एक्स्प्लोर

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन दुकानं तीन दिवस बंद; आठ महिन्यांपासून कमिशन नसल्यानं दुकानदार हवालदिल 

Maharashtra Kolhapur News: केंद्र सरकारकडून वितरित करण्यात येत असलेल्या मोफत धान्याचे कमिशन मिळावे, तसेच ते कोण देणार, याकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) 1500 रेशन दुकाने तीन दिवस बंद ठेवली जाणार आहेत.

Kolhapur News: केंद्र सरकारकडून वितरित करण्यात येत असलेल्या मोफत धान्याचे कमिशन मिळावे, तसेच ते कोण देणार, याकडे लक्ष वेधण्यासाठी 7 ते 9 फेब्रुवारीदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) 1500 रेशन दुकाने तीन दिवस बंद ठेवली जाणार आहेत. राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानारक महासंघाचे सचिव चंद्रकांत यादव यांनी याबाबत माहिती दिली आहे. चंद्रकांत यादव म्हणाले की, ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षेअंतर्गत प्रति व्यक्ती 5 किलो धान्य आणि अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिकार्ड 35 किलो धान्य देण्याची योजना वर्षभर सुरू राहणार आहे. वाटप झालेल्या धान्यावर कमिशन किती दिलं जाईल, याची माहिती दिलेली नाही. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. वितरकांना त्यांचे कमिशन मिळाले पाहिजे. यासाठी 7 ते 9 फेब्रुवारीदरम्यान देशव्यापी रेशन दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. 

या योजनेबाबत कोणत्याही स्पष्ट सूचना नाहीत. आठ महिन्यांमध्ये कमिशन मिळालेले नाही. यामुळे रेशन दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच हा डाव रेशन व्यवस्था खुली करण्याचा दिसत आहे. दिल्लीत 22 मार्चला संसदेवर महामोर्चा काढला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

धान्य वर्षभर मोफत देण्यात येणार

कोल्हापूर जिल्ह्यात अंत्योदय (Antyodaya Anna Yojana- AAY) आणि प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत दरमहा मिळणारे धान्य वर्षभर मोफत देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाची कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून अंमलबजावणी होईल. अंत्योदय योजनेसाठी 1 हजार 36.18 टन तांदूळ, 777.13 टन गहू, प्राधान्य गटासाठी 6 हजार 393.84 टन तांदूळ आणि 4 हजार 262.56 टन गहू दर महिन्याला वितरित केला जाणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पुढच्या एका वर्षासाठी मोफत रेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा देशभरातील 81 कोटीहून अधिक नागरिकांना होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत नागरिकांना दर महिन्याला दोन ते तीन रुपयामध्ये 5 किलो अन्नधान्य दिले जातात. अंत्योदय अन्न योजनेच्या अंतर्गत (Antyodaya Anna Yojana- AAY) येणाऱ्या कुटुंबाना दर महिन्याला 35 किलोग्रॅम अन्नधान्य देण्यात येतात.  

केंद्र सरकारने 31 डिसेंबर रोजी संपणाऱ्या राष्ट्रीय अन्न सुरक्षांतर्गत मोफत रेशनच्या योजनेला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पुढच्या डिसेंबरपर्यंत ही मोफत अन्नधान्याची योजना सुरू राहिल. दरम्यान, या वर्षाच्या 31 डिसेंबरला संपणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) मोफत रेशन योजनेला मात्र मुदतवाढ न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

महत्वाच्या इतर बातम्या :

Kolhapur News : करवीर तहसील कार्यालय दोन दिवस बंद राहणार; 1 फेब्रुवारीपासून 'या' ठिकाणी कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरु होणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
Israel vs Iran War: दुबई प्रशासनाचा दिलदारपणा, कोल्हापूरच्या पर्यटकांना प्रत्येकी 26 हजारांचं गिफ्ट, झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त!
दुबई प्रशासनाचा दिलदारपणा, कोल्हापूरच्या पर्यटकांना प्रत्येकी 26 हजारांचं गिफ्ट, झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त!
Krishnaraaj Mahadik BJP Yuva Morcha: भाजपने मुलाच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली, धनंजय महाडिक म्हणाले, 'कृष्णराज हा उगवता सूर्य आहे, त्याला कोणी झाकू शकत नाही'
'कृष्णराज उगवता सूर्य, त्याला कोणी झाकू शकत नाही', लेकाच्या निवडीवर धनंजय महाडिकांची प्रतिक्रिया
Ashwini Bidre : अश्विनी बिद्रे हत्याकांड, आरोपीला जन्मठेप होऊन वर्ष उलटलं, तरीही बिद्रे कुटुंबाला मृत्यू प्रमाणपत्र नाहीच; पतीची इच्छामरणाची मागणी
अश्विनी बिद्रे हत्याकांड, आरोपीला जन्मठेप होऊन वर्ष उलटलं, तरीही बिद्रे कुटुंबाला मृत्यू प्रमाणपत्र नाहीच; पतीची इच्छामरणाची मागणी

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget