एक्स्प्लोर

Controversial Statement on Rahul Gandhi : आसामच्या मुख्यमंत्र्यांचे राहुल गांधीबाबत वादग्रस्त वक्तव्य, काँग्रेस आक्रमक

Controversial Statement on Rahul Gandhi : आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी उत्तराखंडमध्ये प्रचार करताना काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

Controversial Statement on Rahul Gandhi : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या निवडणुकीचा प्रचार करत असताना अनेक नेते मंडळी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी  नुकतेच उत्तराखंडमध्ये प्रचार करताना काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. "भारताकडून पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा राहुल गांधी पुरावा मागत होते. परंतु, आम्ही कधी ते कोणत्या वडिलांचे पुत्र आहेत? याचा पुरावा मागितला आहे का? असे वादग्रस्त वक्तव्य करत, सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईक केल्याचे सांगितल्यानंतर पुरावा मागण्याचा अधिकार राहुल गांधी यांना कोणी दिला? असा प्रश्न हिमंत सरमा यांनी उपस्थित केला. 

उत्तराखंड येथे एका सभेला संबोधित करताना हिमंत सरमा यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, देशाचे पहिले लष्कर प्रमुख बिपीन रावत हे उत्तराखंड आणि देशाचा गौरव होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने पाकिस्तामध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. परंतु, राहुल गांधी यांनी त्याचे पुरावे मागितले. तुम्ही कोणत्या वडिलांचे पुत्र आहात याचा आम्ही कधी पुरावा मागितला का?"

"भारतीय सैन्याला पुरावा मागण्याचा अधिकार यांना कोणी दिला? राहुल गांधी यांना भारतीय लष्कर, बिपीन रावत आणि उत्तराखंडच्या सुपुत्रावर विश्नास नाही का? त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला आहे, असे सांगितल्यानंतर तुम्हाला पुरावा कशासाठी पाहिजे? असा प्रश्न हिमंत सरमा यांनी यावेळी उपस्थित केला. 

"तुम्ही खरोखर राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही? याचा पुरावा मी तुम्हाला कधी मागितला आहे? सैनिकांचा अपमान करू नका. देश ही खूप महत्वाची गोष्ट आहे. लोक देशासाठी जगतात आणि मरतात," अशी टीका हिमंत सरमा यांनी केली. 

काँग्रेसकडून पलटवार 
दरम्यान, हिमंत सरमा यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेसनेही पलवटार केला आहे. "समोर दिसत असलेला पराभव पाहून आसामच्या मुख्यमंत्र्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांनी राजकीय दिवाळखोरीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निष्ठा मिळवण्यासाठी जुन्या पक्षावर टीका करणे आवश्यक आहे. हेमंत सरमा यांच्या क्षुद्रपणाचा आणि कुजक्या विचारसरणीचा हा पुरावा आहे, असे ट्विट काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajiraje On Waghya Dog | वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नाही, संभाजीराजेंचा दावाABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
Embed widget