एक्स्प्लोर

पालघरमध्ये कुपोषणाचा वाढता आलेख, सात महिन्यात 119 बळी

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुपोषण आणि विविध आजारांमुळे बालमृत्यू होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. जिल्हा स्थापनेपासून हे प्रमाण कमी व्हावे, यासाठी अनेक उपाययोजना आखण्यात आल्या, तरी पहिल्या दोन वर्षात अडीच टक्के इतक्या प्रमाणात बालमृत्यू झाले.

पालघर : पालघर जिल्हा निर्मिती होऊन चार वर्षे उलटली, परंतु कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी अनेक उपाययोजना आखल्या गेल्या असल्या तरी बालमृत्यूचे ग्रहण या जिल्ह्याला अजूनही लागले आहे. 2017-18 मध्ये पालघरमध्ये तब्बल 469 बालमृत्यू झाले असून, चालू वर्षात गेल्या सात महिन्यात जुलैपर्यंत 119 बालकांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यु झाले आहेत. नुकतेच वाडा तालुक्यातील गूंज आश्रमशाळेतील आठवीत शिकणाऱ्या प्रमिला शांताराम पागी या विद्यार्थिनीचा भुकेमुळे (कुपोषणाने) उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रमिलाचे हिमोग्लोबिन अत्यंत कमी म्हणजे 2 पर्यंत गेल्याने तिचा मृत्यू झाला. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुपोषण आणि विविध आजारांमुळे बालमृत्यू होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. जिल्हा स्थापनेपासून हे प्रमाण कमी व्हावे, यासाठी अनेक उपाययोजना आखण्यात आल्या, तरी पहिल्या दोन वर्षात अडीच टक्के इतक्या प्रमाणात बालमृत्यू झाले. त्यानंतर गरोदर, स्तनदा माता, किशोरवयीन मुली व नवजात बालकांसाठी पोषण आहार, आरोग्य तपासणी यासाठी योजना आखण्यात येऊन त्यावर देखरेख ठेवण्यासाठी आरोग्य मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली विशेष टास्क फोर्सची स्थापनाही झाली. मात्र बालमृत्यूचे प्रमाणात अजूनही लक्षणीय राहिल्याने शासनाला पोषण आहार, आरोग्य सेवांसोबत स्थानिक पातळीवर अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. 2014-15 मध्ये 626 बालमृत्यूची नोंद झाली असताना, 2015-16 मध्ये 565, 2016-17 मध्ये 557, सन 2017-18 मध्ये 469 इतक्या बालमृत्यूची नोंद झाली आहे. या सोबत प्रसूतीच्या वेळी सन 2014-15 मध्ये 16, सन 2015-16 मध्ये 15, सन 2016-17 मध्ये 18, सन 2017- 18 मध्ये 19 मातांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. बालमृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाण डहाणू आणि जव्हार तालुक्यात अधिक प्रणाम असून मोखाडा, पालघर, तलासरी, विक्रमगड आणि वाडा तालुक्यात देखील लक्षणीय आहे. आकडेवारी : साल 2014-15  बालमृत्यू - 626 एकूण जन्म – 25474 साल 2015-16  बालमृत्यू - 565 एकूण जन्म – 24716 साल 2016-17  बालमृत्यू - 557 एकूण जन्म – 27750 साल 2017-18  बालमृत्यू - 469 एकूण जन्म – 28462

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget