एक्स्प्लोर

ढगफुटी म्हणजे काय? भारतात ढगफुटीच्या घटना का वाढतायत?- वाचा सविस्तर

 गेल्या काही दिवसांपासून भारतात वेगवगेळ्या ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडतायेत. ही ढगफुटी म्हणजे नेमकं काय ? हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.

 गेल्या काही दिवसांपासून भारतात वेगवगेळ्या ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडतायेत. ही ढगफुटी म्हणजे नेमकं काय ? हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया. मान्सून महिन्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी धोकादायक घटना घडतात. पूर, भूस्खलन, दरड कोसळणे आणि ढगफुटी यासारख्या घटनांचा यामध्ये समावेश आहे.

अलीकडेच जम्मूमध्ये ढगफुटीची घटना घडली. सोबत हिमाचल प्रदेश आणि लडाखमध्येही ढगफुटी झाली. अनेक लोकांचा बळीही गेला. क्लाऊडबर्स्ट अर्थात ढगफुटीच्या या घटनांमध्ये अशी वाढ होणे हा एकच चिंतेचा विषय बनला. याबाबत तज्ज्ञांना विचारलं असता, त्याचं म्हणण्यानुसार, अशा आपत्तीचा अंदाज लावणे कठीण असतं कारण ही घटना बहुतेक स्थानिक पातळीवर घडते, बहुधा डोंगराळ भागात घडत असते.

ढगफुटी म्हणजे प्रत्यक्षात अचानकपणे जोरदार मुसळधार पाऊस पडतो. यावेळी दिसताना असं दिसतं की पाऊस पडत नाही पण आकाशातून एखादी टाकी फुटली आहे की काय असं वाटतं आणि म्हणूनच त्याला ढग फुटणे किंवा ढगफुटी असं म्हणतात. तांत्रिकदृष्ट्या सांगायचं तर एखाद्या भागात तासाभरात १० सेमीपेक्षा जास्त पाऊस पडला तर ढगफुटी मानली जाते.

यामुळे काय नुकसान होतं?

ढगफुटीच्या वेळी मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे केवळ मानवांनाच हानी पोहचते असं नव्हे, तर मालमत्तेचंही मोठं नुकसान होतं. डोंगराळ भागात या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याने भूस्खलनाच्या घटनांची शक्यता वाढते. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणतात की, ढगफुटी ही अत्यंत लहान-मोठी घटना आहे आणि मुख्यतः हिमालय किंवा पश्चिम घाटाच्या पर्वतीय भागांमध्ये ही आढळून येते.

ढग फुटतात तरी कसे?

जेव्हा उबदार मान्सून वारे थंड वाऱ्यांशी संवाद साधतात तेव्हा हे वारे खूप मोठे ढग तयार करतात.हे लँडफॉर्म आणि पर्वतीय घटकांमुळेसुद्धा असं होऊ शकतं. स्कायमेट वेदर येथील हवामानशास्त्र आणि हवामान बदलाचे उपाध्यक्ष महेश पलावत म्हणतात की कम्युलोनिम्बस म्हणजेच वादळी ढग नावाचे ढग 13-14 किलोमीटरपर्यंत उंची गाठू शकतात.


ढगफुटीचा अंदाज का कठीण ?

कारण ज्या ठिकाणी वारा वाहू शकत नाही अशा क्षेत्रावर हे ढग अडकले, तर ते जोरदार पाऊस पडतात. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वेबसाइटनुसार ढग फुटण्याच्या अशा घटनांचा अंदाज वर्तविणे फार कठीण आहे. कारण ठिकाण आणि वेळेच्या दृष्टीने ही खूप छोटी घटना आहे.

अंदाज करणे अशक्यही नाही

काही तास अगोदर क्लाउडबर्स्ट इव्हेंटचं निरीक्षण आणि अंदाज करण्यासाठी अशा भागात खूप दाट रडार नेटवर्क आवश्यक आहे. यासाठी खूप उच्च रिझोल्यूशन हवामान अंदाज मॉडेल आवश्यक आहे. विशेष म्हणजे, मैदानी भागातही ढगफुटी होते, पण ते अपवाद आहेत. या महिन्यात जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशही घटना घडल्या आहेत. कोकणातही ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत पण याची कारणं वेगळी आहेत. हे सर्व डोंगराळ भाग आहेत.

यासाठी रडारची गरज आहे

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम राजीवन म्हणतात की या घटनांचा अंदाज तीन तास अगोदर दिला जाऊ शकतो. रडार सर्वत्र बसवता येत नाही, मग देशात रडारची संख्या खूप कमी आहे आणि ती वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या संपूर्ण हिमालयात फक्त सात रडार आहेत.

भारतात ढगफुटी प्रमाण का वाढतंय?

याबाबत हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी एबीपी माझाला माहिती दिली की, जम्मू-काश्मीरमध्ये जो काही बर्फ पडतो किंवा पाऊस पडतो तो पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पडत असतो. त्यामुळे पावसाळ्यात नैऋत्य आणि पश्चिमवाऱ्यांचा संयोग होऊन या घटना घडतात. प्रभुणे यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या प्रोजेक्ट मेघदूतच्या माध्यमातून त्यांनी हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंडमध्ये त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला होता त्यावेळी स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या १० ते १२ वर्षांत अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.
 
पूर्वी मान्सूनचा पाऊस या भागात कमी व्हायचा, परंतू गेल्या काही वर्षात मान्सूनचा पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय. त्यामुळे या भागातलं चक्र बदललं आहे आणि मान्सूनचे वारे अगदी आतपर्यंत पोहोचू लागले आहेत. त्यामुळे इथे ढगफुटी होण्याचं प्रमाण वाढीस लागल्याचं प्रभुणे सांगतात आणि याचा परिणाम हा तिथल्या लोकांच्या शेतीच्या पीक नियोजनावर झाल्याचंही प्रभुणेंच्या निरीक्षणातून समोर आलं आहे.
 
पण या सगळ्यानंतर असा प्रश्न उपस्थित होत आहे की अचानक देशात ढगफुटीच्या घटनांमध्ये वाढ का होताना दिसते? यासाठी अनेक घटक जबाबदार आहेत. परंतु अशा घटना वर्षभर आणि एका हंगामातही दीर्घकाळ दिसत नाहीत. पावसाळ्यामध्येच त्यांची घटना होण्याची शक्यता आधीच जास्त आहे. अशा अनेक घटना शोधून काढल्या जातात, ज्या केवळ एका ठिकाणी मुसळधार पाऊस म्हणून नोंदवल्या जातात. परंतु त्यांच्या वाढीचे एक कारण मान्सूनची असामान्यता आणि अनियमितता देखील असू शकते.
दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार

व्हिडीओ

Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Embed widget