एक्स्प्लोर

मुंबईकर सुनील देवधर, त्रिपुरात डाव्यांचा गड उद्ध्वस्त करणारा भाजपचा नायक

गेली 25 वर्ष सत्तेत असलेल्या सीपीएमला फक्त 19 जागांवर समाधान मानावं लागलं. पण सुनील देवधर यांनी डाव्यांचा बालेकिल्ल्याला सुरुंग लावून, तिथे सत्तापालट करण्याचे महत्त्वाचे काम या विधानसभा निवडणुकीत केले.

नवी दिल्ली/ अगरतळा : 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्रिपुरामध्ये भाजपने जवळजवळ एकहाती सत्ता मिळवल्याचं चित्र आहे. कारण येथे भाजपने 40 जागांवर आघाडी घेतली आहे. तर गेली 25 वर्ष सत्तेत असलेल्या सीपीएमला फक्त 19 जागांवर समाधान मानावं लागलं. पण सुनील देवधर यांनी डाव्यांचा बालेकिल्ल्याला सुरुंग लावून, तिथे सत्तापालट करण्याचे महत्त्वाचे काम या विधानसभा निवडणुकीत केले. मुंबईकर सुनील देवधर, त्रिपुरात डाव्यांचा गड उद्ध्वस्त करणारा भाजपचा नायक सुनील देवधर यांनी त्रिपुरात सत्ताबदल कसा घडवून आणला? मोदी आणि अमित शाह यांनी सुनील देवधर यांना तीन वर्षापूर्वी त्रिपुरामध्ये पक्षाचे प्रभारी म्हणून नेमलं, त्यांच्या नियुक्तीवेळी त्रिपुरात पक्षाला कोणताही जनाधार नव्हता. गेल्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाच्या 50 पैकी 49 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. पण त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी तीन वर्ष त्रिपुराचा सर्व भाग पिंजून काढला. माणिक सरकार यांच्या खुर्चीला हादरवण्यासाठी ग्रामीण भागात जनसंपर्क वाढवला. त्यांनी सुरुवातीला त्रिपुरातील तरुणांना पक्षाशी जोडलं. शिवाय, वेगवेगळ्या वर्गातील नागरिकांच्या भेटी घेऊन, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुंबईकर सुनील देवधर, त्रिपुरात डाव्यांचा गड उद्ध्वस्त करणारा भाजपचा नायक 60 मतदारसंघाचा दौरा भाजपच्या विजयानंतर सुनील देवधर यांचे निकटवर्तीय कपिल शर्मा यांनी एबीपी न्यूजला सांगितलं की, “देवधर यांनी जवळपास सर्व 60 विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्यात बूथ कमिटीची बांधणी केली. या कमिट्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न निवडणुकीच्या प्रचार रॅलीमधून मांडले जाऊ लागले. त्यामुळे त्रिपुरालीत नागरिक भाजपशी जोडले जाऊ लागले.” जवळपास 30 हजार तरुणांना त्यांनी या कामात सहभागी करुन घेतल्याचं, शर्मा यांनी सांगितलं. याशिवाय, त्रिपुरातील डावे, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचे बालेकिल्ले उद्ध्वस्त करण्याचं महत्त्वाचं कामही देवधर यांनी केलं. यासाठी त्यांनी या तिन्ही पक्षातील अनेक दिग्गज नेते आणि आमदारांना भाजपात सहभागी करुन घेतले. त्याचा फायदा पक्षाला विधानसभा निवडणुकीत झाला. मुंबईकर सुनील देवधर, त्रिपुरात डाव्यांचा गड उद्ध्वस्त करणारा भाजपचा नायक कोण आहेत सुनील देवधर? सुनील देवधर यांचा जन्म पुण्यात झाला. लहानपणीपासून संघाच्या मुशीत वाढलेल्या देवधरांनी तब्बल 12 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून ईशान्य भारतात काम केलं आहे. शिवाय, बंगाली भाषेसह इतर अनेक भाषांवर त्यांचे प्रभूत्व आहे. मेघालय, त्रिपुरा, नागालँडमधील खासी आणि गारो सारख्या स्थानिक जातींमधील लोकांत त्यांच्या चांगला जनसंपर्क आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघाची जबाबदारी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदार संघाची जबाबदारी होती. यावेळी त्यांनी बूथ बांधणीच्या कामामुळे पंतप्रधान मोदींचा विक्रमी मताधिक्क्याने विजय झाला. त्याशिवाय, 2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. या निवडणुकीत त्यांच्याकडे 10 मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी होती. त्यातील सात जागांवर त्यांनी भाजपला विजय मिळवून दिला. ‘माय होम इंडिया’द्वारे ईशान्या भारतासाठी काम दरम्यान, 2005 पासून ‘माय होम इंडिया’च्या नावाने एक स्वयंसेवी संस्थादेखील सुरु केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून ईशान्य भारतातील नागरिकांना सर्वप्रकारची मदत केली जाते. ‘माय होम इंडिया’च्या कामाचा फायदा भाजपला या निवडणुकीत झाल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget