एक्स्प्लोर

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन दुकानं तीन दिवस बंद; आठ महिन्यांपासून कमिशन नसल्यानं दुकानदार हवालदिल 

Maharashtra Kolhapur News: केंद्र सरकारकडून वितरित करण्यात येत असलेल्या मोफत धान्याचे कमिशन मिळावे, तसेच ते कोण देणार, याकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) 1500 रेशन दुकाने तीन दिवस बंद ठेवली जाणार आहेत.

Kolhapur News: केंद्र सरकारकडून वितरित करण्यात येत असलेल्या मोफत धान्याचे कमिशन मिळावे, तसेच ते कोण देणार, याकडे लक्ष वेधण्यासाठी 7 ते 9 फेब्रुवारीदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) 1500 रेशन दुकाने तीन दिवस बंद ठेवली जाणार आहेत. राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानारक महासंघाचे सचिव चंद्रकांत यादव यांनी याबाबत माहिती दिली आहे. चंद्रकांत यादव म्हणाले की, ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षेअंतर्गत प्रति व्यक्ती 5 किलो धान्य आणि अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिकार्ड 35 किलो धान्य देण्याची योजना वर्षभर सुरू राहणार आहे. वाटप झालेल्या धान्यावर कमिशन किती दिलं जाईल, याची माहिती दिलेली नाही. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. वितरकांना त्यांचे कमिशन मिळाले पाहिजे. यासाठी 7 ते 9 फेब्रुवारीदरम्यान देशव्यापी रेशन दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. 

या योजनेबाबत कोणत्याही स्पष्ट सूचना नाहीत. आठ महिन्यांमध्ये कमिशन मिळालेले नाही. यामुळे रेशन दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच हा डाव रेशन व्यवस्था खुली करण्याचा दिसत आहे. दिल्लीत 22 मार्चला संसदेवर महामोर्चा काढला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

धान्य वर्षभर मोफत देण्यात येणार

कोल्हापूर जिल्ह्यात अंत्योदय (Antyodaya Anna Yojana- AAY) आणि प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत दरमहा मिळणारे धान्य वर्षभर मोफत देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाची कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून अंमलबजावणी होईल. अंत्योदय योजनेसाठी 1 हजार 36.18 टन तांदूळ, 777.13 टन गहू, प्राधान्य गटासाठी 6 हजार 393.84 टन तांदूळ आणि 4 हजार 262.56 टन गहू दर महिन्याला वितरित केला जाणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पुढच्या एका वर्षासाठी मोफत रेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा देशभरातील 81 कोटीहून अधिक नागरिकांना होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत नागरिकांना दर महिन्याला दोन ते तीन रुपयामध्ये 5 किलो अन्नधान्य दिले जातात. अंत्योदय अन्न योजनेच्या अंतर्गत (Antyodaya Anna Yojana- AAY) येणाऱ्या कुटुंबाना दर महिन्याला 35 किलोग्रॅम अन्नधान्य देण्यात येतात.  

केंद्र सरकारने 31 डिसेंबर रोजी संपणाऱ्या राष्ट्रीय अन्न सुरक्षांतर्गत मोफत रेशनच्या योजनेला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पुढच्या डिसेंबरपर्यंत ही मोफत अन्नधान्याची योजना सुरू राहिल. दरम्यान, या वर्षाच्या 31 डिसेंबरला संपणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) मोफत रेशन योजनेला मात्र मुदतवाढ न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

महत्वाच्या इतर बातम्या :

Kolhapur News : करवीर तहसील कार्यालय दोन दिवस बंद राहणार; 1 फेब्रुवारीपासून 'या' ठिकाणी कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरु होणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बुडून तिघांचा मृत्यू , मृतदेह बाहेर काढण्यात यश 
कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बुडून तिघांचा मृत्यू , मृतदेह बाहेर काढण्यात यश 
'पोलिसांच्या आडून कारवाई केल्यास जशास तसं प्रत्युत्तर, काठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, पण शक्तिपीठ होऊ देणार नाही' सतेज पाटील अन् राजू शेट्टींनी सर्वपक्षीय मेळाव्यात रणशिंग फुंकलं, 9 जूनला महामोर्चा
'पोलिसांच्या आडून कारवाई केल्यास जशास तसं प्रत्युत्तर, काठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, पण शक्तिपीठ होऊ देणार नाही' सतेज पाटील अन् राजू शेट्टींनी सर्वपक्षीय मेळाव्यात रणशिंग फुंकलं, 9 जूनला महामोर्चा
Kolhapur News : डॉक्टरकडे निघाले; डोळ्यात कचरा गेला अन् क्षणार्धात दुचाकी थेट विहिरीत कोसळली; बायकोचा बुडून मृत्यू तर पती बचावला, दीड वर्षांच्या चिमुकलीचं आईचं छत्र हरपलं
डॉक्टरकडे निघाले; डोळ्यात कचरा गेला अन् क्षणार्धात दुचाकी थेट विहिरीत कोसळली; बायकोचा बुडून मृत्यू तर पती बचावला, दीड वर्षांच्या चिमुकलीचं आईचं छत्र हरपलं

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
Aditi Tatkare : रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’,मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ :आदिती तटकरे
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
Embed widget