एक्स्प्लोर

Latur Rada : निवेदनाला लाथाबुक्यांनी उत्तर देत असाल तर छावा संघटना आपल्या स्टाइलनं उत्तर देणार, छावाच्या विजयकुमार घाडगेंचा इशारा

Latur Rada : अखिल भारतीय छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला मारहाणीनंतर इशारा दिला आहे. याचा हिशोब करणार असं त्यांनी म्हटलं.

लातूर :अखिल भारतीय छावा संघटनेनं माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दिलं. निवेदन दिल्यानंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते आणि प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे हे रेस्ट हाऊसच्या दुसऱ्या हॉलमध्ये बसले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीसंदर्भात विजयकुमार घाडगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विजयकुमार घाडगे काय म्हणाले?

अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांना माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करणारं निवेदन दिलं. दोन दिवसांपूर्वी ते पत्ते खेळताना आढळून आले, म्हणून असे कृषी मंत्री नका ठेवू असं सांगणारं निवेदनं दिलं. त्यानंतर बाहेर येऊन दुसऱ्या हॉलमध्ये बसलो. त्यानंतर राष्ट्रवादीचे गुंड लोक आले आणि  त्यांनी आमच्यावर हल्ला केला. सत्तेचा माज काय असतो तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला.  अजित पवार यांना सांगणं आहे, अजितदादा तुमच्या कार्यकर्त्यांनी छावाला डिवचलं आहे, छावा म्हणजे शेतकऱ्यांची पोरं आहेत. या गोष्टीचा हिशोब होणार, चुकीच्या पद्धतीनं लोकांना हात घातला आहे. निवेदनाला लाथाबुक्यांनी उत्तर देत असाल तर छावा संघटना आपल्या स्टाइलनं उत्तर देईल. याची राजकीय सामाजिक किंमत तुम्हाला मोजावी लागेल. 

मारहाण करणारं माझ्या ओळखीचं नव्हतं, सत्तेचा माज आलेला आहेना, तो बरोबर नाही कोणी ताम्रपट घेऊन आलेला नाही.  शेवटी त्यांचाच  राज्यकारभार आहे, सगळ्या एजन्सी त्यांच्या मनावर चालतात. पोलीस शेतकऱ्यांची पोरं आहेत, माझ्या कार्यकर्त्यांवर बळाचा वापर करत आहात.  एखाद्या दिवशी याचं उत्तर मिळेल, असं विजयकुमार घाडगे म्हणाले. या घटनेनंतर लातूरच्या विश्रामगृहाजवळ छावाच्या कार्यकर्त्यांनी जमण्यास सुरुवात केली. 

लातूरमध्ये नेमकं काय घडलं? 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे त्यांच्या कार्यकर्त्यांसह तिथं आले. त्यांनी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली. याबाबतचं निवेदन तटकरेंना देण्यात आलं. याच दरम्यान छावाच्या कार्यकर्त्यांनी टेबलावर पत्ते फेकले. यानंतर घोषणाबाजी करत छावाचे कार्यकर्ते तिथून निघून गेले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि इतर  कार्यकर्त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली.  

योगेश केदार यांनी छावा संघटनेच्या शेतकरी नेते असलेल्या विजय घाडगे यांना मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादिच्या सूरज चव्हाण यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्याची मागणी केली. या मारहाणीचा जाहीर निषेध करत असल्याचं योगेश केदार म्हणाले. राज्यात लोकशाही आहे की ठोकशाही आहे याचे उत्तर अजितदादा पवारांनी द्यावे, असं सवाल योगेश केदार यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget