एक्स्प्लोर

Right To Disconnect : कार्यालयीन वेळेनंतर बॉसच्या कॉलपासून सुटका मिळणार? 'राईट टू डिस्कनेक्ट' विधेयक, खासदार सुप्रिया सुळेंचा पुढाकार

Right To Disconnect Bill : प्रत्येक व्यक्तीला ऑफिसमध्ये ताणतणावाला सामोरं जावं लागतं. मात्र, यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे, ऑफिसहून घरी आल्यानंतरही अनेक वेळा आपल्याला फोनवरून कार्यालयीन काम करावं लागतं.

Right To Disconnect Bill : प्रत्येक व्यक्तीला ऑफिसमध्ये ताणतणावाला सामोरं जावं लागतं. मात्र, यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे, ऑफिसहून घरी आल्यानंतरही अनेक वेळा आपल्याला फोनवरून कार्यालयीन काम करावं लागतं. कार्यालयीन वेळेनंतरही त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कॉल घ्यावा, ईमेलला प्रतिसाद द्यावा अशी कंपन्यांची अपेक्षा असते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे सध्याचं युग डिजिटल झालं आहे. या डिजिटल युगात सर्व काही मोबाईल फोनवर करता येतं. त्यामुळे बरेचसे कर्मचारी स्मार्टफोनच्या साहाय्यानं 24 तास काम करत असतात. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर पडतो. हे थांबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे संसदेत नवा #RightToDisconnect कायदा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा लोकसभेत 'राईट टू डिस्कनेक्ट' विधेयक मांडलं. कामाच्या अतिताणामुळे कर्मचाऱ्यांना ताणतणाव, अर्धवट झोप आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं, फोन कॉल्स आणि ई मेल्सना उत्तर देण्याचा ताण 'टेलिप्रेशर' या नावानं ओळखला जातो. सतत चोवीस तास ई मेल्स आणि फोन कॉल्सना उत्तर देण्याचा ताण असल्यामुळं कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबतही वेळ घालवता येत नाही. याशिवाय अनेक कर्मचाऱ्यांना निद्रानाशाच्या समस्येला सामोरं जावं लागत असल्याचं समोर आलं आहे. याचा कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेवर देखील तितकाच वाईट परिणाम होतो. सुप्रिया सुळे यांनी आतापर्यंत संसदेत तीन महत्त्वाची खासगी विधेयकं मांडली असून यामध्ये राईट टू डिस्कनेक्ट विधेयक 2019, प्री लेजिस्लेटिव्ह कन्सल्टेशन विधेयक 2019 आणि व्हिसलब्लोअर इन प्रायव्हेट सेक्टर प्रोटेक्शन विधेयक 2020 यांचा समावेश आहे.

'राईट टू डिस्कनेक्ट' विधेयकामध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ताणतणावामुळे त्यांचे खासगी आयुष्य प्रभावित होऊ नये यासाठीची काळजी घेण्यात आली आहे.  या विधेयकामुळे कर्मचाऱ्यांना ऑफीस मधील कामाच्या वेळेनंतर ऑफीसच्या फोनला तसेच ई-मेल्सना उत्तर न देण्याची मुभा मिळेल. हे विधेयक कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणाची हमी देते. त्याशिवाय संस्थांना कर्मचाऱ्यांची उत्पादकता आणि कार्य संस्कृती (Work Culture) अधिक दर्जेदार करण्याबाबतही विधेयकात आश्वासन दिलं आहे. तसेच कर्मचाऱ्याला ऑफिसच्या वेळेपेक्षा जास्त वेळ काम करावं लागले, तर तो वेळ ओव्हर टाईम मानून त्याचा मोबदला मिळण्याची हमी देते.

एका अहवालानुसार, स्मार्टफोनच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 70 टक्क्यांनी वाढली आहे. स्मार्टफोनमुळे काम करणं सोपं झालं असलं तरी त्यामुळे खासगी आयुष्य आणि कार्यालयीन आयुष्यातील जोखीम देखील वाढू लागली असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास कर्मचाऱ्यांची कामाच्या तणावापासून सुटका होईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Embed widget