतं आपण,दिवसेंदिवस महिलांचे प्रश्न कमी न होता वाढताहेत.बाई म्हणून तिच्या कतृत्वाच्या कहाण्यांपेक्षा अत्याचाराच्या कहाण्या होताहेत कोण जबाबदार याला कोण घेणार जबाबदारी.आज ती जळाली नाही समाजाचा व व्यवस्थेचा बुरखा जळाला
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 10, 2020






















