एक्स्प्लोर

Cabinet Approves 7 Railway Project : रेल्वेच्या 32 हजार कोटींच्या सात प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, महाराष्ट्राला काय मिळाले?

या प्रकल्पामुळे सध्याची मार्ग क्षमता वाढवणे, रेल्वे गाड्यांचे कार्यान्वयन सुरळीत करणे, गर्दी कमी करणे आणि प्रवास तसेच वाहतूक सुलभ करण्यासाठी या प्रकल्पाची मोठी मदत होणार आहे.

नवी दिल्ली : आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळाने विविध योजनांना आज मंजुरी दिली. यामध्ये भारतीय रेल्वेच्या 32 हजार 500 कोटींच्या सात प्रकल्पांना ही मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठीचा 100 टक्के खर्च हा केंद्र सरकार करणार आहे. या प्रकल्पात महाराष्ट्रातील 50 किमीच्या अंतराचा समावेश आहे. 

रेल्वेच्या या प्रकल्पामुळे प्रवाशांना फायदा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे सध्याची मार्ग क्षमता वाढवणे, रेल्वे गाड्यांचे कार्यान्वयन सुरळीत करणे, गर्दी कमी करणे आणि प्रवास तसेच वाहतूक सुलभ करण्यासाठी या प्रकल्पाची मोठी मदत होणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, ओदिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या 9 राज्यांमधील 35 जिल्ह्यांचा या प्रकल्पामध्ये समावेश आहे. यामुळे रेल्वेचे जाळे 2339 किलोमीटरने वाढणार आहे. राज्यांतील लोकांना यामुळे 7.06 कोटी मनुष्यदिवसांचा रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. 

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या प्रकल्पामध्ये राज्यातील मुदखेड-मेडचल-मेहबुबनगर-ढोण या मार्गाचा समावेश आहे. या मार्गाचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे. यात राज्यातील 50 किमीचे अंतर आहे. 

 

प्रकल्पाचे नाव

प्रकल्प अंतर्गत होणाऱ्या कामाचे स्वरुप

1

गोरखपूर-कॅन्ट-वाल्मिकी नगर

मार्गिकेचे दुहेरीकरण

2

सोन नगर-आंदल मल्टी ट्रॅकिंग प्रकल्प

मल्टी ट्रॅकिंग

3

नेरगुंडी-बरंग आणि खुर्दा रोड-विजियानगरम

तिसरी मार्गिका 

4

मुदखेड-मेडचाळ आणि महबूबनगर-ढोणे

विद्यमान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण

5

गुंटूर-बिबीनगर

विद्यमान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण

6

चोपण-चुनार

विद्यमान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण

7

समखियाली-गांधीधाम

 

 

अन्नधान्य, खते, कोळसा, सिमेंट, राख, लोखंड आणि तयार पोलाद, क्लिंकर, कच्चे तेल, चुनखडी, खाद्यतेल इत्यादी विविध मालाच्या वाहतुकीसाठी हे आवश्यक मार्ग आहेत. क्षमतावाढीच्या कामांमुळे 200 एमटीपीए (दशलक्ष टन प्रतिवर्ष) क्षमतेची अतिरिक्त मालवाहतूक होईल. रेल्वे हे पर्यावरणस्नेही आणि ऊर्जा कार्यक्षम वाहतुकीचे साधन असल्याने हवामाना संबंधित उद्दिष्टे साध्य करणे आणि देशाच्या मालवाहतूक खर्चात कपात करणे या दोन्हींसाठी मदत होईल, असे सरकारने म्हटले आहे. 

पंतप्रधान ई-बस योजनेला मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम ई-बस सेवा योजनेला मंजुरी देण्यात आली. ही योजना 57,613 कोटी रुपयांची आहे. या 57,613 कोटी रुपयांपैकी 20,000 कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहेत. उर्वरित निधी राज्य सरकारे देणार आहेत. या योजनेमुळे बस ऑपरेटर्सना 10 वर्षांसाठी मदत केली जाईल. 

