एक्स्प्लोर

Latur News: शेतकऱ्यांच्या घामाला मिळेना दाम; लातूरच्या बाजारात भाजीपाल्याला भाव नाही, शेतकरी सापडला संकटात

Latur News: कांद्याला किलोला तीन रुपये मिळत नाहीत..मेथीला तर भावच नाही .. कोणतेही भाजी किलो  दहा रुपयापेक्षा  दराने विकली जात आहे. 

लातूर : अगोदर अवकाळीने कंबरडे मोडले असताना आता भाजीपाल्याचे दर (Vegetable Prices) अचानक कोसळले आहेत, याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना (Farmers) बसताना दिसून येत आहे.  उत्पादक शेतकऱ्यांना पिकवलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकावा लागत आहे. टोमॅटो एक रुपये किलो तर कांद्याला तीन रूपये किलो पालेभाज्या 4 ते 5 रुपये जुडी या दराने विकल्या जात आहेत. सर्वच भाज्या दहा रुपये किलोच्या घरात विकल्या जात असल्यामुळे भाजीपाला उत्पादक  आर्थिक संकटात सापडला आहे. 

सर्वत्र दर वाढत आहेत यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले मात्र भाज्यांच्या घसरलेल्या दरांनी  शेतकऱ्याचे अर्थकारण पार कोलमडून गेले आहे. टोमॅटोचे पीक अक्षरश: नष्ट करण्याची किंवा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. कांद्याला किलोला तीन रुपये मिळत नाहीत..मेथीला तर भावच नाही .. कोणतेही भाजी किलो  दहा रुपयापेक्षा  दराने विकली जात आहे. 

वाढलेला वाहतूक खर्च आणि मिळणारा बाजारभाव यांच्या चक्रात शेतकरी पार गुरफटून गेला आहे. कमी दर मिळत असल्याने उत्पादन आणि दळणवळण खर्चही निघत नाही. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड झाली आहे. काही महिन्यांपूर्वी कांद्याचे भाव पडलेले होते. ते स्थिर होण्यासाठी बराच वेळ  लागला होता. मात्र आता रोज कांद्याचे भाव पडत आहेत. काही दिवसापूर्वी 60 किलोच्या कट्ट्याला चारशे रुपये भाव होता तो आता 150 रुपयावर आला आहे. त्यात आवक ही रोज वाढत चालली आहे. लग्न सराईमध्ये कांद्याला भाव येईल ही आशा ही आता धुळीला मिळाली आहे. पातीचा कांदा ही मोठ्या प्रमाणावर बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे भावात सतत घसरण होत चालली आहे.

लातूरच्या बाजारात येणार माल पुढे पाठवला जातो मात्र तेथे ही मागणी नसल्यामुळे भाव मिळत नाही. अवकाळी पावसाने कांद्याचे मोठे नुकसान केले आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे भाज्या लवकर खराब होत आहेत. याचा एकत्रित परिणाम हा भावावर झाला आहे.  कमी दर मिळत असल्याने उत्पादन आणि दळणवळण खर्चही निघत नाही. हीच अवस्था इतर भाजीपाला पिकाची ही होत आहे. टोमॅटो भाव नसल्यामुळे शेतकरी रस्त्यावर फेकून जात आहे. तर मेथी, पालक, वांगे गवार, दोडके यांच्याबरोबर इतर भाजीपाल्याची आवक वाढली असल्यामुळे भाव मिळत नाही. लातूरच्या भाजी मंडईत एका ही भाजीला 10 रुपयांच्या पुढे भाव मिळत नाही.

एकीकडे धान्याला हमीभाव दिला असताना त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही तर दुसरीकडे भाजीपाल्याचे दरही कवडीमोल होत आहेत. शेतकऱ्यानी केलेली मेहनत आणि खर्च निघणे दुरापास्त झाले आहे. त्यातच वाहतुकीच्या वाढलेल्या खर्चाने भर घातली आहे. 


 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget