एक्स्प्लोर

India China : चीनच्या घुसखोरीवर दाखल याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Supreme Court On India China Tension : चीनने भारताच्या हद्दीत केलेल्या घुसखोरी अमान्य करणाऱ्या केंद्र सरकारच्या दाव्याविरोधात दाखल याचिका सुप्रीम कोर्टाने अमान्य केली आहे.

Supreme Court On LAC Tension : प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनकडून भारताच्या हद्दीत होत (India China) असलेल्या घुसखोरीच्या मुद्यावर दाखल याचिका सुप्रीम कोर्टाने (Suprme Court) फेटाळली आहे. सरन्यायाधीश उदय लळीत (CJI U U Lalit) यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली. हा मुद्दा सरकारच्या अखत्यारीत असून कोर्ट यावर सुनावणी करू शकत नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.

अभिजित सराफ यांनी ही याचिका दाखल केली होती. गलवान खोऱ्यात झालेल्या घटनेनंतर केंद्र सरकारने चीनने घुसखोरी केली नसल्याचे म्हटले होते. मात्र, केंद्राने दिलेली माहिती चुकीची असल्याचा दावा याचिकेत केला होता. 

सरन्यायाधीश उदय लळीत आणि न्या. एस. रविंद्र भट यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली. याचिकेत उपस्थित केलेले मुद्दे हे सरकारच्या धोरणाशी निगडीत आहेत. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात येत असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. सीमेवरील चकमकी, संघर्ष, घुसखोरीसारखे मुद्दे हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. राज्यघटनेतील अनुच्छेद 32 नुसार या गोष्टी येत नसल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली.

भारत-चीनच्या लष्करात संघर्ष

कोरोना काळात भारतासह संपूर्ण जग महासाथीच्या आजारासोबत दोन हात करत असताना चीनने लडाख पूर्वमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर आगळीक केली. चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. चिनी सैन्याच्या घुसखोरीला अटकाव करताना 15-16 जून 2020 दरम्यान भारत-चीन लष्करात संघर्ष झाला. या संघर्षात भारताचे 20 जवानांनी प्राणाचे सर्वोच्च बलिदान दिले होते. त्यानंतर, देशात संतापाची लाट उसळली होती. घटनेच्या काही दिवसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या हद्दीत कोणी घुसखोरी केली नसल्याचे वक्तव्य केले होते. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि प्रत्यक्ष ताबा रेषेत फरक काय?

प्रत्यक्ष नियंत्रण रेषा: प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LOC) ही दोन्ही देशांनी ठरवलेली असते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार करणे, दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले जाऊ शकतात. भारत आणि पाकिस्तान दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये LOC आहे. LOC जवळील भागात दोन्ही देशातील नागरिकांच्या वसाहती असू शकतात. त्याशिवाय, सैन्यदेखील असू शकतात. 

प्रत्यक्ष ताबा रेषा: भारत आणि चीन दरम्यान प्रत्यक्ष ताबा रेषा आहे. भारत आणि चीनमध्ये 1993 मध्ये झालेल्या चर्चेनुसार प्रत्यक्ष ताबा रेषा (LAC) निश्चित करण्यात आली. या दोन्ही देशादरम्यान असलेल्या LAC जवळील 50 ते 100 किमीपर्यंतचा भाग हा मोकळा असतो. या भागात कोणत्याही देशाचे सैन्य नसते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: इराणशी लढाई पूर्ण ताकदीनिशी सुरु राहणार- डोनाल्ड ट्रम्प
Live Blog Updates: इराणशी लढाई पूर्ण ताकदीनिशी सुरु राहणार- डोनाल्ड ट्रम्प
LPG Ship Shivalik : होर्मुझमधून आलेलं भारताचं ‘शिवालिक’ जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात; भारताला मोठा दिलासा
होर्मुझमधून आलेलं भारताचं ‘शिवालिक’ जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात; भारताला मोठा दिलासा
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Embed widget