एक्स्प्लोर

... आणि शिवाजी महाराज 'असे' निसटले औरंगजेबाच्या नजरकैदेतून

Great Escape From Agra : 17 ऑगस्ट 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे युवराज संभाजी महाराजांसह आग्र्याच्या किल्ल्यातून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन यशस्वीरित्या पसार झाले.

Great Escape From Agra : छत्रपती शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) आग्र्याहून सुटका ही मराठ्यांच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाची घटना आहे. पाश्चात्य दिनदर्शिकेनुसार  17 ऑगस्ट 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे युवराज संभाजी महाराजांसह आग्र्याच्या किल्ल्यातून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन यशस्वीरित्या पसार झाले. परंतु, त्यासाठी त्यांनी आधी अनेक महिने योजना आखली होती. 

स्वराज्याची उभारणी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात अनेक संकटे आली. काही संकटे अशी होती की महाराज यातून सुखरूप बाहेर पडतील की नाही याबद्दल खूप मोठी शंका त्यावेळी महाराष्ट्रात निर्माण  झाली होती. अफजलखान प्रसंग, जयसिंगाची स्वारी अशी अनेक संकटे महाराजांवर कोसळली. परंतु या सर्व संकटामध्ये सर्वात मोठे संकट म्हणजे  “आग्र्याची कैद. औरंगजेबासारखा दगेखोर बादशहा, कडेकोट पहारा आणि सर्वत्र निराशेचा अंधार, आशेचा एकही किरण महाराजांसमोर नाही. अशी मोठी बिकट अवस्था महाराजांची आग्रा भेटीत झाली होती. या  औरंगजेब बादशहाचा कपटी व दगेखोर स्वभाव त्यांना माहीत होता. कारण शिवाजीराजे अत्यंत मुत्सद्दी, माणसांची पारख असणारे, दूरदृष्टी व राजकीय जाण असणारे होते. परंतु पुरंदरच्या तहाने महाराज कोड्यात अडकले होते.
 
शिवाजी महाराजांना नजरकैदेत टाकले गेले. त्यावेळी ते अशा कोड्यात अडकले होते की, प्रत्यक्षात मृत्यू डोल्यासमोर उभा होता. तो कधी? केंव्हा? कसा? काहीच ठावूक नव्हते. 'शिवाजी महाराज यांना मारू नये, तसे केल्यास इकडे परिस्थिती हाताबाहेर जाईल, परंतु, इकडे देखील येऊ देऊ नये' असे पत्र  दख्खनेतून जयसिंगने औरंगजेबाला पाठवले होते. त्यानंतर औरंगजेब याने महाराजांना काबुल मोहिमेवर पाठवायचे ठरवले. परंतु, महाराजांनी बादशहाची कुठलीच गोष्ट मानायला साफ नकार दिला. परिस्थिती अधिक बिकट होत होती. कुठल्याही क्षणी आपला मृत्यू समोर येईल हे महारांना ठावूक होते. परंतु, या कोड्यातून बाहेर पडण्यासाठी महाराज कोणती शक्कल लढवता येईल या विचारात होते. अखरे महाराजांना  एक युक्ती सुचली. त्यानुसार त्यांनी एक योजना आखली. परंतु, ही योजना अशी होती की, जर यशस्वी झाली तर महाराजांची सुखरूप सुटका होणार होती. परंतु, जर योजना फसली असती तर थेट औरंगजेबच्या हातीच लागणार होते.  

महाराजांबद्दल आग्र्याच्या बाजारात त्यावेळी अनेक अफवा पसरत होत्या. खुद्द जसवंतसिंग औरंगजेबाला सांगत होता कील शिवाजी महाराजांकडे दैवी शक्ती आहे. ते 14 ते 15 हात लांब उडी मारू शकतात. एका झटक्यात 40 ते  50 कोस अंतर ते चालून जाऊ शकतात.  या अफवांमुळे बादशाहने स्वतःभोवतीची सुरक्षा अधिक वाढवली. शिवाजी महाराज यांच्यासोबत असलेले संभाजीराजे मात्र नजर कैदेत नव्हते. त्यांना फिरायला मुभा होती. त्यांच्या सोबत सर्जेराव जेधे आग्र्याबद्दल इत्यंभूत माहिती काढत.

शिवाजी महाराज यांनी ठरवल्यानुसार योजना हळूहळू पुढे सरकत होती. 7 जून रोजी राजांनी सोबत असलेल्या सर्व सेवक आणि सैन्याला परत दख्खनेत पाठवून दिले. सोबत होते फक्त संभाजीराजे, हिरोजी फर्जंद, सर्जेराव, रघुनाथ बल्लाळ कोरडे, त्र्यंबक सोनदेव डबीर आणि मदारी मेहतर.

