एक्स्प्लोर
Advertisement
UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)
लातूर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा! उदगीरसह इतर तीन तालुक्यात कोरोनाचा शिरकाव
लातूर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उदगीर शहरासह लातूर, चाकूर आणि जळकोट तालुक्यात कोरोना रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा विळखा वाढला आहे.
लातूर : आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ उदगीर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. रविवारी मात्र, उदगीर शहरासह लातूर, चाकूर आणि जळकोट तालुक्यात कोरोना रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा विळखा वाढला आहे. त्यामुळे प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकही चिंता व्यक्त करत आहे. पुण्या-मुंबईहून परतलेल्या नागरिकांमुळे हा धोका निर्माण होत आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 55 लोकांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. पैकी 29 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. त्यामुळे आता 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर, कोरोनामुळे जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे,.
दिवसेंदिवस जिल्ह्यातील केवळ उदगीर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. मात्र, आता इतर तालुक्यांमध्येही रुग्ण संख्या वाढत आहे. रविवारी लातूर शहरातील माळी गल्ली आणि चाकूर तालुक्यातील वडवळ येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. तर जळकोट येथील एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. रविवारी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लातूर आणि चाकूर येथून 11 नमुने तपासणीसाठी आले होते. तर उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून 9 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी आले असून उदगीर शहरातील 3 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.
धक्कादायक! आज राज्यात एका दिवसात सर्वाधिक 2 हजार 347 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
आतापर्यंत कोरोना हा एका शहरापुरता मर्यादित होता. मात्र, यामध्ये आता लातूर, जळकोट आणि चाकूर तालुक्याची भर पडली आहे. पुण्या-मुंबईहून परतलेल्या नागरिकांमुळे हा धोका निर्माण होत आहे. लातूर शहरातील माळी गल्ली येथे आढळून आलेला रुग्ण हा ठाणे येथून परतला होता. तो थेट रुग्णालयात दाखल झाल्याने कुणाच्या संपर्कात आला नसल्याचे वैद्यकीय अधिकारी यांचे म्हणणे आहे. मात्र, आता लातूर जिल्ह्याला कोरोनाचा धोका वाढला असून लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या तोंडावर विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनासमोर आहे हे नक्की. राज्यात आज कोरोना संक्रमितांची विक्रमी वाढ राज्यात आज विक्रमी 2 हजार 347 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची एक दिवसातील ही सर्वात मोठी वाढ आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 600 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंतच 7 हजार 688 जणांनी यशस्वीरित्या कोरोनाला हरवलं आहे. तर, आज 63 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. परिणामी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजार 198 इतकी झाली आहे.Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
शिक्षण
भारत
निवडणूक
Advertisement