एक्स्प्लोर

OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश

या नवीन निर्णयामुळे राज्यातील 15 जिल्ह्यांत ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार असून, ही पदे आता खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आली आहेत.

OBC Reservation Sarpanch: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण आरक्षण 50 टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने 15 जिल्ह्यांतील इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) सरपंचपदांच्या आरक्षणाबाबत सुधारित आदेश जारी केले आहेत. या नवीन निर्णयामुळे राज्यातील 15 जिल्ह्यांत ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार असून, ही पदे आता खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आली आहेत.

आरक्षणाची पार्श्वभूमी आणि बदल

राज्य निवडणूक आयोगाने 13 जून 2025 रोजी आरक्षण निश्चितीची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. या अधिसूचनेनुसार 15 जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी एकूण 6 हजार 719 सरपंचपदे आरक्षित ठेवण्यात आली होती. मात्र, 50 टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेचे पालन करण्याच्या आयोगाच्या निर्देशानंतर ग्रामविकास विभागाने 30 एप्रिल रोजी नवीन सुधारित आदेश जारी केले. या आदेशानुसार, ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित पदांची संख्या आता 6 हजार 207 इतकी निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच पूर्वी जाहीर केलेल्या पदांमधून ५१२ पदे कमी करण्यात आली आहेत. ओबीसी आरक्षणातील ही 512 पदे कमी झाल्याने त्याचा थेट लाभ खुल्या प्रवर्गाला मिळाला आहे. खुल्या प्रवर्गासाठी पूर्वी 13 हजार 77 पदे निश्चित करण्यात आली होती, ती संख्या आता 512 ने वाढून 13 हजार 589 इतकी झाली आहे. 50 टक्क्यांच्या मर्यादेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी 15 जिल्ह्यांत हे सुधारित समीकरण लागू करण्यात आले आहे.

प्रवर्ग पूर्वी निश्चित केलेली पदे 30 एप्रिलच्या आदेशानुसार पदे बदल
ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) 6,719 6,207 512 पदे कमी
खुला प्रवर्ग 13,077 13,589 512 पदे वाढ

अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा

दुसरीकडे, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा अशा राज्यातील सर्व भागांमध्ये मराठ्यांवर आणि कुणबींवर अन्याय होत असल्यास एकजुटीने आणि आक्रमकपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या आंदोलनाची तयारी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, खानदेश, विदर्भ, मराठवाडा जिथे जिथे मराठ्यांवर, कुणबीवर अन्याय होईल, त्यांनी एक जीवाने आणि आक्रमकपणे उठायचे आणि 29 ऑगस्टच्या अंतरवालीच्या आंदोलनाची तयारी करायची, ही विनंती आहे. कुणाच्या दबावाला बळी पडू नका. घाबरू नका. शांत बसू नका, आक्रमक व्हा," असे त्यांनी म्हटले.

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik and Krishnaraj Mahadik: आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
Omraje Nimbalkar: मराठवाड्यात महाभयंकर दुष्काळाची दाहकता, सगळीकडे भयाण परिस्थिती; भरीव मदत केली तरच शेतकरी वाचेल, अन्यथा...; खासदार ओमराजेंचं सरकारला साकडं!
मराठवाड्यात महाभयंकर दुष्काळाची दाहकता, सगळीकडे भयाण परिस्थिती; भरीव मदत केली तरच शेतकरी वाचेल, अन्यथा...; खासदार ओमराजेंचं सरकारला साकडं!
बेईमान भावांनी लाडक्या बहिणींना फसवलं, नाना पटोलेंचा मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंना जोरदार टोला, म्हणाले, उद्योगपतींना साडेतीन लाखांची कर्जमाफी, सरकारनं जाहीरात दिली का?
बेईमान भावांनी लाडक्या बहिणींना फसवलं, नाना पटोलेंचा मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंना जोरदार टोला, म्हणाले, उद्योगपतींना साडेतीन लाखांची कर्जमाफी, सरकारनं जाहीरात दिली का?
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
Advertisement

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ketan agrawal case : केतन अग्रवालला संपवण्यात सिया चेतनसोबत तिसऱ्याचाही हात? बीडच्या मित्राकडे तपास सुरू, मोठी माहिती समोर येण्याची शक्यता
केतन अग्रवालला संपवण्यात सिया चेतनसोबत तिसऱ्याचाही हात? बीडच्या मित्राकडे तपास सुरू, मोठी माहिती समोर येण्याची शक्यता
Dahihandi 2026 : दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू, तर 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू; 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
Dhananjay Mahadik and Krishnaraj Mahadik: आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: आधी एकाच चितेवर तिघांना अग्नी, आता अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या लेकीनेही ICU मध्ये प्राण सोडला, नळदुर्ग प्रकरणात महत्त्वाची अपडेट
आधी एकाच चितेवर तिघांना अग्नी, आता अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या लेकीनेही ICU मध्ये प्राण सोडला, नळदुर्ग प्रकरणात महत्त्वाची अपडेट
Embed widget