एक्स्प्लोर

Indian Missiles : 'प्रलय' क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी यशस्वी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं अभिनंदन

पृष्ठभागावरुन पृष्ठभागावर मारा करणाऱ्या 'प्रलय' क्षेपणास्त्राची दुसरी उड्डाण चाचणी आज यशस्वीरीत्या घेण्यात आली. चाचणी यशस्वी केल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले.

Indian Missiles : स्वदेशी बनावटीच्या पृष्ठभागावरुन पृष्ठभागावर मारा करणाऱ्या पारंपरिक 'प्रलय' क्षेपणास्त्राची दुसरी उड्डाण चाचणी आज यशस्वीरीत्या घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी केली. प्रथमच, सलग दोन दिवस बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या सलग दोन उड्डाण चाचण्या यशस्वीपणे घेण्यात आल्या आहेत. उड्डाण चाचणीने मोहिमेची सर्व उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. हे प्रक्षेपण क्षेपणास्त्राच्या दोन्ही प्रकारातील प्रणाली सिद्ध करते.

आजच्या प्रक्षेपणात, ‘प्रलय’क्षेपणास्त्राची अचूकता आणि लक्ष्यभेदी क्षमता सिद्ध करण्यासाठी अधिक वजनासह वेगळ्या श्रेणीसाठी चाचणी घेण्यात आली. या प्रक्षेपणाचे, पूर्व किनारपट्टीवर तैनात इम्पॅक्ट पॉईंटजवळील डाउन रेंज जहाजे, टेलीमेट्री, रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिक ट्रॅकिंग सिस्टीमसह सर्व रेंज सेन्सर्स  उपकरणांद्वारे निरीक्षण केले गेले आहे. 'प्रलय' क्षेपणास्त्राची दुसरी उड्डाण चाचणी यशस्वी केल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि संबंधित पथकांचे अभिनंदन केले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी यांनी संबंधित पथकाचे कौतुक केले आहे. या यशस्वी उड्डाण चाचणीमुळे देशाने संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रात मजबूत संरचना आणि विकास क्षमता सिद्ध केली असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

भारताने जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलेस्टिक मिसाइल 'प्रलय' (Pralay) या क्षेपणास्त्राची काल (बुधुवारी) यशस्वी चाचणी घेतली होती. हे क्षेपणास्त्र 150 किमी ते 500 किमी (KM)अंतरावरील लक्ष्यावर मारा करू शकणार आहे. चीन आणि पाकिस्तानसोबतच्या तणावामुळे भारत आपली लष्करी ताकद वाढवत आहे. हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केले आहे. या क्षेपणास्त्र एक टनापर्यंतचे वॉरहेड वाहून नेऊ शकते. हे क्षेपणास्त्र विकसित करण्याची चर्चा 2015 पासून सुरु होती. डीआरडीओने आपल्या वार्षिक अहवालात बॅलेस्टिक मिसाईल होलोकॉस्टचा उल्लेख केला होता. या क्षेपणास्त्राच्या अचूकतेमुळे ते चीनच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मुकाबला करण्यास पूर्णपणे सक्षम बनते. ते जमिनीवरुन तसेच कनस्टरतूनही डागले जाऊ शकते. प्रलय क्षेपणास्त्र इतर कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपेक्षा जास्त मारक असल्याचे म्हटले जाते.

महत्ताच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
Embed widget