एक्स्प्लोर

लोकसभेत रोहिंग्या तर राज्यसभेत अवैध बांगलादेशींचा मुद्दा गाजला!

आसाममधल्या एनआरसी अंतिम मसुद्याचा मुद्दा गाजत असतानाच आज लोकसभेत रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न गाजला.

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज मुद्दा गाजला तो देशाच्या नागरिकत्वाचा. लोकसभेत रोहिंग्यांच्या प्रश्नावर तर राज्यसभेत आसाममधल्या अवैध बांगलादेशींबद्दल सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. दोघांच्याही बाबतीत सरकारची भूमिका कडक आहे. रोहिंग्यांना शरणार्थीचा दर्जा दिलेला नाही, सर्व प्रकिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना परत म्यानमारमध्ये पाठवण्याचे प्रयत्न सुरु होतील, असं लोकसभेतल्या निवेदनात गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आसाममधल्या एनआरसी अंतिम मसुद्याचा मुद्दा गाजत असतानाच आज लोकसभेत रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न गाजला. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. रोहिंग्या मुस्लिमांना भारताने शरणार्थींचा दर्जा दिलेला नाही, ते अवैध प्रवासी आहेत. ज्यांचा प्रवेशच अवैध आहे, त्यांना सरकारकडून कुठल्या सवलती देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा निर्वाळा सरकारने दिला आहे. देशात राहणारे नागरिक ही आमची प्राथमिकता आहे. जर रोहिंग्यांना रेशनकार्ड किंवा इतर कुठल्या सुविधा मिळत असतील तर त्या गैरकायदेशीरपणे त्यांनी मिळवल्या आहेत. कुठल्याही पद्धतीने त्यांना सरकारी कागदपत्रं मिळवू देऊ नका असा स्पष्ट इशारा राज्यांना दिल्याचंही स्पष्टीकरण आज सरकारच्या वतीने देण्यात आलं. या कागदपत्रांच्या माध्यमातून त्यांनी उद्या भारतातल्या हक्कांची मागणी करु नये यासाठी हा इशारा दिला गेला आहे. रोहिंग्या मुस्लिमांची पार्श्वभूमी - जगातल्या सर्वात पीडित अल्पसंख्यांकांमध्ये रोहिंग्यांचा समावेश होतो. - बौद्ध बहुसंख्यांक म्यानमारमध्ये जवळपास 10 लाख रोहिंग्या आहेत. - म्यानमारमधल्या रखाईन प्रांतात त्यांची संख्या सर्वाधिक आहे. - गेल्या 70 वर्षांपासून रोहिंग्या आपल्याच देशात प्रचंड अत्याचार सहन करत आहेत, कारण एकच त्यांच्याकडे नागरिकत्व नाही. - म्यानमारमधल्या 135 अधिकृत जातींमध्ये रोहिंग्यांना समाविष्ट करण्यात आलेलं नाही. म्यानमारमधून पलायन करावं लागल्यानंतर अनेक रोहिंग्या हे बांगलादेश, आसामच्या माध्यमातून भारतात घुसखोरी करत आहेत. त्यांना आश्रय दिला तर भविष्यात ते इस्लामी कट्टरतावाद्यांसाठी उपयुक्त ठरतील अशी सरकारला भीती आहे. एनआरसीचा मुद्दाही गाजला एकीकडे रोहिंग्यांबद्दल ही भूमिका स्पष्ट करतानाच आज आसाममधल्या अवैध बांगलादेशींचा मुद्दाही राज्यसभेत गाजला. एनआरसीची अंतिम मसुदा यादी आल्यानंतर 40 लाख लोकांना देशाचं नागरिकत्व मिळालेलं नाही. त्यावर भाजपचे अध्यक्ष अमित शाह राज्यसभेत बोलायला उभे राहिले आणि त्यांच्या आक्रमक उत्तराने विरोधक खवळले. राज्यसभेत अमित शाह म्हणाले की, "चर्चेदरम्यान हे कोणीच सांगत नाही की, एनआरसीचं मूळ कुठे आहे, हे कुठून आलं आहे? अवैध घुसखोरांच्या मुद्द्यावर आसामचे शेकडो तरुण शहीद झाले आहेत. 14 ऑगस्ट 1985 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आसाम अकॉर्डवर स्वाक्षरी केली होती. एनआरसीची स्थापना हाच आत्मा होता. या अकॉर्डची तरतूद होती की, अवैध घुसखोरांची ओळख पटवून, त्यांना नोंदणी नागरिकांमधून वेगळं करुन एक राष्ट्रीय नोंदणी बनवण्यात येईल," असं शाह म्हणाले. बांगलादेशी घुसखोर हा देशासाठी चिंतेचा विषय राहिलेला आहे. या प्रश्नाची झळ महाराष्ट्रात मुंबईपर्यंतही पोहोचली आहे. पण रोहिंग्या असो की अवैध बांगलादेशी सगळ्यांना मतांच्या राजकारणातून पाहण्याची सवय काही पक्षांना झाली आहे. त्यामुळेच या मुद्द्याचं राजकारण निवडणुकीच्या वर्षात शिगेला पोहचण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
Eknath Shinde Municipal Corporation Election Result 2026 : जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
Embed widget