एक्स्प्लोर

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन दुकानं तीन दिवस बंद; आठ महिन्यांपासून कमिशन नसल्यानं दुकानदार हवालदिल 

Maharashtra Kolhapur News: केंद्र सरकारकडून वितरित करण्यात येत असलेल्या मोफत धान्याचे कमिशन मिळावे, तसेच ते कोण देणार, याकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) 1500 रेशन दुकाने तीन दिवस बंद ठेवली जाणार आहेत.

Kolhapur News: केंद्र सरकारकडून वितरित करण्यात येत असलेल्या मोफत धान्याचे कमिशन मिळावे, तसेच ते कोण देणार, याकडे लक्ष वेधण्यासाठी 7 ते 9 फेब्रुवारीदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) 1500 रेशन दुकाने तीन दिवस बंद ठेवली जाणार आहेत. राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानारक महासंघाचे सचिव चंद्रकांत यादव यांनी याबाबत माहिती दिली आहे. चंद्रकांत यादव म्हणाले की, ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षेअंतर्गत प्रति व्यक्ती 5 किलो धान्य आणि अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिकार्ड 35 किलो धान्य देण्याची योजना वर्षभर सुरू राहणार आहे. वाटप झालेल्या धान्यावर कमिशन किती दिलं जाईल, याची माहिती दिलेली नाही. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. वितरकांना त्यांचे कमिशन मिळाले पाहिजे. यासाठी 7 ते 9 फेब्रुवारीदरम्यान देशव्यापी रेशन दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. 

या योजनेबाबत कोणत्याही स्पष्ट सूचना नाहीत. आठ महिन्यांमध्ये कमिशन मिळालेले नाही. यामुळे रेशन दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच हा डाव रेशन व्यवस्था खुली करण्याचा दिसत आहे. दिल्लीत 22 मार्चला संसदेवर महामोर्चा काढला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

धान्य वर्षभर मोफत देण्यात येणार

कोल्हापूर जिल्ह्यात अंत्योदय (Antyodaya Anna Yojana- AAY) आणि प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत दरमहा मिळणारे धान्य वर्षभर मोफत देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाची कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून अंमलबजावणी होईल. अंत्योदय योजनेसाठी 1 हजार 36.18 टन तांदूळ, 777.13 टन गहू, प्राधान्य गटासाठी 6 हजार 393.84 टन तांदूळ आणि 4 हजार 262.56 टन गहू दर महिन्याला वितरित केला जाणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पुढच्या एका वर्षासाठी मोफत रेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा देशभरातील 81 कोटीहून अधिक नागरिकांना होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत नागरिकांना दर महिन्याला दोन ते तीन रुपयामध्ये 5 किलो अन्नधान्य दिले जातात. अंत्योदय अन्न योजनेच्या अंतर्गत (Antyodaya Anna Yojana- AAY) येणाऱ्या कुटुंबाना दर महिन्याला 35 किलोग्रॅम अन्नधान्य देण्यात येतात.  

केंद्र सरकारने 31 डिसेंबर रोजी संपणाऱ्या राष्ट्रीय अन्न सुरक्षांतर्गत मोफत रेशनच्या योजनेला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पुढच्या डिसेंबरपर्यंत ही मोफत अन्नधान्याची योजना सुरू राहिल. दरम्यान, या वर्षाच्या 31 डिसेंबरला संपणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) मोफत रेशन योजनेला मात्र मुदतवाढ न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

महत्वाच्या इतर बातम्या :

Kolhapur News : करवीर तहसील कार्यालय दोन दिवस बंद राहणार; 1 फेब्रुवारीपासून 'या' ठिकाणी कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरु होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
Bhiwandi : आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 18 February 2024Santosh Deshmukh Case | 'अनैतिक' कट, संतोष देशमुख प्रकरणावरून वर्दीवर आरोप Special ReportDevendra Fadnavis on MLA's Security | आमदारांची सुरक्षा घटली, कुणाकुणाची सटकली? Special ReportSambhajiRaje Wikipedia | छत्रपती संभाजीराजेंवरील विकीपीडियावरचा मजकूर कुणी बदलला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
Bhiwandi : आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
HSC Exam : वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.