पाहा व्हिडीओ : शोध राजांच्या आग्रा भेटीचा, स्पेशल रिपोर्ट आग्र्याहून सुटका

अखेर तो दिवस उजाडला
 आग्र्याहून सुटकेचा तो दिवस अखेर उजाडला. महाराजांनी संपूर्ण तयारी केली होती. 17 ऑगस्ट 1666 चा तो दिवस. जवळपास एक हजार सैनिकांच्या खड्या पहाऱ्यातून शिवाजी महाराज सुखरूप बाहेर पडले होते. यासाठी महाराजांनी शक्कल लढवली होती ती म्हणजे मिठाईच्या पेटाऱ्याची. पेठाऱ्यात बसून महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटले होते. परंतु, अनेक इतिहासकारांच्या मते शिवाजी महाराज हे पेठाऱ्यातून नाही तर पेठाऱ्याचे भाई बनून बाहेर पडले.  

अशी होती योजना
श्रीकृष्ण जन्मोस्तवानिम्मीत मिठाई वाटण्याचे महाराजांनी ठरवले. बादशहाकडे अर्ज करून हे आमचे पूर्वापार व्रत असून ते करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. बादशाहने देखील लगेच परवनागी दिली. मिठाई भरलेले   पेठारे आग्र्यातील प्रतिष्टीत मंडळी, सरदार , बादशाही वजीर, फकीर, साधू आणि गरीब जनतेकडे जाऊ लागले. मिठाई वाटपावेळी शिवाजी महाराजांच्या निवास्थानी गर्दी होऊ लागली. पाहरेकरी पेटारे उघडून पाहणी करत असत मगच पेटारे बाहेर जात असत. महाराजांनी मुलचंद सावकारामार्फात सर्व जडजवाहीर मोती, सोने, मोहरा दक्षिणेत पाठवून दिले. आता रोज पेठारे भरून मिठाई वाटण्यात येऊ लागली होती. त्यामुळे पहारेकरी पहिल्यासारखे कसून तपास न करताच एखाद दुसरा पेटारा तपासात व उर्वरित पेठारे तसेच जाऊ देत. हीच संधी होती शिवाजी महाराजांना तेथून सुटण्याची. 

महाराज मथुरेला रवाना झाले
16 ऑगस्ट रोजी रामसिंग शंभूराजांसोबत औरंगजेबाच्या दरबारी मुजऱ्यास गेला असता औरंगजेबाने महाराजांनी मनसब कबुल करून  त्यांच्याकडील किल्ले बादशहास सोपवून काबुलच्या स्वारीवर जावे असे आदेश दिले. परंतु,शिवाजी महाराजांनी बादशाहाचा हा आदेश नाकारला. औरंगजेबाचा हा शेवटचा इशारा शिवाजी महाराजांना समजला आणि0 त्यांनी अग्र्यातून निसटून स्वराज्यात परतण्याच्या मोहिमेला पूर्णस्वरूप देण्याचे ठरवले. 17 ऑगस्ट रोजी जुम्माचा दिवस असल्याने औरंगजेबाचा दरबार बंद होता. मशिदीत बादशाहसह सर्व जनता आणि दरबारी अधिकारी नमाजासाठी जाणार होते. शंभूराजे आज महाराजांसोबतच असणार होते. दुपारच्या सुमारास महाराजांचे डोके दुखू लागले. प्रकृती ठीक नसल्याने महाराज झोपी गेले आणि एक मुलगा त्यांचे पाय चेपीत तेथे बसला. मथुरेतील ब्राम्हण आणि फाकीरांना मिठाई वाटण्यासाठी पेटाऱ्यात मिठाई भरली जाऊ लागली. महाराज झोपेतून उठले आणि त्या ठिकाणी हिरोजी फर्जंद  झोपी गेले. संध्याकाळच्यावेळी पेटारे मथुरेस रवाना झाले. त्यातील दोन पेटाऱ्यात शिवाजी महराज आणि शंभूराजे बसले. पहारेकऱ्यांनी पहिले दोन पेटारे तपासले व उर्वरित पेटारे ना तपासताच जाऊ दिले आणि महाराज बादशहाच्या कैदेतून निसटले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्यात गुंतवणूक केल्यास पुढे फायदा होणार का? 
दिलासादायक! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्यात गुंतवणूक केल्यास पुढे फायदा होणार का? 
मुंबईकरांसाठी गुडन्यूज, कल्याण ते CSMT सर्व लोकल 15 डब्ब्यांच्या करा; संसदेत प्रश्न, गर्दी कमी करण्यासाठी उपाय
मुंबईकरांसाठी गुडन्यूज, कल्याण ते CSMT सर्व लोकल 15 डब्ब्यांच्या करा; संसदेत प्रश्न, गर्दी कमी करण्यासाठी उपाय
शॉकिंग! रिल्सचा नाद केला, जीवावर बेतला; व्हिडिओ 'शूट' करताना बंदुकीतून सुटली गोळी, युवक जागेवरच ठार
शॉकिंग! रिल्सचा नाद केला, जीवावर बेतला; व्हिडिओ 'शूट' करताना बंदुकीतून सुटली गोळी, युवक जागेवरच ठार
TMC Candidate List : ममता बॅनर्जींचा धमाका, विधानसभेसाठी एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर
मोठी बातमी : ममता बॅनर्जींचा धमाका, एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर, नंदीग्राममधून स्वत: लढणार नाहीत!

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
Embed widget