या बस पीपीपी मॉडेल अंतर्गत खरेदी केल्या जातील. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही योजना 2037 पर्यंत चालणार आहे. अशा परिस्थितीत खासगी कंपन्यांना एक संधी असणार असल्याची माहिती मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.  ज्या शहरांमध्ये सार्वजनिक बस वाहतूक नाही, अशा शहरांमध्ये ही योजना प्राधान्याने सुरू करण्यात येणार असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. या योजनेमुळे 45 हजार ते 55 हजार जणांसाठी रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा त्यांनी केला. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi: इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय दुष्परिणाम? पंतप्रधान मोदींनी शांतपणे सगळं उलगडून सांगितलं, भारताकडे तेलाचा किती साठा शिल्लक?
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय दुष्परिणाम? पंतप्रधान मोदींनी शांतपणे सगळं उलगडून सांगितलं, भारताकडे तेलाचा किती साठा शिल्लक?
1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
LPG Gas Crisis: मोठी बातमी : राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार; व्यावसायिकांना मोठा दिलासा
राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार; व्यावसायिकांना मोठा दिलासा
PM Modi: पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम

व्हिडीओ

Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई
Neelam Gorhe सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करा, सीसीटीव्ही सादर करण्याचे निर्देश
Jaykumar Gore Satara : सातारा एसपींचे निलंबन मागे घ्या, जयकुमार गोरे आक्रमक
Eknath Shinde On Satara : सातारा ZP निवडणूक, एसपींचं निलंबन; फडणवीसांसमोर शिंदे म्हणाले....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: ट्रम्पची दंडेलशाही इराणने हाणून पाडत गुडघ्यावर आणलं; इराणी विद्युत प्रकल्पावर हल्ला करण्याचा निर्णय पुढे ढकलला
ट्रम्पची दंडेलशाही इराणने हाणून पाडत गुडघ्यावर आणलं; इराणी विद्युत प्रकल्पावर हल्ला करण्याचा निर्णय पुढे ढकलला
Share Market : सोने चांदीच्या दराप्रमाणं शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1800 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1800 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी बुडाले
कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, 30 जणांवर गुन्हा; ग्रामस्थांकडून निषेध फेरी
कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, 30 जणांवर गुन्हा; ग्रामस्थांकडून निषेध फेरी
वेळीच सावध होण्याची आमदारांची कुजबूज सुुरु! नाशिक, रायगड, पाठोपाठ साताऱ्यातही मुस्कटदाबी; मित्रपक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीविरोधात शिवसेना शिंदे गटाचा आक्रमक पवित्रा
वेळीच सावध होण्याची आमदारांची कुजबूज सुुरु! नाशिक, रायगड, पाठोपाठ साताऱ्यातही मुस्कटदाबी; मित्रपक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीविरोधात शिवसेना शिंदे गटाचा आक्रमक पवित्रा
Ashok Kharat: अशोक खरातचं भरभरुन कौतुक, युरोपच्या पोलिसांचं उदाहरण; व्हायरल व्हिडिओवर पोपटराव पवारांचं स्पष्टीकरण
अशोक खरातचं भरभरुन कौतुक, युरोपच्या पोलिसांचं उदाहरण; व्हायरल व्हिडिओवर पोपटराव पवारांचं स्पष्टीकरण
Maharashtra Weather Update: मुंबईकर उकाड्याने हैराण होणार, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं सावट; हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना हाय अलर्ट
मुंबईकर उकाड्याने हैराण होणार, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं सावट; हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना हाय अलर्ट
PM Modi: इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय दुष्परिणाम? पंतप्रधान मोदींनी शांतपणे सगळं उलगडून सांगितलं, भारताकडे तेलाचा किती साठा शिल्लक?
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय दुष्परिणाम? पंतप्रधान मोदींनी शांतपणे सगळं उलगडून सांगितलं, भारताकडे तेलाचा किती साठा शिल्लक?
Ashok kharat: अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
Embed widget