एक्स्प्लोर

Atul Kulkarni Poem: "लोक चिरडले जातात... लोकांची प्रेतं बनतात..."; अतुल कुलकर्णींनी रचलेली नवी कविता 'लोक-मताची डुबकी'

Atul Kulkarni Poem On Indian Politics: अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक कविता शेअर केली आहे. अनेकांकडून या कवितेवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. 

Atul Kulkarni Poem On Indian Politics: वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणारे अभिनेते अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांनी इंडस्ट्रीत आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. केवळ मराठीच नाहीतर हिंदी भाषिक चित्रपटांसह इतर अनेक प्रादेशिक भाषांतील चित्रपट, मालिकांमध्ये अतुल कुलकर्णी यांनी आपला ठसा उमटवला आहे. 'नटरंग' (Natarang Movie) चित्रपटात त्यांनी गुनवंतराव कागलकर उर्फ 'गुणा'ची भूमिका साकारली आहे, या भूमिकेनं अतुल कुलकर्णी महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमुळे ते चर्चेत आले होते. अलिकडच्या काळात त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत काम का केलं नाही? यावर त्यांनी भाष्य केलेलं. पण, आता पुन्हा एकदा अतुल कुलकर्णी चर्चेत आले आहेत, ते त्यांनी रचलेल्या एका कवितेमुळे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर हँडलवरुन ही कविता शेअर केली असून अनेकांकडून या कवितेवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. 

अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक कविता शेअर केली आहे. यामधून त्यांनी गेल्या काही दिवसांत देशात घडलेल्या काही घटनांवर भाष्य केल्याचं दिसतंय . 'लोक-मताची डुबकी' या शीर्षकाखाली अतुल कुलकर्णी यांनी कविता लिहिली आहे. 

अतुल कुलकर्णींची कविता 'लोक-मताची डुबकी'

"मतं गर्दी करतात, 
मतं डुबकी घेतात. 

लोक चिरडले जातात, 
लोकांची प्रेतं बनतात, 
लोक रडतात-भेकतात, 
लोक शांत होतात. 

पाच वर्षं सरतात, 
12 वर्ष सरतात. 

परत, 
मतं गर्दी करतात, 
मतं डुबकी घेतात. 

लोक चिरडले जातात, 
लोकांची प्रेतं बनतात, 
लोक रडतात-भेकतात, 
लोक शांSsSSत होतात. 
परत, 

मतं मनोरे रचतात, 
मतं जल्लोष करतात. 

लोक कोसळून पडतात, 
लोक घायाळ होतात, 
लोक रडतात, भेकतात, 
लोक शांSsSSत होतात, 

पाच वर्षं सरतात, 
बारा महिने सरतात, 

परत, 
लोक मतं मनोरे रचतात, 
मतं जल्लोष करतात. 

लोक कोसळून पडतात, 
लोक घायाळ होतात, 
लोक रडतात भेकतात, 
लोक शांSsSSत होतात, 
परत…, 

मतं रक्त सांडतात, 
लोक शांत राहतात, 

लोक भक्त असतात, 
लोक मतं बनतात, 
मतं आंधळी होतात, 
लोक ठेचा खातात. 

मतं रक्त सांडतात, 
लोक शांत राहतात, 
परत...

- अतुल कुलकर्णी 

अतुल कुलकर्णी आपल्या वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखले जातात. अशातच, फारच मोजके मराठी कलाकार उघडपणे आणि स्पष्ट मतं मांडताना दिसतात. यापैकीच अतुल कुलकर्णी एक नाव. ते नेहमीच विविध विषयांवर व्यक्त होतात. काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकांमधील मतदानावेळी लिहिलेल्या एका कवितेनंही लक्ष वेधून घेतलं होतं. अतुल कुलकर्णी नेहमीच राजकीय मुद्द्यावर ठामपणे आणि परखडपणे भाष्य करतात. मतदार म्हणून आपण कुठे चुकतो, हे त्यांनी त्यांच्या 'वेडी आशा' या कवितेत मांडलं होतं. अशातच आता त्यांनी लिहिलेल्या 'लोक-मताची डुबकी' या कवितेतून त्यांनी गेल्या काही दिवसांत देशात घडलेल्या भीषण घटनांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

