एक्स्प्लोर

Deepak Kesarkar : शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यावर राजकारण असतं, आम्ही जे काम करतो ते बांधावर जाऊन सुटत नाही; दीपक केसरकरांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

बाळासाहेब ठाकरे यांचा विचार होता 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण. मात्र, काही जणांकडून शंभर टक्के राजकारण केलं जात आहे, अशी टीका दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (8 सप्टेंबर) अहमदनगरमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करताना त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सांगितल्या. यानंतर आता शिंदे गटाकडून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. बांधावर जाण्यवर देखील राजकारण असतं, अशी टीका शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते. 

काही जणांकडून शंभर टक्के राजकारण 

ते म्हणाले की, आम्ही जे काम करतो ते बांधावर जाऊन सुटत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार होता 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण. मात्र, काही जणांकडून शंभर टक्के राजकारण केलं जात आहे. बांधावर पाणी गेलं पाहिजे यासाठी आम्ही काम करतो यालाच शिंदे फडणवीस आणि पवार यांचं सरकार म्हणतात. राजकारण कोणीही करू दे आम्ही कटिबद्ध आहोत. नियोजन हे नियोजन असतं ते करावं लागतं आणि यासाठी शिंदे साहेबांनी रात्रंदिवस मीटिंग घेतल्या आहेत. केवळ आपण काय तरी दाखवायचं आणि मीडियासमोर जायचं असं मर्यादित काम असू नये यासाठी शिंदे फडणवीस आणि अजितदादा काम करत आहेत. 

तर फडणवीस यांना धारेवर धरणे याला राजकारण म्हणतात...

केसरकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची मराठा आरक्षणावरून पाठराखण केली. ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण हायकोर्टात टिकवून दाखवलं, त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. एखाद्या पोलिसांकडून चूक झाली तर फडणवीस यांना धारेवर धरणे याला राजकारण म्हणतात. भाजपच्या आढावा बैठकीवर त्यांनी भाष्य केले. त्यांनी सांगितले की, तुमच्या बैठका झाल्या नाहीत का? इंडिया बैठक तर पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली. मात्र त्यावर आम्ही टीका केली नाही. दुष्काळ आला तरी इलेक्शन घ्यावंच लागेल. मात्र, याचा परिणाम आपल्या कामावर होता कामा नये. ज्यांना राजकारण करायचं आहे ते बातम्या देतात. काम करणाऱ्या माणसांवर टीका केली तरी त्याचे उत्तर कामाने दिले पाहिजे. 

"हा एक कटाचा प्रकार"

मराठा समाजासारखा मॅच्यूअर समाज भारतात कोणताही नाही. आंदोलकांना काहीही होऊ नये यासाठी त्यांना दवाखान्यात दखल करण्याची बाब होती. दुपारी अॅडमिट करण्यासाठी पोलीस आंदोलन स्थळे गेले तेव्हा तेथे कोणीतरी दगडफेक केली. हा कट रचल्याचा प्रकार आहे. लाखाचे मोर्चे निघाले तेव्हा दगडफेक झाले नाही. मग आता कशी होईल याचा विचार जनतेने करावा. मराठा समाजावर लाठीमार झाल्याने पोलिसांवर देखील कारवाई करण्यात आली. मात्र, तिथे देखील काही जणांकडून राजकारण करण्यात आले. आम्हाला जरंडे पाटील यांच्या तब्बेतीची काळजी आहे. जे गुन्हे दाखल झालेले असतात ते मागे देखील घेण्यात येतात. त्यासाठी एक कमिटी असते. मी जेव्हा गृह खात्याचा राज्यमंत्री होतो तेव्हा 90 टक्के खटले मागे घेण्यात आले.

इतर महत्वाच्या बातम्या : 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
Uday Samant: शिवसेना 2029 च्या निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी करत आहात का? उदय सामंत काय म्हणाले?
शिवसेना 2029 च्या निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी करत आहात का? उदय सामंत काय म्हणाले?
Kolhapur Bailgada Sharyat: कोल्हापूरात बैलगाडा शर्यतीवेळी थरारक घटना, मोटारसायकल आडवी आली, बैलांनी अंगावर उडी मारली
कोल्हापूरात बैलगाडा शर्यतीवेळी थरारक घटना, मोटारसायकल आडवी आली, बैलांनी अंगावर उडी मारली
गोकुळच्या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाऊ, मंत्री प्रकाश आबिटकरांचं वक्तव्य, अदृश्य शक्तीबद्दल बोलणाऱ्यांचं माहित
गोकुळच्या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाऊ, मंत्री प्रकाश आबिटकरांचं वक्तव्य, अदृश्य शक्तीबद्दल बोलणाऱ्यांचं माहित

व्हिडीओ

Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahuri By Election : राहुरीत प्राजक्त तनपुरे कोणाकडून लढणार, शरद पवारांची राष्ट्रवादी की अपक्ष, मविआत सगळेच इच्छुक
राहुरी पोटनिवडणुकीसाठी मविआकडून कोण लढणार, ठाकरेंच्या शिवसेनेत आणि काँग्रेसमध्येही इच्छुक, प्राजक्त तनपुरेंचा सस्पेन्स कायम
Donald Trump : होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास 48 तासांचा अल्टीमेटम, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी म्हणाले...
होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास 48 तासांचा अल्टीमेटम, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी म्हणाले...
BJP: चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर   
चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर
राष्ट्रीय पक्ष माझ्या संपर्कात, लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार; सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार
राष्ट्रीय पक्ष माझ्या संपर्कात, लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार; सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
मी पतीव्रता म्हणणारी मोठं कुंकू लावते, माजी आमदाराची जीभ घसरली; महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, बॅनरला जोडे
मी पतीव्रता म्हणणारी मोठं कुंकू लावते, माजी आमदाराची जीभ घसरली; महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, बॅनरला जोडे
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
Abhijeet Bichukale : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
Embed widget