एक्स्प्लोर

Direct Pipeline : दिवाळीची पहिली अंघोळ थेट पाईपलाईनच्या पाण्याने होणार; पालकमंत्री हसन मुश्रीफांनी सांगितला लोकार्पणाचा मुहूर्त

थेट पाईपलाईन योजनेतील 98 टक्के काम पूर्ण झाले आहे. याच थेट पाईपलाईन योजनेचे लोकार्पण दसरा ते दिवाळी दरम्यान केलं जाणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज कोल्हापुरात दिली.

कोल्हापूर : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोल्हापूर (Kolhapur News) शहराला काळम्मावाडी धरणातून मुबलक आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित थेट पाईपलाईन (Direct Pipeline) योजना पूर्णत्वास जात आहे. या योजनेतील 98 टक्के काम पूर्ण झाले आहे. याच थेट पाईपलाईन योजनेचे लोकार्पण दसरा ते दिवाळी दरम्यान केलं जाणार असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज कोल्हापुरात दिली. योजनेच्या लोकार्पणसाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बोलवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यंदाच्या दिवाळीत त्याच पाण्याने शहरवासीयांना अभ्यंगस्नान करण्याची संधी देणार असल्याचे ते म्हणाले. अमृत योजनेतील रखडलेली कामेही मार्चअखेर पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्याची सूचनाही मनपा प्रशासनाला केली. 

पालकमंत्री असताना पाणी कोल्हापूरकरांना मिळतंय हे भाग्य समजतो

पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर शहराशी निगडीत 21 विषयांचा आढावा घेतला. यावेळी प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले की, पंचगंगा नदीचे प्रदूषित पाणी प्यायला लागत आहे. त्यामुळे काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन राबवली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी योजनेला मान्यता दिली होती. आज घडीला ही योजना अंतिम टप्प्यात आहे. विजयदशमीदिवशी हे पाणी पुईखडीच्या ठिकाणी येईल. 48 किमी लांबीच्या पाईपची चाचणी झाली आहे. एकूण 97 टक्के काम झाले आहे. या योजनेतून दसऱ्याला पुईखडीच्या टाकीत पाणी पडेल. त्यानंतर लगेच लोकार्पण केले जाईल. मी पालकमंत्री असताना हे पाणी कोल्हापूरकरांना मिळतंय हे माझं भाग्य समजतो. 

ज्या कामांसाठी स्थानिक निधी आवश्यकता असेल तो जिल्हा नियोजनमधून दिला जाईल. त्याव्यतिरिक्त अन्य विषयांसाठी केंद्र, राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. थेट पाईपलाईनसाठी ‘तारीख पे तारीख’ नक्कीच होणार नाही. शंभर टक्के दिवाळीला पाणी मिळेल. लोकार्पणासाठी प्रोटोकॉलनुसार सर्व आमदारांना बोलवावेच लागेल, असे सांगत पालकमंत्री मुश्रीफ यांनी आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या या योजनेचे श्रेय कोणाचे यापेक्षा जनतेला पाणी मिळणे महत्त्वाचे आहे, असे सांगून श्रेयवादावर बोलण्याचे टाळले. 

कोल्हापूर शहरात 100 इलेक्ट्रिक गाड्या आणाव्या लागतील

ते पुढे म्हणाले की, घनकचऱ्यासाठी सरकारकडून जो निधी लागेल तो दिला जाईल. तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी जो निधी मंजूर आहे तो निधी लवकरच दिला जाणार आहे.  कोल्हापूर शहरात 100 इलेक्ट्रिक  गाड्या आणाव्या लागतील, त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. इलेक्ट्रिक गाड्या आल्याशिवाय केएमटी तोट्याच जायचं थांबणार नाही. परिख पूल दुरुस्तीसाठी 3 कोटी 88 लाख दिले जाणार आहेत. नवरात्रोत्सवापूर्वी सर्व रस्ते चकाचक केले जातील. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
Embed widget