'लोक-मताची डुबकी' या कवितेतून अतुल कुलकर्णी यांनी गेल्या काही दिवसांत देशात घडलेल्या भीषण घटनांचा उल्लेख केला आहे. सध्या प्रयागराजला महाकुंभ सुरू आहे, गेल्या काही दिवसांपूर्वी या महाकुंभ मेळ्यात अनेक चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या. तसेच, दोनच दिवसांपूर्वी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरही चेंगराचेंगरीची घटना घडली होती. याचाही उल्लेख केल्याचं बोललं जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhaava Box Office Collection Day 4: शेर शिवा का 'छावा' था... फक्त चारच दिवसांत वसूल केलं भांडवल; विक्की कौशलच्या फिल्मनं चौथ्या दिवशी किती कमावले?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
Rahul Gandhi: 'तुम्ही निवडणूक आयोगाची प्रतीमा मलीन करताय' 272 निवृत्त न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र
'तुम्ही निवडणूक आयोगाची प्रतीमा मलीन करताय' 272 निवृत्त न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र
गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
नाराज एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत, CM फडणवीस अन् अजित पवारांची खलबतं मुंबईत
नाराज एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत, CM फडणवीस अन् अजित पवारांची खलबतं मुंबईत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari : अजित पवारांवर बोलण्याची Balraje Patil य़ांची औकात आहे का?; मिटकरी कडाडले
Amol Mitkari : अजित पवारांवर बोलण्याची Balraje Patil यांची औकात आहे का? मिटकरी कडाडले
Anjali Damania on Ajit Pawar : येवलेंचा अटकपूर्व जामीन कोर्टात जाऊन पोलिसांनी रद्द करुन आणावा
Rajan Patil on Ajit Pawar : अजित पवार आणि शरद पवारांचा आमच्या प्रगतीत मोठा वाटा,राजन पाटील म्हणाले..
Thackeray Bandhu Seat : ठाकरे बंधूंमध्ये जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात, सुत्रांची माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
Rahul Gandhi: 'तुम्ही निवडणूक आयोगाची प्रतीमा मलीन करताय' 272 निवृत्त न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र
'तुम्ही निवडणूक आयोगाची प्रतीमा मलीन करताय' 272 निवृत्त न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र
गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
नाराज एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत, CM फडणवीस अन् अजित पवारांची खलबतं मुंबईत
नाराज एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत, CM फडणवीस अन् अजित पवारांची खलबतं मुंबईत
Kagal Nagar Palika Election: थेट समरजित घाटगेंशी घरोबा केल्यानंतर आता सूनबाई सुद्धा बिनविरोध, शिंदे गटाची माघार; हसन मुश्रीफांची कागलला 'समझोता' एक्स्प्रेस सुसाट!
थेट समरजित घाटगेंशी घरोबा केल्यानंतर आता सूनबाई सुद्धा बिनविरोध, शिंदे गटाची माघार; हसन मुश्रीफांची कागलला 'समझोता' एक्स्प्रेस सुसाट!
गोध्रा हत्याकांड करणारे पोलिस संरक्षणात देशभर उजळ माथ्याने फिरत आहेत आणि दिवस-दिवसभर चळवळीतील शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्रास; राजू शेट्टींचा पोलिसांवर हल्लाबोल
गोध्रा हत्याकांड करणारे पोलिस संरक्षणात देशभर उजळ माथ्याने फिरत आहेत आणि दिवस-दिवसभर चळवळीतील शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्रास; राजू शेट्टींचा पोलिसांवर हल्लाबोल
Pitya Bhai Joins BJP Leave Raj Thackeray MNS: पिट्या भाई आणि राज ठाकरेंमध्ये पहिली ठिणगी कुठे पडली?  मनसेप्रमुखांचे 'ते' शब्द मनात रुतले, अन्...
पिट्या भाई आणि राज ठाकरेंमध्ये पहिली ठिणगी कुठे पडली? मनसेप्रमुखांचे 'ते' शब्द मनात रुतले, अन्...
मुंबईत बांधकाम व्यवसायिकावर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या; पोलीस, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
मुंबईत बांधकाम व्यवसायिकावर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या; पोलीस, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
Embed widget